शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

तोरखेडा : गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच मिटवले जावेत तसेच गावात ...

तोरखेडा : गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच मिटवले जावेत तसेच गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होऊन गावाची वाटचाल समृद्धीकडे व्हावी या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव या मोहिमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे बरेच गावे तंटामुक्त होऊन विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत होते. परंतु मागील काही वर्षापासून गावपातळीवरील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावल्याने ग्रामीण भागात भांडण तंटे दिवसेंदिवस वाढीस लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गृहविभागाने पुन्हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव सुरू करून गावपातळीवरील तंटे गावात मिटविण्यात सुयश येईल, असे ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावात तंटामुक्त गाव समितीची स्थापना करून त्या समितीच्या माध्यमातून गावात सामाजिक उपक्रम, गावातील लहान-मोठे तंटे, एकमेकांत असलेले वाद, शेतीचे वाद गाव पातळीवर समितीच्या माध्यमातून सोडविले जात होते. त्यामुळे गावातील तक्रारीचे निवारण गावातच होत असल्यामुळे गावातील तंटे पोलीस ठाण्यातपर्यंत जात नव्हते. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात होते. त्यामुळे गावात शांतता व एकोपा दिसून येत होता. समितीच्या माध्यमातून गावात दारूबंदी करून दारू हद्दपार केली. गावातील छोटे-मोठे भांडण गावात मिटवले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम

समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावात मिटवले जात होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार जात नसल्याने पोलीस प्रशासनावरील कामाचा भार थोड्याफार प्रमाणात कमी झाला होता. तसेच गावातील वातावरण आनंदित राहत होते. शासन स्तरावरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा राबविण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. - डॉ. योगेश चौधरी, पोलीसपाटील, बामखेडा

महात्मा गांधी तंटामुक्त गाव

समितीच्या माध्यमातून गावातील छोटे-मोठे तंटे गावात मिटवले जातात. गावात दारूबंदी केली जात होती. या माध्यमातून अनेकांनी दारू सोडली. समाजोपयोगी उपक्रम राबविले जात होते. त्यामुळे गावात एकोपा तयार होत होता. त्यामुळे शासनाने थंडावलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी.

-राजबद्दूर शिंदे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, तोरखेडा

तंटामुक्त गाव समितीची फेरनिवड व्हावी. आठ वर्षांपासून जैसे थे समित्या आहेत.

संबंधित विभागाकडून जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न हवेत