शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

नंदुरबारला आदर्श जिल्हा करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशातील 115 आदिवासी जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हा म्हणून घोषीत करून त्यांच्या विकासाचे नियंत्रण स्वत: पंतप्रधान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील 115 आदिवासी जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हा म्हणून घोषीत करून त्यांच्या विकासाचे नियंत्रण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहे. या जिल्ह्यात नंदुरबारचाही समावेश असून हा जिल्हा देशातील सर्वात आदर्श जिल्हा करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नवापूर येथे केली.नवापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भरत गावीत यांच्या प्रचारासाठी शनिवारी अमित शहा यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, खासदार डॉ.हिना गावीत, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सरचिटणीस राजेंद्र गावीत, कुवरसिंग वळवी, अनिल वसावे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी सांगितले, आपण नवापूर येथे सभा स्वत:हून मागून घेतली. कारण या ठिकाणी आजवर कधीही भाजपचे उमेदवार विजयी झाले नाहीत. परंतु या निवडणुकीपासून परिवर्तन निश्चित होणार असून नवापूूरात भाजपचेच उमेदवार भरत गावीत हे विजयी होऊन येथे प्रथमच कमळ फुलवतील. केंद्राप्रमाणेच राज्यातही एक तृतियांशचे बहुमताचे सरकार निश्चित येणार असून दोन्ही ठिकाणी पक्षाचे सरकार राहिल्यास विकासाला अधीक वेग देता येणार आहे. 1955 मध्ये याबाबतचा अहवाल तेंव्हा च्या सरकारला देण्यात आला होता. त्यात ओबीसींवर अन्याय होत असल्याचे म्हटले होते. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार येताच त्यावर विचार झाला व ओबीसींचा सन्मानाच्या योजना सुरू केल्या. मंत्रालयात स्वतंत्र आदिवासी कल्याण विभाग सुरू केला.  केंद्रातील आघाडी सरकारने राज्याच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षापूर्वी जेवढा निधी दिला होता त्याच्या चार पटीने निधी नरेंद्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात राज्याला दिला आहे. त्यामुळे भाजप सरकारच ख:या अर्थाने समाजातील सर्व घटकांचा विकास करणारे सरकार असल्याने या सरकारचा पाठीशी जनतेने राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या 30 मिनिटांच्या भाषणात अमित शहा यांनी केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या पाच वर्षात नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी राबविलेल्या योजनांची माहितीही दिली.