शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कुणी मतदान करणार का.. मतदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 17:58 IST

अक्कलकुवा ग्रामपंचायत : प्रभाग चारमध्ये उमेदवार सहा, मतदार मात्र शून्य

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘या तुफानाला कुणी घर देता का,  घर..’ नटसम्राट या नाटकामधील आप्पा बेलवणकर यांच्या अवस्थेसारखीच काहीशी अवस्था अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील प्रभाग चारमधील उमेदवारांची झाली आहे. या प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात सहा उमेदवार असले तरी प्रत्यक्षात मात्र येथे एकही मतदार नसल्याने मतदान मागावे कुणाकडे असा प्रश्न या उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे.नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हे तालुक्याचे मुख्यालय. याठिकाणी शासनाने नगरपंचायत स्थापन करण्याचा निर्णय दीड वर्षापूर्वी घेतला होता. मात्र त्याबाबत नागरिकांनी हरकती घेतल्याने नगरपंचायत स्थापनेचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याठिकाणी सध्या पूर्वीचीच ग्रामपंचायत गृहीत धरून निवडणूक जाहीर केली आहे.अक्कलकुवा या शहराची लोकसंख्या तशी 24 हजाराच्यावर आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना प्रशासनाने नियमानुसार व लोकसंख्येचा निकष गृहीत धरून प्रभाग जाहीर केले. याठिकाणी एकूण सहा प्रभाग आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र मतदार नऊ हजार 732 आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग जाहीर झाले असले तरी प्रभाग चारमध्ये एकही मतदाराची नोंदणी झालेली नाही. हा भाग तसा जामिया महाविद्यालयाच्या परिसराचा आहे. याठिकाणी विद्यार्थी मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहेत. जनगणनेत त्यांची नोंदणी झाली असली तरी मतदानासाठी मात्र तेथील विद्याथ्र्यानी व कर्मचा:यांनी आपापल्या मूळगावी नाव नोंदणी केल्याने या प्रभागात एकही मतदाराची नोंदणी नाही.एकीकडे या प्रभागात मतदार नसले तरी निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रभाग चारसाठीही उमेदवारी अर्ज भरण्यात आले. ही अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन होती. या प्रभागातून सहा उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. माघारीच्या मुदतीनंतरही हे सहाही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या 7 ऑक्टोबरला तेथे मतदान होणार आहे. गावात सर्वत्र निवडणुकीसाठी प्रचार सुरू असला तरी प्रभाग चारमधील उमेदवारांना मतदान मागण्यासाठी कुणाकडे जावे, असा प्रश्न पडला आहे.संपूर्ण गावालाही या प्रभागातील मतदानाचे काय होईल याबाबत उत्सुकता लागली आहे. दरम्यान, प्रशासनाने यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळवले असून या प्रभागातील मतदानाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. आता सर्वाचे लक्ष निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लागून आहे.

आमच्या प्रभागात एकही मतदार नसल्याने मतदान मागण्यासाठी कुणाकडे जावे असा प्रश्न पडला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे जाब विचारला असता त्याबाबतची उत्तरे मिळत नाही. निवडणूक आयोगाकडे याबाबत प्रशासनाने कळविले असल्याचे सांगण्यात येते. आता पाहू या काय निर्णय होतो.     -जयप्रकाश परदेशी, प्रभाग चारमधील उमेदवार

निवडणुकीसाठी अर्ज तर भरला पण संपूर्ण गावात प्रचार चालू असताना आम्हाला मात्र शांत बसावे लागत आहे. दुस:या उमेदवारांच्या प्रभागात जाऊन त्यांचा प्रचार आम्ही सध्या करीत आहोत. आमचे काय होईल हा प्रश्न मात्र नेहमीच सतावतो.     -बलोच अ.ह. गुलाम कादर, प्रभाग चारमधील उमेदवार