शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

व्हॉट्सॲपद्वारे लग्नाचे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

जयनगर : कोरोना महामारीमुळे माणसाच्या जीवन शैलीत खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक रीतीरिवाज, प्रथा इत्यादी माणसाला ...

जयनगर : कोरोना महामारीमुळे माणसाच्या जीवन शैलीत खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक रीतीरिवाज, प्रथा इत्यादी माणसाला बदलावे लागले. कोरोना काळातील लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे लग्नकार्यातील पत्रिका छापण्याची प्रथा बंद झाली असून, व्हाॅट्सॲपद्वारे लोकांना लग्नाची निमंत्रणपत्रिका पाठवली जात आहे. त्यामुळे भविष्यात लग्नपत्रिका छापणे इतिहास जमा होणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना महामारीमुळे अनेक गोष्टी माणसाने स्वतःहून बंद अथवा परिस्थितीनुसार बदलल्या आहेत. पूर्वी ज्या घरी लग्नकार्य असायचे तेथे शेकडोंच्या संख्येने पत्रिका नातेवाइकांना व आप्तस्वकीयांना वाटण्यासाठी छापल्या जायच्या; परंतु आता सोशल मीडियाच्या जमान्यात लग्नपत्रिका छापणे मागे पडू लागले आहे. मागील १५ महिन्यांच्या कालावधीत घराघरात लग्नपत्रिका मिळणे मुश्कील झाले आहे. कोरोना महामारीच्या अगोदर प्रत्येक घरात लग्नपत्रिकांचा खच साचायचा. दरवर्षी कमीत कमी २० ते जास्तीत जास्त ४०-५० लग्नांच्या निमंत्रणपत्रिका प्रत्येक घरी हमखास येत असायच्या. ज्याठिकाणी लग्नकार्याला जायचे आहे, त्या पत्रिका तारखेनुसार प्रत्येकाच्या घरी लावल्या जात असत. ज्यांच्या घरी लग्नकार्य असायचे ते वेगवेगळ्या रंगांचे, डिझाइनचे पत्रिका छापण्यावर भर द्यायचे. तीन रुपयांपासून ते जास्तीत जास्त १००-२०० रुपयांपर्यंत एकच पत्रिका छापली जायची. पत्रिकाच्या डिझाइनवरून किंवा पत्रिकेतील मजकुरावरून परिवाराच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधला जायचा. मात्र, आता पत्रिका छापली जात नसल्यामुळे लग्नकार्यातील या खर्चालाही आळा बसण्यास मदत झाली आहे.

सद्य:स्थितीत सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रिका छापणे पूर्णतः बंद झाले असून, पूर्वीप्रमाणे पत्रिका वाटण्यासाठी मोटारसायकलीवर जाणारेही आता दिसत नाहीत. त्यामुळे आता लोकांचा आर्थिक खर्च तर वाचलाच आहे. परिणामी, वेळेचीही मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. तसेच प्रवासात-उन्हातान्हात पत्रिका वाटप करणाऱ्या सदस्यांनाही त्रास व्हायचा. आता मोबाइलवरच व्हॉट्‌सॲपद्वारे नातेवाइकांना निमंत्रणपत्रिका पाठविली जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता व्हाॅट्सॲपच्या पत्रिकेत भाऊबंदकीचे नाव घेतले जात नाही. त्यामुळे पूर्वी पत्रिका छापताना भाऊबंदकीचे एखादे नाव सुटले तर ते कुटुंब नाराज व्हायचे. बदलत्या काळात सोशल मीडियाद्वारे निमंत्रणाची ही पद्धत सोयीस्कर वाटत असली तरी पूर्वीप्रमाणे प्रत्येक नातेवाइकाच्या घरी जाऊन निमंत्रणपत्रिका देऊन लग्नाला बोलावल्यामुळे जे प्रेमाचे नाते व जिव्हाळा जोपासला जायचा तो आता दुरावत चालला आहे.