शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

जिल्ह्यात कन्या जन्माचे स्वागत; जन्मदर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

नंदुरबार : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्याचा जन्मदर आहे. २१.१ टक्के आहे. कोरोना काळात हा दर १९ टक्के ...

नंदुरबार : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्याचा जन्मदर आहे. २१.१ टक्के आहे. कोरोना काळात हा दर १९ टक्के एवढा झाला होता. यात जिल्ह्याचे स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर हे समाधानकारक असून, २०११च्या जनगणनेनुसार १,००० हजार पुरुषांमागे जिल्ह्यात ९९६ स्त्रिया असल्याची माहिती आहे.

आकांक्षित आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात मातांच्या प्रसूतीसाठी असंख्य अडचणींना तिचे कुटुंबीय तोंड देतात. यातून अर्भकबळी आणि गरोदर मातांच्या मृत्यू होण्याचे प्रमाण वाढीस लागते. यावर पर्यायी मार्ग म्हणून आरोग्य विभागाकडून नवीसंजीवनीसारखी योजना राबवून मातांची नोंदणी करत, वेळोवेळी तपासणी केली जात आहे. यातून अर्भक मृत्यूचे प्रमाण घटल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोना काळात इतर वैद्यकीय सुविधांवर बंधने आली असताना, जिल्ह्यात मात्र मातांच्या प्रसूती नियमित सुरू ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले होते. या प्रसूतीत स्त्री आणि पुरुष अर्भकांचे जन्म कमी अधिक प्रमाणात झाले असल्याने, लिंगगुणोत्तर कमी-जास्त होत असल्याचे दिसून आले होते, परंतु लिंगगुणोत्तर खालावल्याचे चित्र जिल्ह्यात नाही. नागरिकांकडून मुलांसोबतच मुलींच्या जन्माचे हर्षोल्हासात स्वागत होत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याचे कठोर पालन होत असल्याने, गर्भलिंग निदान होण्याचे प्रकारही बंद असल्याचे दिसून येत आहे. सर्व ठिकाणी मशीन तपासणी केली जाते.

लिंगनिदानाला बंदी

लिंगनिदानाला बंदी असून, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत यात कारवाई केली जाते. दरम्यान, जिल्ह्यात ही समितीही असून, त्यांची बैठक जिल्हा शल्यचिकित्सकांकडे होत असते.

जिल्हा रुग्णालयात हा विभाग आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाते, शिवाय विविध योजना यासाठी कार्यरत आहेत.

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर हा चांगला आहे. आरोग्य विभागाकडून योग्य त्या पद्धतीने कामकाज करण्यात येत आहे. मातांच्या नोंदण्या करून, त्यांना साहाय्य करत प्रसूतीसाठी आरोग्य यंत्रणेकडे पाठविले जाते.

- डॉ.महेंद्र चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी.

दरवर्षी वाढती संख्या

जिल्ह्यात दरवर्षी जन्मसंख्या वाढती राहिली आहे. २०१७ या वर्षात १४ हजार ४७५ पुरुष तर १३ हजार ३६७ स्त्री अर्भकांचा जन्म झाला.

२०१८ या वर्षात १५ हजार ८६१ पुरुष तर १४ हजार ४४१ स्त्री अर्भकांचा जन्म झाला.

२०१९ या वर्षात १४ हजार पुरुष तर १३ हजार ३९८ स्त्री अर्भकांचा जन्म झाला होता.

२०२० या वर्षात १५ हजार ९२९ पुरुष तर १५ हजार ९४२ स्त्री अर्भकांचा जन्म झाला आहे.

चालू वर्षातही जन्मदर झालाय स्थिर

जानेवारी ते ऑगस्ट, २०२१ या काळात एकूण ३० हजार ९४९ बाळांचा जन्म झाल्याची आकडेवारी आहे. यात १५ हजार ८५३ पुरुष तर १५ हजार ९६ स्त्री अर्भकांचा जन्म झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मातांच्या नोंदण्या करण्यावर वेळोवेळी भर देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.