शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

केलापाणी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : तळोदा तालुक्यातील  सातपुडा पर्वतरांगेत 500 लोकसंख्या असलेल्या  केलापाणी येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे केलापाणी गाव तळोदापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथील ग्रामस्थांना  दरवर्षी  उन्हाळ्यात   पाणीटंचाईला सामना करावा          लागत असून डोंगरद:या ओलांडून   नदी, नाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : तळोदा तालुक्यातील  सातपुडा पर्वतरांगेत 500 लोकसंख्या असलेल्या  केलापाणी येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे केलापाणी गाव तळोदापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथील ग्रामस्थांना  दरवर्षी  उन्हाळ्यात   पाणीटंचाईला सामना करावा          लागत असून डोंगरद:या ओलांडून   नदी, नाले व  डबक्यातील पाणी आणावे लागते.नदीच्या पात्रात असलेल्या डबक्याकडून केलापाणी ग्रामस्थ पाणी आणतात. या डबक्यातच जनावरेही पाणी पितात. तेथून आणलेल्या पाण्यावर ग्रामस्थ आपली तहान भागवतात. त्यामुळे विविध आजारांनाही तोंड द्यावे लागते. या डबक्यातील पाणी ग्रामस्थ वापरण्यासाठी आणत असल्याने जनावरांसाठी पाणी उपलब्ध राहत नसल्याने पशुपालकांसमोर समस्या निर्माण होते. उन्हाळ्याला दोन महिने शिल्लक असताना जलस्त्रोत आटत असल्याने चिंता व्यक्त केली जात    आहे. यंदा मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा वाढल्यामुळे           येथील पाणीटंचाई तीव्र झाली           आहे.जिल्ह्यातील सातपुडय़ात दुर्गम भागात आजही भौतिक सुविधा, पाणीटंचाई, रस्ते, दवाखाना, वीज आदी   सुविधा वेळेवर मिळत नाहीत. पूर्वी नदी-नाल्यांना बारामही पाणी वाहत असे. परंतु आठ-दहा  वषार्पासून पाऊस कमी कमी होत गेल्याने पाणीटंचाईचे प्रमाण वाढत आहे. नदी-नाले ओस पडत असून सातपुडय़ातील वनगावे, गावे, पाडय़ांवर पाणीटंचाईची तीव्रता जाणवत आहे.  तसेच भूगार्भातील पाणी पातळीसुध्दा खूप खोलवर गेल्याने हातपंप, विहीर, बोरवेल ओस पडत आहे. काही गावात नदी-नाल्यातील डबक्यातील पाणी प्यावे लागत आहे. केलापाणी गावात शासनाकडून पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली नाही. केलापाणी ग्रामस्थांना वर्षानुवर्षापासून उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने याठिकाणी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.