शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील मतदानातील घट कोणाच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 12:42 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात अडीच टक्यांनी मतदान कमी ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात अडीच टक्यांनी मतदान कमी झाले आहे. यामुळे भाजपने गेल्या निवडणुकीत घेतलेले तब्बल 50 हजाराचे मताधिक्य टिकवून ठेवते  किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, यंदा मतदारांची संख्या गेल्या निवडणुकीपेक्षा 35 हजार 561 इतकी वाढूनही मतदान कमी झाल्याने भाजप व काँग्रेस देखील चिंतन करू लागले आहेत.   नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचा विचार करता नंदुरबार तालुक्यासह शहादा तालुक्यातील तापी पट्टयातील गावांचा समावेश यात आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील स्थानिक राजकारणाचा बराच प्रभाव मतदार संघावर पडत असतो. यंदा देखील तो दिसून आला. परिणामी भाजप व काँग्रेसनेही या मतदारसंघात मोठी मेहनत घेतली. भाजपच्या डॉ.हिना गावीत यांनी गेल्या निवडणुकीत मिळविलेले 50 हजार 55 चे मताधिक्य कायम ठेवण्यासाठी पक्षाने मेहनत घेतली तर हे मताधिक्यच मिळू नये यासाठी काँग्रेसने गाव आणि मतदार पातळीवर प्रचार करून प्रय} केला आहे. त्यातच गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अडीच टक्यांनी मतदान कमी झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये आत्मचिंतन सुरू झाले आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी चार महिन्यांनी पाच महिन्यांनी येणा:या विधानसभा निवडणुकीचीही मशागत या निमित्ताने करून घेतली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जे काही नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते होते त्यांना जवळ करून घेतले. परंतु मतदारसंघातील पक्षाअंतर्गत नंदुरबार व शहादा तालुका हा छुपा गट निर्माण झाल्याचे देखील दिसून आले. त्यामुळे येत्या काळात याबाबत आमदार डॉ.गावीत यांना काम करावे लागणार आहे.दुसरीकडे काँग्रेसने मतदारसंघातील आपल्या कार्यकत्र्याचे जाळे अधीक घट्ट करण्याचा प्रय} या माध्यमातून करून घेतला, गेल्या निवडणुकीतील भाजपचे तब्बल 50 हजारांचे मताधिक्य कमी व्हावे यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. नंदुरबार शहरात देखील लोकसभा निवडणुकीत भाजपला नेहमीच मिळणारा लीड यंदा काँग्रेसला मिळावा यासाठी पुरेपूर प्रय} केले. शेवटच्या टप्प्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहरात घेतलेल्या दोन सभा आणि कार्यकत्र्याना कामाला लावल्यामुळे काँग्रेसला शहरात लीड मिळण्याची आशा आहे. भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांनी देखील काही प्रमाणात मते घेतल्याची शक्यता आहे. त्याचा फटका भाजप की काँग्रेसला बसतो याकडेही लक्ष लागून आहे. युती । प्लस पॉईंट काय आहेत?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली जाहीर सभा ब:याच प्रमाणात वातावरण निर्मिती करून गेली होती. शिवाय आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा स्वत:चा मतदारसंघ असल्यामुळे तो फायदाही भाजपला मिळण्याची आशा आहे. मागच्या निवडणुकीत़़़लोकसभा निवडणुकीत 50 हजारांचे मताधिक्य होते. तर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार विजयकुमार गावीत यांनी काँग्रेसचे कुणाल वसावे यांचा 40 हजार मतांनी पराभव केला होता.  आघाडी । प्लस पॉईंट काय आहेत?नंदुरबार शहरात काँग्रेसने घेतलेली मेहनत, शेवटच्या टप्प्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या झालेल्या सभा आणि घेतलेली मेहनत पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. शिवाय गावोगाव प्रचारावर दिलेला भर.आघाडी । वीक पॉईंट काय आहेत?  एकाही स्टार प्रचारकाची न घेतलेली सभा, राहुल गांधी यांची जाहीर झालेली सभा ऐनवेळी रद्द होणे, शहादा तालुक्यातील तापी पट्टयातील गावांमध्ये कमी मेहनत.2014 च्या लोकसभा निवडणुकीत 64.23 टक्के मतदान झाले होते. ते तोर्पयतच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक होते.2019 च्या निवडणुकीत 62.39 टक्के मतदान झाले. त्यात पुरुषांचे 1,09,447 तर महिलांचे 1,00,299 इतके मतदान झाले आहे.