शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

तळोद्यात जन आशीर्वाद यात्रेनिमित्त महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST

तळोदा : जन आशीर्वाद यात्रेनिमित्त भाजपतर्फे गुरुवारी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांपुढे तळोदा ...

तळोदा : जन आशीर्वाद यात्रेनिमित्त भाजपतर्फे गुरुवारी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांपुढे तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांच्या पाढा उपस्थितांनी वाचला होता. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. केंद्रीय महिला, बालकल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा तळोदा येथे गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या यात्रेनिमित्त आदिवासी सांस्कृतिक भवनात महिला मेळावा घेण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे आदिवासी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार डॉ. अशोक उईके, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रकाश गेडाम, किशोर कळकर, राजेंद्र गावीत, तळोदा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, शहादा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, शानुबाई वळवी, निलाबेन मेहता, किन्नरी सोनार आदी उपस्थित होते.

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात अनेक समस्या आहेत. तेथे धड वैद्यकीय अधिकारी पुरेसे नाहीत. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधादेखील पुरेशा प्रमाणात मिळत नाही. बहुतेक पदेदेखील रिक्त आहेत. तेथील तांत्रिक उपकरणेही नादुरूस्त आहेत. एवढेच नव्हे तर बाह्य रुग्णांची ओपिडीसुध्दा कधी कधी बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. अशा अनेक समस्यांचा पाढाच नागरिकांनी वाचला होता. खुद्द खासदार डॉ. हिना गावीत यांनीदेखील या रुग्णालयातील मंजूर ऑक्सिजन प्लांट अजूनही सुरू झाला नसल्याने त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. हे सर्व प्रश्न ऐकून मंत्री भारती पवार यांनी येथील यंत्रणेकडून संपूर्ण अहवाल मागवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन देऊन निदान मोदी सरकारने आरोग्याचा ज्या योजना दिल्या आहेत. त्यात स्वाभिमान भारत, जननी सुरक्षा, उज्ज्वला योजना यांचा लाभ गोरगरिबांना मिळवून देण्याकरिता कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी राज्य शासनाच्या खावटी योजनेवर त्यांनी टीका केली. कारण अजूनही मोठ्या प्रमाणावर लाभार्थींना त्याचा लाभ मिळालेला नाही. डॉ. अशोक उईके, आमदार राजेश पाडवी, विजय चौधरी, शानुबाई वळवी यांनीही केंद्र सरकारच्या योजनांचा लेखाजोखा मांडला.

मेळाव्याचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी यांनी केले. कौशल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा सरचिटणीस राजू गावीत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यासाठी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल शेंडे, दारासिंग वसावे, हेमलाल मगरे, ईश्वर पोटे, संजय कर्णकर, योगेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, सोनार समाजातील महिलांनी गणेश सोनार यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

भाजी विक्रेेतीकडून घेतली भाजी

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेला शहरातील हातोडा नाक्यापासून सुरूवात करण्यात आली होती. मेन रोड मार्गे जाणाऱ्या यात्रेत त्यांचा सर्वच नागरिकांनी सत्कार केला होता. गृहिणींनी त्यांचे औक्षण केले होते. नागरिकांनी केलेल्या अशा स्वागताने त्या भारावल्या होत्या. एवढेच नव्हे तर या रस्त्यावर एका आदिवासी महिलेला भाजी विकताना पाहून त्यांनी तिच्याकडील कंटुरली विकत घेऊन तिची आस्थेने चौकशी केली. तेव्हा ही महिला आनंदाश्रूनी अक्षरशः रडली होती. कार्यक्रम स्थळीदेखील त्यांनी आदिवासी महिलांसोबत वाद्याच्या तालावर फेर धरला होता. शिवाय त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याशी हितगूज करीत सेल्फीदेखील काढला.