शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

दहा रुपयांमध्ये चप्पल मिळते का हो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

नंदुरबार : ‘गावाला असेल कोणताही सवाल उत्तर देईल कोतवाल’ अशी सर्वसाधारण धारणा महसूल अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आहे. ...

नंदुरबार : ‘गावाला असेल कोणताही सवाल उत्तर देईल कोतवाल’ अशी सर्वसाधारण धारणा महसूल अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आहे. यातून प्रशासन आणि ग्रामीण जनता यांच्यात मुख्य दुवा म्हणून कोतवालाची महती सर्वश्रुत आहे. परंतु ब्रिटीश काळापासून काम करणारा कोतवाल गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुुंज्या अशा मानधनावर काम करीत आहे. यात विशेष म्हणजे गावभर हिंडून प्रशासनासाठी चप्पल झिजवणाऱ्या कोतवालाला नवीन चपलेसाठी फक्त १० रुपये भत्ताच दिला जातो.

ब्रिटीश काळात निर्माण झालेले कोतवाल हे पद गावाला दिशा देण्याचे काम करते. कालांतराने महसुली वसुलीसाठी कोतवालांची मदत होऊ लागल्याने त्यांना तलाठ्यानंतरचा दर्जा दिला गेला. या काेतवालांना गावस्तरावर काम करण्यासाठी साडेसात ते १० हजार रुपयांचे मानधन दिले जाते. या मानधनातच १० रुपयांचा अनोखा असा चप्पल भत्ताही दिला जातो. महागाईचे आकडे आसमंताकडे जात असताना १० रुपयांच्या भत्त्याचे करावे तरी काय, असा प्रश्न कोतवाल उपस्थित करतात.

जिल्ह्यात काम करणाऱ्या कोतवालांची पदोन्नती ही आणखी एक महत्त्वाची मागणी आहे. अनेक कोतवाल हे शिक्षित आहेत. यामुळे त्यांना महसूल विभागातील इतर विभागात नोकरीची संधी देण्याची गरज आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एकीकडे पदोन्नतीची मागणी असताना जिल्ह्यात कोतवालांची एकूण ६० पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहेत. सर्वाधिक रिक्त जागा ह्या शहादा तालुक्यात असून त्याखालोखाल नंदुरबार तालुक्यात रिक्त पदे आहेत.

कामांची यादी भली मोठी ..

तलाठीचा मदतनीस म्हणून कोतवाल काम करतो. गावस्तरावर महसुली योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांना मदत करतो.

दुष्काळ, अतिवृष्टी, शेतीचे नुकसान झाल्यास शेतात जाऊन पंचनामा करण्यासाठी मदत करणे.

दुष्काळ यादी, आपत्कालीन स्थितीत गावातील नुकसानाची माहिती प्रशासनाला देणे, ग्रामीण विकासाच्या शासकीय योजनांची माहिती प्रशासनाला देत लाभार्थीची माहिती सज्ज करून ठेवणे.

१९८२ पासून वाढला नाही भत्ता

कोतवालांना १० रुपये चप्पल भत्ता दिला जातो. १९८२ सालापासून चप्पल भत्त्यात वाढ झाली नसल्याचे कोतवाल संघटनेचे नंदुरबार तालुकाध्यक्ष हर्षल सावंत यांनी सांगितले. आजच्या काळात १० रुपयात चप्पल मिळते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कोतवालांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा संघटना कार्यरत असून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांच्याकडून देण्यात आली.

महागाई सातत्याने वाढत आहे. गावांचा विस्तारही वाढत आहे. कोतवालांना महसुली कामांसाठी तालुक्याला जावे लागते. पेट्रोलचे दर वाढले आहेत. कोतवालांच्या मुलांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करण्यासाठी लढा सुरू आहे. वेतनवाढ हा मुख्य प्रश्न आहे तो सोडवला गेला पाहिजे. महसूल विभागाचा एक प्रमुख घटक म्हणून कोतवालांची शासनदरबारी नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार वेतन मिळावे.

- कोतवाल संघटना

कोतवालांच्या मानधनात वाढच झालेली नाही. हा प्रश्न सातत्याने संघटना मांडत आली आहे. महसूल विभागाने याकडे लक्ष दिले पाहिजे. कोतवाल म्हणून पूर्णवेळ काम करत असल्याने त्या व्यक्तींना पूर्णपणे शासकीय लाभ देण्याची अपेक्षा आहे.

- हर्षल सावंत, तालुकाध्यक्ष, नंदुरबार.