शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

दहा रुपयांमध्ये चप्पल मिळते का हो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

नंदुरबार : ‘गावाला असेल कोणताही सवाल उत्तर देईल कोतवाल’ अशी सर्वसाधारण धारणा महसूल अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आहे. ...

नंदुरबार : ‘गावाला असेल कोणताही सवाल उत्तर देईल कोतवाल’ अशी सर्वसाधारण धारणा महसूल अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आहे. यातून प्रशासन आणि ग्रामीण जनता यांच्यात मुख्य दुवा म्हणून कोतवालाची महती सर्वश्रुत आहे. परंतु ब्रिटीश काळापासून काम करणारा कोतवाल गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुुंज्या अशा मानधनावर काम करीत आहे. यात विशेष म्हणजे गावभर हिंडून प्रशासनासाठी चप्पल झिजवणाऱ्या कोतवालाला नवीन चपलेसाठी फक्त १० रुपये भत्ताच दिला जातो.

ब्रिटीश काळात निर्माण झालेले कोतवाल हे पद गावाला दिशा देण्याचे काम करते. कालांतराने महसुली वसुलीसाठी कोतवालांची मदत होऊ लागल्याने त्यांना तलाठ्यानंतरचा दर्जा दिला गेला. या काेतवालांना गावस्तरावर काम करण्यासाठी साडेसात ते १० हजार रुपयांचे मानधन दिले जाते. या मानधनातच १० रुपयांचा अनोखा असा चप्पल भत्ताही दिला जातो. महागाईचे आकडे आसमंताकडे जात असताना १० रुपयांच्या भत्त्याचे करावे तरी काय, असा प्रश्न कोतवाल उपस्थित करतात.

जिल्ह्यात काम करणाऱ्या कोतवालांची पदोन्नती ही आणखी एक महत्त्वाची मागणी आहे. अनेक कोतवाल हे शिक्षित आहेत. यामुळे त्यांना महसूल विभागातील इतर विभागात नोकरीची संधी देण्याची गरज आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एकीकडे पदोन्नतीची मागणी असताना जिल्ह्यात कोतवालांची एकूण ६० पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहेत. सर्वाधिक रिक्त जागा ह्या शहादा तालुक्यात असून त्याखालोखाल नंदुरबार तालुक्यात रिक्त पदे आहेत.

कामांची यादी भली मोठी ..

तलाठीचा मदतनीस म्हणून कोतवाल काम करतो. गावस्तरावर महसुली योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांना मदत करतो.

दुष्काळ, अतिवृष्टी, शेतीचे नुकसान झाल्यास शेतात जाऊन पंचनामा करण्यासाठी मदत करणे.

दुष्काळ यादी, आपत्कालीन स्थितीत गावातील नुकसानाची माहिती प्रशासनाला देणे, ग्रामीण विकासाच्या शासकीय योजनांची माहिती प्रशासनाला देत लाभार्थीची माहिती सज्ज करून ठेवणे.

१९८२ पासून वाढला नाही भत्ता

कोतवालांना १० रुपये चप्पल भत्ता दिला जातो. १९८२ सालापासून चप्पल भत्त्यात वाढ झाली नसल्याचे कोतवाल संघटनेचे नंदुरबार तालुकाध्यक्ष हर्षल सावंत यांनी सांगितले. आजच्या काळात १० रुपयात चप्पल मिळते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कोतवालांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा संघटना कार्यरत असून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांच्याकडून देण्यात आली.

महागाई सातत्याने वाढत आहे. गावांचा विस्तारही वाढत आहे. कोतवालांना महसुली कामांसाठी तालुक्याला जावे लागते. पेट्रोलचे दर वाढले आहेत. कोतवालांच्या मुलांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करण्यासाठी लढा सुरू आहे. वेतनवाढ हा मुख्य प्रश्न आहे तो सोडवला गेला पाहिजे. महसूल विभागाचा एक प्रमुख घटक म्हणून कोतवालांची शासनदरबारी नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार वेतन मिळावे.

- कोतवाल संघटना

कोतवालांच्या मानधनात वाढच झालेली नाही. हा प्रश्न सातत्याने संघटना मांडत आली आहे. महसूल विभागाने याकडे लक्ष दिले पाहिजे. कोतवाल म्हणून पूर्णवेळ काम करत असल्याने त्या व्यक्तींना पूर्णपणे शासकीय लाभ देण्याची अपेक्षा आहे.

- हर्षल सावंत, तालुकाध्यक्ष, नंदुरबार.