शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

तोरखेडा : गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच मिटवले जावेत तसेच गावात ...

तोरखेडा : गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच मिटवले जावेत तसेच गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होऊन गावाची वाटचाल समृद्धीकडे व्हावी या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव या मोहिमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे बरेच गावे तंटामुक्त होऊन विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत होते. परंतु मागील काही वर्षापासून गावपातळीवरील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावल्याने ग्रामीण भागात भांडण तंटे दिवसेंदिवस वाढीस लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गृहविभागाने पुन्हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव सुरू करून गावपातळीवरील तंटे गावात मिटविण्यात सुयश येईल, असे ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावात तंटामुक्त गाव समितीची स्थापना करून त्या समितीच्या माध्यमातून गावात सामाजिक उपक्रम, गावातील लहान-मोठे तंटे, एकमेकांत असलेले वाद, शेतीचे वाद गाव पातळीवर समितीच्या माध्यमातून सोडविले जात होते. त्यामुळे गावातील तक्रारीचे निवारण गावातच होत असल्यामुळे गावातील तंटे पोलीस ठाण्यातपर्यंत जात नव्हते. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात होते. त्यामुळे गावात शांतता व एकोपा दिसून येत होता. समितीच्या माध्यमातून गावात दारूबंदी करून दारू हद्दपार केली. गावातील छोटे-मोठे भांडण गावात मिटवले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम

समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावात मिटवले जात होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार जात नसल्याने पोलीस प्रशासनावरील कामाचा भार थोड्याफार प्रमाणात कमी झाला होता. तसेच गावातील वातावरण आनंदित राहत होते. शासन स्तरावरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा राबविण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. - डॉ. योगेश चौधरी, पोलीसपाटील, बामखेडा

महात्मा गांधी तंटामुक्त गाव

समितीच्या माध्यमातून गावातील छोटे-मोठे तंटे गावात मिटवले जातात. गावात दारूबंदी केली जात होती. या माध्यमातून अनेकांनी दारू सोडली. समाजोपयोगी उपक्रम राबविले जात होते. त्यामुळे गावात एकोपा तयार होत होता. त्यामुळे शासनाने थंडावलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी.

-राजबद्दूर शिंदे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, तोरखेडा

तंटामुक्त गाव समितीची फेरनिवड व्हावी. आठ वर्षांपासून जैसे थे समित्या आहेत.

संबंधित विभागाकडून जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न हवेत