शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

तोरखेडा : गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच मिटवले जावेत तसेच गावात ...

तोरखेडा : गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच मिटवले जावेत तसेच गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होऊन गावाची वाटचाल समृद्धीकडे व्हावी या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव या मोहिमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे बरेच गावे तंटामुक्त होऊन विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत होते. परंतु मागील काही वर्षापासून गावपातळीवरील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावल्याने ग्रामीण भागात भांडण तंटे दिवसेंदिवस वाढीस लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गृहविभागाने पुन्हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव सुरू करून गावपातळीवरील तंटे गावात मिटविण्यात सुयश येईल, असे ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावात तंटामुक्त गाव समितीची स्थापना करून त्या समितीच्या माध्यमातून गावात सामाजिक उपक्रम, गावातील लहान-मोठे तंटे, एकमेकांत असलेले वाद, शेतीचे वाद गाव पातळीवर समितीच्या माध्यमातून सोडविले जात होते. त्यामुळे गावातील तक्रारीचे निवारण गावातच होत असल्यामुळे गावातील तंटे पोलीस ठाण्यातपर्यंत जात नव्हते. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात होते. त्यामुळे गावात शांतता व एकोपा दिसून येत होता. समितीच्या माध्यमातून गावात दारूबंदी करून दारू हद्दपार केली. गावातील छोटे-मोठे भांडण गावात मिटवले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम

समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावात मिटवले जात होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार जात नसल्याने पोलीस प्रशासनावरील कामाचा भार थोड्याफार प्रमाणात कमी झाला होता. तसेच गावातील वातावरण आनंदित राहत होते. शासन स्तरावरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा राबविण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. - डॉ. योगेश चौधरी, पोलीसपाटील, बामखेडा

महात्मा गांधी तंटामुक्त गाव

समितीच्या माध्यमातून गावातील छोटे-मोठे तंटे गावात मिटवले जातात. गावात दारूबंदी केली जात होती. या माध्यमातून अनेकांनी दारू सोडली. समाजोपयोगी उपक्रम राबविले जात होते. त्यामुळे गावात एकोपा तयार होत होता. त्यामुळे शासनाने थंडावलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी.

-राजबद्दूर शिंदे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, तोरखेडा

तंटामुक्त गाव समितीची फेरनिवड व्हावी. आठ वर्षांपासून जैसे थे समित्या आहेत.

संबंधित विभागाकडून जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न हवेत