शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

२० गावांना टँकरने पाणी पुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:28 IST

प्रशासनाकडून निविदा : मागणी वाढण्याची शक्यता, खाजगी टँकर चालकांचा धंदा तेजीत

नंदुरबार : तीव्र पाणी टंचाईच्या जिल्ह्यातील २० पेक्षा अधीक गावांमध्ये पुढील महिन्यापासून टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने टँकर पुरवठादारांकडून निविदा देखील मागविल्या आहेत. जवळपास १५ वर्षानंतर जिल्ह्यात टँकर सुरू होणार आहेत. दरम्यान, ज्या गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहीत केल्या आहेत त्या देखील आटू लागल्याने अशा गावांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची भिषण स्थिती आहे. जवळपास २०० पेक्षा अधीक गावे पाणी टंचाईने होरपळत आहेत. या गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. टंचाईच्या तिसऱ्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढणार असून त्यादृष्टीने प्रशासनातर्फे उपाययोजनांना सुरूवात करण्यात आली आहे.टँकर सुरू होणारजिल्ह्यात गेल्या १५ वर्षात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली नव्हती. भौगोलिक कारणांमुळे दरवर्षी केवळ धडगाव तालुक्यातील गौऱ्याचा बोदलापाडा येथे उन्हाळ्याचे दोन महिने टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यंदा देखील या गावाला टँकर सुरू करण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यातील इतर कुठल्याही तालुक्यात पाणी स्त्रोत नसल्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करावा लागल्याची वेळ आली नव्हती. त्यामुळे टँकरमुक्त जिल्हा म्हणून जिल्ह्याला बिरुद लागले होते. परंतु यंदाचा दुष्काळ भिषण असल्यामुळे २० पेक्षा अधीक गावांना एप्रिल महिन्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. मे महिन्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.निविदा मागविल्या...टँकरने पाणी पुरवठा करण्याची बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतीच निविदा देखील काढली आहे. वेगवेगळ्या लिटर क्षमतेच्या टँकरचे प्रस्ताव मागविले आहेत. गावाच्या लोकसंख्येनुसार त्या त्या क्षमतेच्या टँकरची निविदा स्विकारण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.विहिरी, कुपनलिका आटल्याजिल्ह्यातील ६० पेक्षा अधीक गावांमध्ये खाजगी विहिरी व कुपनलिका अधिग्रहीत करून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु आता या गावांमधील अधिग्रहीत कुपनलिका आणि विहिरीही आटू लागल्या आहेत.त्यामुळे पुर्वी दीड ते दोन तास उपसा होणारे पाणी आता जेमतेम अर्धातासपर्यंत उसपा होत आहे. पुढील काळात ते देखील कमी होणार असल्यामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे.वसाहतींमध्ये आधीपासूनच सुरूशहरालगत असलेल्या अनेक वसाहतींमध्ये जानेवारी महिन्यापासूनच टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यात होळ शिवार, वाघोदा शिवार, दुधाळे शिवारातील वसाहतींचा समावेश आहे. या वसाहतींमध्ये किमान ३०० ते ५०० रुपये प्रमाणे टँकर मागवावे लागत आहे. तालुक्यातील भालेर, तिशी, उमर्दे या गावांमध्ये देखील ग्रामस्थ टँकरने पाणी विकत घेत आहेत.