लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंगावरील ३३ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरण्यासाठी तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथील ५५ वर्षीय महिलेचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला आहे. ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला असून गळा दाबून महिलेला ठार करण्यात आले आहे.नमुबाई नरसी वसावे असे या महिलेचे नांव असून बुधवारी ३ जून रोजी सायंकाळी साडेसहावाजेच्या सुमारस मयत मजूर महिला ही गणेश बुधावल गावाहून श्रीकृष्ण खांडसरी येथे नेहमी प्रमाणे मजुरुसाठी गेली होती. ती परत न आल्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. गणेश बुधावल गावालगतच्या मटावल (गुजरात) येथिल प्रल्हाद उदेसिंग पाडवी यांच्या उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला.सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिस तपासात मयत महीला सोन्या-चांदीचे दागिने वापरत असल्याचे तिच्या अंगावरील दागिने चोरी करण्याच्या हेतूने गळा दाबून महिलेचा खून केल्याचे समोर आले. गुरुवारी दुपारी जयवंत नरशी वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसांत अज्ञात मारेकऱ्यांचा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे करीत आहेत.महिलेच्या अंगावरील ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने मारेकºयांनी लंपास केले आहेत. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरिक्षक योगेश राऊत, सुनील पाडवी, युवराज चव्हाण, पंकज पाडवी यांनी घटनास्थळी भेट दिली.
अवघ्या ३३ हजारांच्या चांदीच्या दागीन्यांसाठी महिलेचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:29 IST