शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नंदुरबारला आदर्श जिल्हा करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशातील 115 आदिवासी जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हा म्हणून घोषीत करून त्यांच्या विकासाचे नियंत्रण स्वत: पंतप्रधान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील 115 आदिवासी जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हा म्हणून घोषीत करून त्यांच्या विकासाचे नियंत्रण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहे. या जिल्ह्यात नंदुरबारचाही समावेश असून हा जिल्हा देशातील सर्वात आदर्श जिल्हा करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नवापूर येथे केली.नवापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भरत गावीत यांच्या प्रचारासाठी शनिवारी अमित शहा यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, खासदार डॉ.हिना गावीत, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सरचिटणीस राजेंद्र गावीत, कुवरसिंग वळवी, अनिल वसावे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी सांगितले, आपण नवापूर येथे सभा स्वत:हून मागून घेतली. कारण या ठिकाणी आजवर कधीही भाजपचे उमेदवार विजयी झाले नाहीत. परंतु या निवडणुकीपासून परिवर्तन निश्चित होणार असून नवापूूरात भाजपचेच उमेदवार भरत गावीत हे विजयी होऊन येथे प्रथमच कमळ फुलवतील. केंद्राप्रमाणेच राज्यातही एक तृतियांशचे बहुमताचे सरकार निश्चित येणार असून दोन्ही ठिकाणी पक्षाचे सरकार राहिल्यास विकासाला अधीक वेग देता येणार आहे. 1955 मध्ये याबाबतचा अहवाल तेंव्हा च्या सरकारला देण्यात आला होता. त्यात ओबीसींवर अन्याय होत असल्याचे म्हटले होते. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार येताच त्यावर विचार झाला व ओबीसींचा सन्मानाच्या योजना सुरू केल्या. मंत्रालयात स्वतंत्र आदिवासी कल्याण विभाग सुरू केला.  केंद्रातील आघाडी सरकारने राज्याच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षापूर्वी जेवढा निधी दिला होता त्याच्या चार पटीने निधी नरेंद्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात राज्याला दिला आहे. त्यामुळे भाजप सरकारच ख:या अर्थाने समाजातील सर्व घटकांचा विकास करणारे सरकार असल्याने या सरकारचा पाठीशी जनतेने राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या 30 मिनिटांच्या भाषणात अमित शहा यांनी केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या पाच वर्षात नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी राबविलेल्या योजनांची माहितीही दिली.