शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

केलापाणी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : तळोदा तालुक्यातील  सातपुडा पर्वतरांगेत 500 लोकसंख्या असलेल्या  केलापाणी येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे केलापाणी गाव तळोदापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथील ग्रामस्थांना  दरवर्षी  उन्हाळ्यात   पाणीटंचाईला सामना करावा          लागत असून डोंगरद:या ओलांडून   नदी, नाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : तळोदा तालुक्यातील  सातपुडा पर्वतरांगेत 500 लोकसंख्या असलेल्या  केलापाणी येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे केलापाणी गाव तळोदापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथील ग्रामस्थांना  दरवर्षी  उन्हाळ्यात   पाणीटंचाईला सामना करावा          लागत असून डोंगरद:या ओलांडून   नदी, नाले व  डबक्यातील पाणी आणावे लागते.नदीच्या पात्रात असलेल्या डबक्याकडून केलापाणी ग्रामस्थ पाणी आणतात. या डबक्यातच जनावरेही पाणी पितात. तेथून आणलेल्या पाण्यावर ग्रामस्थ आपली तहान भागवतात. त्यामुळे विविध आजारांनाही तोंड द्यावे लागते. या डबक्यातील पाणी ग्रामस्थ वापरण्यासाठी आणत असल्याने जनावरांसाठी पाणी उपलब्ध राहत नसल्याने पशुपालकांसमोर समस्या निर्माण होते. उन्हाळ्याला दोन महिने शिल्लक असताना जलस्त्रोत आटत असल्याने चिंता व्यक्त केली जात    आहे. यंदा मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा वाढल्यामुळे           येथील पाणीटंचाई तीव्र झाली           आहे.जिल्ह्यातील सातपुडय़ात दुर्गम भागात आजही भौतिक सुविधा, पाणीटंचाई, रस्ते, दवाखाना, वीज आदी   सुविधा वेळेवर मिळत नाहीत. पूर्वी नदी-नाल्यांना बारामही पाणी वाहत असे. परंतु आठ-दहा  वषार्पासून पाऊस कमी कमी होत गेल्याने पाणीटंचाईचे प्रमाण वाढत आहे. नदी-नाले ओस पडत असून सातपुडय़ातील वनगावे, गावे, पाडय़ांवर पाणीटंचाईची तीव्रता जाणवत आहे.  तसेच भूगार्भातील पाणी पातळीसुध्दा खूप खोलवर गेल्याने हातपंप, विहीर, बोरवेल ओस पडत आहे. काही गावात नदी-नाल्यातील डबक्यातील पाणी प्यावे लागत आहे. केलापाणी गावात शासनाकडून पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली नाही. केलापाणी ग्रामस्थांना वर्षानुवर्षापासून उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने याठिकाणी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.