शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

तळोद्यात पार पडले बॅण्डविना लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : लग्नकार्यासाठी होणारा अवास्तव खर्च कमी करण्यासाठी तळोद्यात माळी समाजातर्फे अनावश्यक खर्चाचा उपक्रम बंद करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : लग्नकार्यासाठी होणारा अवास्तव खर्च कमी करण्यासाठी तळोद्यात माळी समाजातर्फे अनावश्यक खर्चाचा उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे पालन करीत बॅँडविना लग्न पार पाडणाऱ्या वधू व वर नित्यांचा सत्कार करण्यात आला.समाज एक असला तरी समाजातील बहुतांश कुटुंब हे आर्थिक दुर्बल घटकातील असतात. अशा कुटुंबांना मुला-मुलींचे लग्न जुळवून देण्यासाठी करावा लागणारा अनावश्यक खर्च परवडत नाही. त्यासाठी कुटुंबाला कर्जबाजारी देखील व्हावे लागते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी माळी समाजाने मागील महिन्यात सभा घेत लग्नातील अनावश्यक खर्च कमी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यात लग्नाच्या आधी बॅँड न बाजविण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता.समाजाच्या या निर्णयाचे पालन करीत तळोदा शहरातील चेतना अजित पवार व परेजकुमार प्रभाकर टवाळे यांचे लग्न ठरलेल्या वेळेतच पार पडले. परंतु हे लग्न लावतांना वधू व वरपित्यांकडून बॅँडचा फारसा अवलंब करण्यात आला नाही. त्यामुळे समाजामार्फत घेण्यात आलेल्या ठरावानुसार दोन्ही मंडळींकडून या लग्नात अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निर्णयाचे अन्य समाजाकडूनही कौतुक करण्यात आले होते. या लग्नाच्या माध्यमातून समाजाने घेतलेल्या निर्णयांचे पालन केले म्हणून वधू व वरपित्यांचा माळी समाजातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, माळी समाजाचे अध्यक्ष अरविंद मगरे, लक्ष्मण माळी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गोविंद पाटील, व्यवस्थापक संजय चौधरी आदी उपस्थित होते.