शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

41 कोटी खर्चासाठी वाहून गेले 500 कोटी रुपयांचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 16:47 IST

तापी उपसा योजना : दरवर्षी वाहून जाते 82 कोटी रुपयांचे पाणी

ठळक मुद्देबॅरेजेसनिहाय जलसाठा प्रकाशा बॅरेज- 62.11 दशलक्ष घनमीटर सारंगखेडा बॅरेज- 91.82 दशलक्ष घनमीटर सुलवाडे बॅरेज- 75.82 दशलक्ष घनमीटर दरवर्षी तिन्ही बॅरेजेसमध्ये एकूण होणारा साठा- 229.75 दशलक्ष घनमीटर दरवर्षी होणारे बाष्पीभवन (अंदाजित)- 34.46 दशलक्ष घनमीटर

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांना सिंचनाची सुविधा देण्यासाठी शासनाने 600 कोटींहून अधिक खर्च करून तापी नदीवर बॅरेजेस बांधले असले तरी हे पाणी शेतात पोहोचविण्यासाठी अद्यापही सुविधा झालेली नाही. त्यासाठी तापीवरील उपसा योजना पुनर्जीवनासाठी 41 कोटी रुपये शासनाने मंजूर केले असले तरी त्यालाही विलंब होत असल्याने गेल्या सात वर्षात तब्बल 500 कोटी रुपये किमतीचे पाणी गुजरातमध्ये वाहून गेले आहे.तापी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे. या नदीची लांबी 724 किलोमीटर असून त्याचा कॅचमेंट एरिया 65 हजार 145 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 79 टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्रात असून मध्य प्रदेशात 15 टक्के व गुजरातमध्ये केवळ सहा टक्के आहे. तापी खो:यातील एकूण 192 टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाटय़ाला असून त्याचा करार झाला असला तरी अद्याप महाराष्ट्र आपल्या हिश्श्याच्या पाण्याचे नियोजन करू शकलेले नाही. त्यासाठी तापी नदीवर बॅरेजेस बांधले असले तरी त्यात केवळ पाणीसाठा होत आहे. हे पाणी शेतीसाठी वापराला येत नसल्याने ते निरुपयोगी ठरले आहे. परिणामी हे पाणी एकतर गुजरातमध्ये वाहून जाते व त्यातील काही हिश्श्याचे बाष्पीभवन होते.धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशा, सारंगखेडा व सुलवाडे हे तीन बॅरेजेस बांधण्यात आले असून त्यात 2007 पासून पाणी अडविले जात आहे. या तिन्ही बॅरेजेसमध्ये सध्या 229.75 दशलक्ष घनमीटर पाणी अडविले जाते. हे पाणी साधारणत: ऑक्टोबर महिन्यात अडविण्यात येते. त्यापैकी साधारणत: 34.46 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होते. शिवाय काही शेतक:यांनी स्वत: आपल्या शेतात पाणी नेण्यासाठी व्यवस्था केल्याने या शेतक:यांकडून साधारणत: 30.51 दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होतो, असा प्राथमिक अंदाज आहे. बाष्पीभवन व शेतक:यांचा वापर होणारे पाणी सोडल्यास 164.78 दशलक्ष घनमीटर पाणी केवळ मृतसाठा म्हणूनच राहतो. ते पाणी पावसाळ्यापूर्वी सोडून देण्यात येते. त्यामुळे त्याचा फायदा गुजरातला होतो.एकूणच चित्र पाहिल्यास तापी नदीतील साधारणत: 164 दशलक्ष घनमीटर पाणी हे वापराअभावी दरवर्षी वाहून जाते. त्या पाण्याची अंदाजित किंमत लक्षात घेतल्यास त्याची सरासरी किंमत 82 कोटी रुपयांर्पयत होते. गेल्या आठ वर्षापासून हे पाणी वाहून जात आहे. त्याची किंमती ही 500 कोटींपेक्षा अधिक होते.जर तापीवरील उपसा योजना पुनर्जीवनाचे नियोजन वेळेवरच झाले असते तर या पाण्याचा वेळीच उपयोग जिल्ह्यातील शेतक:यांना झाला असता. सद्यस्थितीत या भागातील 22 उपसा योजनांचा पुनर्जीवनासाठी शासनस्तरावरून प्रक्रिया सुरू आहे. याबाबत 2014 पासून त्याला प्राथमिक मंजुरी मिळाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी 41 कोटी रुपयांची मंजुरीही दिली आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून ही प्रक्रिया लांबत आहे. सध्या प्राथमिक स्तरावर कामाला सुरुवात झाली असली तरी ती पूर्णत्वास कधी येईल याबाबत आज तरी अनिश्चितता आहे. त्यामुळे केवळ 41 कोटी रुपये खर्चासाठी 500 कोटींहून अधिक किमतीचे पाणी वाहून गेले आहे. त्यात दरवर्षी 82 कोटी रुपयांची भर होणार आहे.