शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST

कोरोनामुळे यावर्षी सगळीकडे घरगुती व साध्या पद्धतीने विवाह साेहळे पार पडत आहेत. त्यामुळे लग्नातील लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च ...

कोरोनामुळे यावर्षी सगळीकडे घरगुती व साध्या पद्धतीने विवाह साेहळे पार पडत आहेत. त्यामुळे लग्नातील लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च टाळला जात आहे. बॅण्डपासून ते मंडप, स्वयंपाक, घोडा, वाहनाचा खर्च यामुळे लग्नकार्यात लाखो रुपयांची उधळपट्टी होत असते. लग्न एकदाच होते. म्हणून गोरगरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत लग्नकार्यात लाखो रुपयांचा खर्च करत असतात. या लाखो रुपयांच्या खर्चाला आळा घालण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे सुरू झाले आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन सामुदायिक विवाह सोहळे सुरू केले, तसेच अनेक समाज प्रबोधनकारांनीही लग्नातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रबोधन केले; मात्र त्यांनाही अद्याप फारसे यश लाभले नाही.

जिल्ह्यात दरवर्षी शेकडो लग्नकार्य होत असतात. लग्नकार्यात दोन लाखांपासून ते कोट्यवधी रुपयांपर्यंतचा खर्च होत असतो. श्रीमंत तर लग्न सोहळ्यामध्ये श्रीमंतीचे दर्शनही घडवीत असतात. या श्रीमंत लोकांचे हेवेदावे करून गोरगरीब कुटुंबही डोक्यावर कर्जाचा बोजा असताना उधार उसनवारीने पैसे गोळा करून लग्नकार्यात लाखोंचा खर्च करीत होते. या लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी अनेक समाज प्रबोधनकार व कीर्तनकारांनी प्रयत्न केले होते; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही; पण मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सामूहिक लग्न सोहळे बंद झाले आहेत, तसेच घरगुती लग्न सोहळ्यावरही गर्दीचे निर्बंध आल्यामुळे आपोआपच लग्नातील अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत, मोजक्या लोकांमध्ये विवाह सोहळा होत असून, लाखोंचा खर्च काही हजारांवर येऊन ठेपला आहे. एकीकडे कोरोनाचा कहर लोकांच्या जीवासाठी धोका असून, दुसरीकडे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी जणू वरदानच ठरत आहे.