शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

तोरखेडा : गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच मिटवले जावेत तसेच गावात ...

तोरखेडा : गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच मिटवले जावेत तसेच गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होऊन गावाची वाटचाल समृद्धीकडे व्हावी या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव या मोहिमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे बरेच गावे तंटामुक्त होऊन विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत होते. परंतु मागील काही वर्षापासून गावपातळीवरील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावल्याने ग्रामीण भागात भांडण तंटे दिवसेंदिवस वाढीस लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गृहविभागाने पुन्हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव सुरू करून गावपातळीवरील तंटे गावात मिटविण्यात सुयश येईल, असे ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावात तंटामुक्त गाव समितीची स्थापना करून त्या समितीच्या माध्यमातून गावात सामाजिक उपक्रम, गावातील लहान-मोठे तंटे, एकमेकांत असलेले वाद, शेतीचे वाद गाव पातळीवर समितीच्या माध्यमातून सोडविले जात होते. त्यामुळे गावातील तक्रारीचे निवारण गावातच होत असल्यामुळे गावातील तंटे पोलीस ठाण्यातपर्यंत जात नव्हते. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात होते. त्यामुळे गावात शांतता व एकोपा दिसून येत होता. समितीच्या माध्यमातून गावात दारूबंदी करून दारू हद्दपार केली. गावातील छोटे-मोठे भांडण गावात मिटवले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम

समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावात मिटवले जात होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार जात नसल्याने पोलीस प्रशासनावरील कामाचा भार थोड्याफार प्रमाणात कमी झाला होता. तसेच गावातील वातावरण आनंदित राहत होते. शासन स्तरावरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा राबविण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. - डॉ. योगेश चौधरी, पोलीसपाटील, बामखेडा

महात्मा गांधी तंटामुक्त गाव

समितीच्या माध्यमातून गावातील छोटे-मोठे तंटे गावात मिटवले जातात. गावात दारूबंदी केली जात होती. या माध्यमातून अनेकांनी दारू सोडली. समाजोपयोगी उपक्रम राबविले जात होते. त्यामुळे गावात एकोपा तयार होत होता. त्यामुळे शासनाने थंडावलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी.

-राजबद्दूर शिंदे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, तोरखेडा

तंटामुक्त गाव समितीची फेरनिवड व्हावी. आठ वर्षांपासून जैसे थे समित्या आहेत.

संबंधित विभागाकडून जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न हवेत