शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

रस्त्यावर विखुरलेले पांढरं सोनं देतेय अनेकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस हे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देणारे पीक. पण वाहतुकी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस हे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देणारे पीक. पण वाहतुकी दरम्यान रस्त्यावर पडलेले हेच पांढरं सोनं अनेकांना रोजगाराचे साधन बनले आहे.खान्देशात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेजारील गुजरात राज्यात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग जास्त असल्याने खान्देशात उत्पादीत होणाºया कापसाला गुजरात राज्यात मोठी मागणी आहे. खान्देशातील धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस अनेक व्यापारी अंकलेश्वर-बºहाणपूर राज्यमार्गाने गुजरातमध्ये वाहतूक करतात. वाहतुकीच्या दरम्यान रस्त्याची दुरवस्था हवेचा दाब, वाहनांचा वेग व अन्य कारणांमुळे वाहनात भरलेल्या कापसाची बांधणी सैल होते. त्यामुळे वाहनातून काही प्रमाणात कापूस रस्त्यावर पडत जातो. दिवसभर कापसाने भरलेली शेकडो वाहने या रत्यावर धावतात. त्यामुळे थोडा-थोडा करून बराच कापूस रस्त्यावर व रस्त्यालगत पडतो. रात्री अनेक वाहनात भरलेल्या कापसाची बांधणी सुटली तर अंधारात हा प्रकार वाहन चालक व सहचलकाच्या लक्षात येत नसल्याने अनेक वाहनांतून मोठ्या प्रमाणात कापूस खाली पडतो. रस्त्यावर पडलेला हा कापूस अनेकांच्या नजरेत भरत नसला तरी अंकलेश्वर-बºहाणपूर राज्यमार्गावर वसलेल्या गावातील काही जणांनी या कापसाला आपल्या रोजगाराचे साधन बनवले आहे. रस्त्यावर विखुरलेला हा कापूस गोळा करून त्याला स्वच्छ करून त्यातून हजारो रुपयांचे उत्पन्न घेतले जात आहे.तळोदापासून ते खापरपर्यंत सकाळच्या सत्रात सहा ते नऊ वाजेदरम्यान काही जण हा कापूस वेचताना रस्त्यालगत दिसतात. त्यांच्याशी संवाद साधला असता दिवसाला पाच ते सहा किलो कापूस अवघ्या आठ ते दहा किलोमीटर परिसरात सहज गोळा होत असल्याचे ते सांगतात. रस्त्यावर पडलेल्या या कापसाला चिटकलेली धूळ, माती व कचरा वेगळे करण्यात येते. नंतर या कापसाला एक-दोन दिवस उन्हात वाळवून त्याची बाजारात विक्री करण्यात येते. साधारण ४० ते ४५ रुपये प्रतीकिलो दराने हा कापूस बाजारात विकत घेतला जातो. वाहनातून रस्त्यावर पडणाºया व सर्वांच्या नजरेतून दुर्लक्षित राहणाºया कापसाला अनेकांनी आपल्या कमाईचे साधन बनविले आहे.

रस्त्यावर पडलेल्या या कापसाला स्वछ करून अनेक जणांनी हजारो रुपयांचे उत्पन्न घेतल्याची उदाहरणे आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील खापर नजीक असलेल्या कौलीगव्हाण या गावातील अत्र्या गोड्या वसावे हे नव्वदी पार केलेल्या वृद्ध दररोज रत्यावर व रस्त्यालगत पडलेला कापूस नित्यनियमाने गोळा करतात. त्यामुळे ते सर्वांचे आकर्षण व कुतूहलाचा विषय बनले आहेत. खापर ते अक्कलकुवा दरम्यान आठ ते दहा किलोमीटर अंतरात ते दिवसाला तब्बल सात ते आठ किलो कापूस गोळा करीत असून मागील अनेक वर्षापासून ते हे काम करीत असल्याचे सांगतात. त्यांच्यातला उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.