शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२० गावांना टँकरने पाणी पुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:28 IST

प्रशासनाकडून निविदा : मागणी वाढण्याची शक्यता, खाजगी टँकर चालकांचा धंदा तेजीत

नंदुरबार : तीव्र पाणी टंचाईच्या जिल्ह्यातील २० पेक्षा अधीक गावांमध्ये पुढील महिन्यापासून टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने टँकर पुरवठादारांकडून निविदा देखील मागविल्या आहेत. जवळपास १५ वर्षानंतर जिल्ह्यात टँकर सुरू होणार आहेत. दरम्यान, ज्या गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहीत केल्या आहेत त्या देखील आटू लागल्याने अशा गावांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची भिषण स्थिती आहे. जवळपास २०० पेक्षा अधीक गावे पाणी टंचाईने होरपळत आहेत. या गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. टंचाईच्या तिसऱ्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढणार असून त्यादृष्टीने प्रशासनातर्फे उपाययोजनांना सुरूवात करण्यात आली आहे.टँकर सुरू होणारजिल्ह्यात गेल्या १५ वर्षात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली नव्हती. भौगोलिक कारणांमुळे दरवर्षी केवळ धडगाव तालुक्यातील गौऱ्याचा बोदलापाडा येथे उन्हाळ्याचे दोन महिने टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यंदा देखील या गावाला टँकर सुरू करण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यातील इतर कुठल्याही तालुक्यात पाणी स्त्रोत नसल्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करावा लागल्याची वेळ आली नव्हती. त्यामुळे टँकरमुक्त जिल्हा म्हणून जिल्ह्याला बिरुद लागले होते. परंतु यंदाचा दुष्काळ भिषण असल्यामुळे २० पेक्षा अधीक गावांना एप्रिल महिन्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. मे महिन्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.निविदा मागविल्या...टँकरने पाणी पुरवठा करण्याची बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतीच निविदा देखील काढली आहे. वेगवेगळ्या लिटर क्षमतेच्या टँकरचे प्रस्ताव मागविले आहेत. गावाच्या लोकसंख्येनुसार त्या त्या क्षमतेच्या टँकरची निविदा स्विकारण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.विहिरी, कुपनलिका आटल्याजिल्ह्यातील ६० पेक्षा अधीक गावांमध्ये खाजगी विहिरी व कुपनलिका अधिग्रहीत करून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु आता या गावांमधील अधिग्रहीत कुपनलिका आणि विहिरीही आटू लागल्या आहेत.त्यामुळे पुर्वी दीड ते दोन तास उपसा होणारे पाणी आता जेमतेम अर्धातासपर्यंत उसपा होत आहे. पुढील काळात ते देखील कमी होणार असल्यामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे.वसाहतींमध्ये आधीपासूनच सुरूशहरालगत असलेल्या अनेक वसाहतींमध्ये जानेवारी महिन्यापासूनच टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यात होळ शिवार, वाघोदा शिवार, दुधाळे शिवारातील वसाहतींचा समावेश आहे. या वसाहतींमध्ये किमान ३०० ते ५०० रुपये प्रमाणे टँकर मागवावे लागत आहे. तालुक्यातील भालेर, तिशी, उमर्दे या गावांमध्ये देखील ग्रामस्थ टँकरने पाणी विकत घेत आहेत.