शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कुणी मतदान करणार का.. मतदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 17:58 IST

अक्कलकुवा ग्रामपंचायत : प्रभाग चारमध्ये उमेदवार सहा, मतदार मात्र शून्य

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘या तुफानाला कुणी घर देता का,  घर..’ नटसम्राट या नाटकामधील आप्पा बेलवणकर यांच्या अवस्थेसारखीच काहीशी अवस्था अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील प्रभाग चारमधील उमेदवारांची झाली आहे. या प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात सहा उमेदवार असले तरी प्रत्यक्षात मात्र येथे एकही मतदार नसल्याने मतदान मागावे कुणाकडे असा प्रश्न या उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे.नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हे तालुक्याचे मुख्यालय. याठिकाणी शासनाने नगरपंचायत स्थापन करण्याचा निर्णय दीड वर्षापूर्वी घेतला होता. मात्र त्याबाबत नागरिकांनी हरकती घेतल्याने नगरपंचायत स्थापनेचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याठिकाणी सध्या पूर्वीचीच ग्रामपंचायत गृहीत धरून निवडणूक जाहीर केली आहे.अक्कलकुवा या शहराची लोकसंख्या तशी 24 हजाराच्यावर आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना प्रशासनाने नियमानुसार व लोकसंख्येचा निकष गृहीत धरून प्रभाग जाहीर केले. याठिकाणी एकूण सहा प्रभाग आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र मतदार नऊ हजार 732 आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग जाहीर झाले असले तरी प्रभाग चारमध्ये एकही मतदाराची नोंदणी झालेली नाही. हा भाग तसा जामिया महाविद्यालयाच्या परिसराचा आहे. याठिकाणी विद्यार्थी मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहेत. जनगणनेत त्यांची नोंदणी झाली असली तरी मतदानासाठी मात्र तेथील विद्याथ्र्यानी व कर्मचा:यांनी आपापल्या मूळगावी नाव नोंदणी केल्याने या प्रभागात एकही मतदाराची नोंदणी नाही.एकीकडे या प्रभागात मतदार नसले तरी निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रभाग चारसाठीही उमेदवारी अर्ज भरण्यात आले. ही अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन होती. या प्रभागातून सहा उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. माघारीच्या मुदतीनंतरही हे सहाही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या 7 ऑक्टोबरला तेथे मतदान होणार आहे. गावात सर्वत्र निवडणुकीसाठी प्रचार सुरू असला तरी प्रभाग चारमधील उमेदवारांना मतदान मागण्यासाठी कुणाकडे जावे, असा प्रश्न पडला आहे.संपूर्ण गावालाही या प्रभागातील मतदानाचे काय होईल याबाबत उत्सुकता लागली आहे. दरम्यान, प्रशासनाने यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळवले असून या प्रभागातील मतदानाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. आता सर्वाचे लक्ष निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लागून आहे.

आमच्या प्रभागात एकही मतदार नसल्याने मतदान मागण्यासाठी कुणाकडे जावे असा प्रश्न पडला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे जाब विचारला असता त्याबाबतची उत्तरे मिळत नाही. निवडणूक आयोगाकडे याबाबत प्रशासनाने कळविले असल्याचे सांगण्यात येते. आता पाहू या काय निर्णय होतो.     -जयप्रकाश परदेशी, प्रभाग चारमधील उमेदवार

निवडणुकीसाठी अर्ज तर भरला पण संपूर्ण गावात प्रचार चालू असताना आम्हाला मात्र शांत बसावे लागत आहे. दुस:या उमेदवारांच्या प्रभागात जाऊन त्यांचा प्रचार आम्ही सध्या करीत आहोत. आमचे काय होईल हा प्रश्न मात्र नेहमीच सतावतो.     -बलोच अ.ह. गुलाम कादर, प्रभाग चारमधील उमेदवार