शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

त-हाडी येथे महिलांनी उद्ध्वस्त केला दारूसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:58 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शहादा तालुक्यातील त:हाडीतर्फे बोरद या गावात मागील ब:याच वर्षापासून अवैध दारुची सर्रास विक्री होत आहे. याला कंटाळून येथील श्रमिक महिलांनी आक्रमक प्रवित्रा घेत प्रथम पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. परंतु पोलीस प्रशासनाकडून निवेदनाची दखल घेण्यात न आल्याने सरपंच, महिला बचत गट व श्रमिक महिलांनी विक्रेत्यांकडील दारूसाठा ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शहादा तालुक्यातील त:हाडीतर्फे बोरद या गावात मागील ब:याच वर्षापासून अवैध दारुची सर्रास विक्री होत आहे. याला कंटाळून येथील श्रमिक महिलांनी आक्रमक प्रवित्रा घेत प्रथम पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. परंतु पोलीस प्रशासनाकडून निवेदनाची दखल घेण्यात न आल्याने सरपंच, महिला बचत गट व श्रमिक महिलांनी विक्रेत्यांकडील दारूसाठा उद्ध्वस्त केला.त:हाडी त.बो. येथे दारूबंदी व्हावी म्हणून महिलांनी 20 फेब्रुवारी रोजी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र पोलिसांकडून काहीही दखल घेण्यात न आल्याने किंवा कुठल्याही प्रकारची विचारपूस न झाल्याने नाईलाजास्तव येथील महिला बचत गट, ग्रामपंचायत सरपंच, श्रमीक महिलांनी एकत्र येऊन 20 व 21 फेब्रुवारी रोजी दारु विक्रेत्यांकडील दारूचा साठा उद्ध्वस्त केला. परंतु काही दारू विक्रेते महिलांना जुमानत नसल्याने याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. दारु विक्रेते सदर महिलांना दमदाटी करतात. त्यामुळे दारुबंदी विभाग (राज्य उत्पादन शुल्क विभाग) व जिल्हा पोलीस प्रशासनाने याबाबत गंभीर दखल देण्याची गरज आहे.वास्तविक पाहता त:हाडी परिसरातील परिवर्धे, कलसाडी, सोनवल, काथर्दा, वाघोदा, कोठली या गावात दारुबंदी असल्याने दारुचा एक थेंबही विकला जात नाही. परंतु त:हाडी गावात अवैध दारुची भरमसाठ सर्रास विक्री होत आहे. अवैध दारु विक्रीमुळे येथील श्रमिक महिलांना संसार व घर चालविणे कठीण झाले आहे. दारु पिऊन पुरुष घरी आल्यानंतर महिलांना मारझोड करतात. त्यामुळे घरात कौटुंबीक कलह निर्माण होतो. दारुबंदीसाठी जर श्रमिक महिला एकत्र येऊन दारु विक्रेत्यांच्या दारु अड्डय़ांवर धाड टाकून दारूचा साठा नष्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरुन लढा देत असतील तर प्रशासनाच्या दृष्टीने ही फारच खेदाची बाब आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे बघ्याची भूमिका न घेता प्रत्यक्ष गावात येऊन अवैध दारु विक्रेत्यास समज देऊन या गावातील दारु विक्री कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी सरपंच छायाबाई गोवर्धन ठाकरे, प्रियंका नगीन पाटील, भाग्यश्री गौतम पानपाटील, मंगला संजय सुतार, सुनंदा संतोष पारधी, लताबाई हरीश खोडे, रत्नाबाई शंकर पवार, पिंटी बाई कैलास पाडवी, संगीता लोहा:या पावरा, प्रियंका किरमा वळवी आदी महिलांनी केली आहे.