शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ‘साडेआठ लाख’ बालकांचे ‘वेट लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:46 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच अंगणवाड्या सध्या बंद असल्याने दोन महिन्यांपासून अंगणवाडीतील बालकांची ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच अंगणवाड्या सध्या बंद असल्याने दोन महिन्यांपासून अंगणवाडीतील बालकांची वजन-उंची घेण्याची प्रक्रिया थांबली आहे. विशेषत: मार्च ते मे हा कुपोषणाचा हॉट पिरीयड मानला जातो. याच काळात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण व देखभालीच्या प्रक्रियेलाही मर्यादा आल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कोरोनामुळे गेल्या पावणेदोन महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन आहे. साहजिकच सर्वच व्यवहार बंद झाले आहेत. शाळा-महाविद्यालयांप्रमाणे अंगणवाड्याही बंद आहेत. खास करून अंगणवाड्यातील बालकांवर मार्च ते जून या काळात अधिक लक्ष केंद्रीत करावे लागते. याच काळात कुपोषणाचे प्रमाणही वाढत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. अशा स्थितीतच कोरोनामुळे दोन महिन्यांपासून अंगणवाडींमधील बालकांचे वजन घेणे, उंची मोजणे तसेच रोजचा पोषण आहार, आरोग्य तपासणी व इतर उपाययोजना सर्वच बंद झाले आहे. काही प्रक्रिया सुरू असल्या तरी त्या अनियमित झाल्या आहेत.राज्यात अंगणवाडींमध्ये जवळपास साडेआठ लाखांपेक्षा अधिक बालकांचे नियमित वजन घेतले जाते. दर महिन्याला बालकांची वजन व उंची मोजून त्यानुसार सॅम आणि मॅमच्या बालकांचा दर्जा ठरवला जातो. कमी वजन असलेल्या बालकांची विशेष काळजी घेऊन त्याचे वजन कसे वाढेल याकडे लक्ष घातले जाते. कुपोषित बालकांना सर्वसाधारण बालकांच्या गटात आणण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यात सद्यस्थितीत अतीतिव्र कुपोषित ४१ हजारपेक्षा अधिक बालके आहेत. तर मध्यम कुपोषित दीड लाखाहून अधिक बालके आहेत. शिवाय सर्वसाधारण गटात साडेसहा लाखाहून अधिक बालके आहेत. या बालकांवरील प्रशासनाचे नियंत्रण गेल्या दोन महिन्यांपासून दुरावले आहे. लॉकडाऊनमुळे पोषण आहारचा पुरवठा बालकांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्याचा दावा प्रशासनाचा असला तरी दुर्गम-अतिदुर्गम भागात तो सर्वांपर्यंत पोहोचला की नाही, पोहोचला असेल तर घरी या बालकांना अंगणवाडीमध्ये जसा नियंत्रित पद्धतीने आहार दिला जातो तसा दिला गेला की नाही? बालकाच्या वयोमानाच्या टप्प्यावर दिले जाणाऱ्या लसी दिल्या गेल्या नाहीत, यावेळी अंगणवाडीत बालकाच्या आरोग्याच्या तपासणीबाबत निर्णय होतो ती प्रक्रिया थांबली आहे. अशा कितीतरी कारणांमुळे बहुतांश बालके कमी वजनाच्या गटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनमुळे अंगणवाड्यांमधील वजन व उंची घेण्याचे काम बंद आहे़ तसेच दरवर्षी एप्रिल महिन्यात नवीन बालकांचे सर्वेक्षण केले जाते़ ते कामही यंदा होवू शकलेले नाही़ राज्यशासनाचे नुकतेच अंगणवाडी केंद्र क्वारंटाईन कक्षासाठी वापरु नये असे आदेश आले आहेत़ बालकांचे वजन व उंची सध्याच्या परिस्थितीत कशा प्रकारे घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून प्राप्त होताच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली़