शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

दोन दिवसात अहवाल देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महिनाभराच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असले तरी येत्या महिनाभरात विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महिनाभराच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असले तरी येत्या महिनाभरात विविध सण, उत्सवांची रेलचेल राहणार असल्यामुळे अशा काळात निवडणुका आणि सण-उत्सव यांचा बंदोबस्त अशी दुहेरी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. त्यादृष्टीने अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा मुद्दा सद्या ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीनंतर दिलेल्या निकालामुळे राज्य निवडणूक आयोग आणि नंदुरबारसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिका:यांशी मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून एकुण तयारीसंदर्भात आढावा घेतला. त्यात निवडणुका आणि सण-उत्सवांच्या काळातील बंदोबस्त याची सांगड कशी घातली जाणार याबाबत मुद्दा अडला आहे. त्याबाबतचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांना देण्यात आल्या आहेत. हिंदू धर्मात श्रावण महिन्यापासून विविध सण-उत्सवांची रेलचेल सुरू होते. थेट दिवाळीर्पयत ती कायम राहते. स्थानिक स्तरावरील दशा माता उत्सव, श्रीकृष्ण अष्टमी, दहीहंडी उत्सव, पोळा, गणेशोत्सव असे विविध सण या काळात येतील. यावेळी दिवाळीच्या काळातच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याच्या आधीच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका  जाहीर झाल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून जिल्हा प्रशासनाला दुहेरी कसरत होणे क्रमप्राप्त आहे. यादृष्टीने जिल्हा प्रशासनाची एकुणच तयारी आहे किंवा कशी याची चाचपणी करून तातडीने अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर आयोग निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. मतदार यादी तयारजिल्हा प्रशासनाने यापूर्वीच मतदार यादी तयार केली आहे. त्यामुळे मतदार यादी जाहीर करणे,हरकती मागविणे व मतदार यादी अंतिम करणे या बाबींमधील वेळ वाचणार आहे. त्यामुळे ही एक बाब तयारीच्या दृष्टीने सुलभ राहणार आहे.गट, गण रचनाही तयारजिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची रचना यापूर्वीच   अंतिम करण्यात आलेली आहे. गट, गण रचनांवरील हरकती आणि त्या अंतिम करण्याची सर्व प्रक्रियाही जिल्हा प्रशासनाने पुर्ण करून ठेवली आहे. आरक्षणही जाहीरगट, गणांचे आरक्षणही यापूर्वीच जाहीर करून ते राजपत्रात प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे या पातळीवरील तयारीही पुर्ण आहे. त्याचा अहवालही यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे.मतदान केंद्रांची स्थितीमतदान केंद्रांच्या स्थितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने माहिती मागविली आहे. परंतु सद्य स्थितीत ग्रामिण भागातील मतदान केंद्रांचीही तयारी अद्ययावत राहील अशी स्थिती आहे. कारण दोनच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मतदान केंद्र अद्ययावत करण्यात आलेली होती. त्यामुळे या मतदान केंद्रांची यादी जिल्हा प्रशासनाकडे तयार आहेच. एकुणच जिल्हा परिषद निवडणुकीची अधिसुचना कधीही जाहीर होईल अशी स्थिती प्रशासन स्तरावर आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या अधिका:यांनी मंगळवारी जिल्हाधिका:यांशी व्हिडीओ  कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून एकुणच जिल्हा परिषद निवडणुकविषयीची तयारी यासंदर्भात जाणून घेतले. जिल्हाधिका:यांनी मतदार यादी, गट, गण रचना, आरक्षण आदी तयारी यापूर्वीच पूर्ण असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचा:यांची पुरेशी     संख्या देखील उपलब्ध असल्याचे सांगितले. फक्त मतदान केंद्र आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील    अहवाल दोन दिवसात सादर करण्यासंदर्भात सांगण्यात आले. त्यामुळे येत्या दोन दिवसात निवडणुकीची अधिसुचना जाहीर होण्याची शक्यता आहे.