शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

व्हॉट्सॲपद्वारे लग्नाचे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

जयनगर : कोरोना महामारीमुळे माणसाच्या जीवन शैलीत खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक रीतीरिवाज, प्रथा इत्यादी माणसाला ...

जयनगर : कोरोना महामारीमुळे माणसाच्या जीवन शैलीत खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक रीतीरिवाज, प्रथा इत्यादी माणसाला बदलावे लागले. कोरोना काळातील लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे लग्नकार्यातील पत्रिका छापण्याची प्रथा बंद झाली असून, व्हाॅट्सॲपद्वारे लोकांना लग्नाची निमंत्रणपत्रिका पाठवली जात आहे. त्यामुळे भविष्यात लग्नपत्रिका छापणे इतिहास जमा होणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना महामारीमुळे अनेक गोष्टी माणसाने स्वतःहून बंद अथवा परिस्थितीनुसार बदलल्या आहेत. पूर्वी ज्या घरी लग्नकार्य असायचे तेथे शेकडोंच्या संख्येने पत्रिका नातेवाइकांना व आप्तस्वकीयांना वाटण्यासाठी छापल्या जायच्या; परंतु आता सोशल मीडियाच्या जमान्यात लग्नपत्रिका छापणे मागे पडू लागले आहे. मागील १५ महिन्यांच्या कालावधीत घराघरात लग्नपत्रिका मिळणे मुश्कील झाले आहे. कोरोना महामारीच्या अगोदर प्रत्येक घरात लग्नपत्रिकांचा खच साचायचा. दरवर्षी कमीत कमी २० ते जास्तीत जास्त ४०-५० लग्नांच्या निमंत्रणपत्रिका प्रत्येक घरी हमखास येत असायच्या. ज्याठिकाणी लग्नकार्याला जायचे आहे, त्या पत्रिका तारखेनुसार प्रत्येकाच्या घरी लावल्या जात असत. ज्यांच्या घरी लग्नकार्य असायचे ते वेगवेगळ्या रंगांचे, डिझाइनचे पत्रिका छापण्यावर भर द्यायचे. तीन रुपयांपासून ते जास्तीत जास्त १००-२०० रुपयांपर्यंत एकच पत्रिका छापली जायची. पत्रिकाच्या डिझाइनवरून किंवा पत्रिकेतील मजकुरावरून परिवाराच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधला जायचा. मात्र, आता पत्रिका छापली जात नसल्यामुळे लग्नकार्यातील या खर्चालाही आळा बसण्यास मदत झाली आहे.

सद्य:स्थितीत सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रिका छापणे पूर्णतः बंद झाले असून, पूर्वीप्रमाणे पत्रिका वाटण्यासाठी मोटारसायकलीवर जाणारेही आता दिसत नाहीत. त्यामुळे आता लोकांचा आर्थिक खर्च तर वाचलाच आहे. परिणामी, वेळेचीही मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. तसेच प्रवासात-उन्हातान्हात पत्रिका वाटप करणाऱ्या सदस्यांनाही त्रास व्हायचा. आता मोबाइलवरच व्हॉट्‌सॲपद्वारे नातेवाइकांना निमंत्रणपत्रिका पाठविली जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता व्हाॅट्सॲपच्या पत्रिकेत भाऊबंदकीचे नाव घेतले जात नाही. त्यामुळे पूर्वी पत्रिका छापताना भाऊबंदकीचे एखादे नाव सुटले तर ते कुटुंब नाराज व्हायचे. बदलत्या काळात सोशल मीडियाद्वारे निमंत्रणाची ही पद्धत सोयीस्कर वाटत असली तरी पूर्वीप्रमाणे प्रत्येक नातेवाइकाच्या घरी जाऊन निमंत्रणपत्रिका देऊन लग्नाला बोलावल्यामुळे जे प्रेमाचे नाते व जिव्हाळा जोपासला जायचा तो आता दुरावत चालला आहे.