शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

गाव तेथे एसटी फक्त शहरांसाठी का धावतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुन्हा निर्बंध लादले आहेत. असे असले तरी सर्व व्यवहार सुरू असून, एसटी बसही सुरू झाल्या आहेत. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुन्हा निर्बंध लादले आहेत. असे असले तरी सर्व व्यवहार सुरू असून, एसटी बसही सुरू झाल्या आहेत. शहरी भागात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काही गावांमध्ये अद्यापही बस सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना टमटमने प्रवास करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शहादा आगारातील एकूण बसेस : १०७

कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या : १०७

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या : ७०

या गावांना टमटमचा आधार : शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या वेळी नागरिकांना कुठं शहरी भागात जायचं असेल तर तालुक्यातील सुलतानपुर, खरगोन, कढेल, जयनगर, फेस, राणीपूर आदी गावांतील प्रवाश्यांना टमटमचा आधार घ्यावा लागत आहे.

२३ हजार कि.मी प्रवास; पण फक्त शहरांचाच : १)शहादा आगारासाठी १०७ पैकी ७० बस सुरू आहेत. या बसचा जवळपास २३ हजार ५०० किमीचा प्रवास सुरू असून जेमतेम डिझेलचा खर्च निघत आहे.

एकही बस ग्रामीण भागासाठी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

कोरोना काळात उत्पन्न निम्यावर आल्याने ग्रामीण भागात प्रतिसाद न मिळाल्याने २३ हजार ५०० किमीचा प्रवास फक्त शहरांचाच आहे.

‘राज्याने निर्बंध शिथिल केले व लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. अशात आगाराने एसटीच्या फेऱ्या ग्रामीण भागातदेखील सुरू केल्या होत्या. मात्र, त्यास प्रवासी प्रतिसाद न मिळाल्याने व डिझेलचा खर्च ही निघत नसल्याने काही फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. - योगेश लिंगायत, आगार प्रमुख शहादा

खेडेगावावरच अन्याय का ?

सध्या महाविद्यालय सुरू झाले असून, विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्याचबरोबर खाजगी वाहने वेळेवर भेटत नसल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून, महामंडळातर्फे ग्रामीण भागात एसटी सुरू करण्यात यावी. - देवा पवार, मुबारकपूर, ता.शहादा

शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी बसेस आहेत. परंतु, ग्रामीण भागातील सेवा अद्यापही बंद आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने सुरू करावी. - कल्पेश भोसले, राणीपूर, ता.शहादा प्रवासी