शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

२० गावांना टँकरने पाणी पुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:28 IST

प्रशासनाकडून निविदा : मागणी वाढण्याची शक्यता, खाजगी टँकर चालकांचा धंदा तेजीत

नंदुरबार : तीव्र पाणी टंचाईच्या जिल्ह्यातील २० पेक्षा अधीक गावांमध्ये पुढील महिन्यापासून टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने टँकर पुरवठादारांकडून निविदा देखील मागविल्या आहेत. जवळपास १५ वर्षानंतर जिल्ह्यात टँकर सुरू होणार आहेत. दरम्यान, ज्या गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहीत केल्या आहेत त्या देखील आटू लागल्याने अशा गावांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची भिषण स्थिती आहे. जवळपास २०० पेक्षा अधीक गावे पाणी टंचाईने होरपळत आहेत. या गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. टंचाईच्या तिसऱ्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढणार असून त्यादृष्टीने प्रशासनातर्फे उपाययोजनांना सुरूवात करण्यात आली आहे.टँकर सुरू होणारजिल्ह्यात गेल्या १५ वर्षात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली नव्हती. भौगोलिक कारणांमुळे दरवर्षी केवळ धडगाव तालुक्यातील गौऱ्याचा बोदलापाडा येथे उन्हाळ्याचे दोन महिने टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यंदा देखील या गावाला टँकर सुरू करण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यातील इतर कुठल्याही तालुक्यात पाणी स्त्रोत नसल्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करावा लागल्याची वेळ आली नव्हती. त्यामुळे टँकरमुक्त जिल्हा म्हणून जिल्ह्याला बिरुद लागले होते. परंतु यंदाचा दुष्काळ भिषण असल्यामुळे २० पेक्षा अधीक गावांना एप्रिल महिन्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. मे महिन्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.निविदा मागविल्या...टँकरने पाणी पुरवठा करण्याची बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतीच निविदा देखील काढली आहे. वेगवेगळ्या लिटर क्षमतेच्या टँकरचे प्रस्ताव मागविले आहेत. गावाच्या लोकसंख्येनुसार त्या त्या क्षमतेच्या टँकरची निविदा स्विकारण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.विहिरी, कुपनलिका आटल्याजिल्ह्यातील ६० पेक्षा अधीक गावांमध्ये खाजगी विहिरी व कुपनलिका अधिग्रहीत करून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु आता या गावांमधील अधिग्रहीत कुपनलिका आणि विहिरीही आटू लागल्या आहेत.त्यामुळे पुर्वी दीड ते दोन तास उपसा होणारे पाणी आता जेमतेम अर्धातासपर्यंत उसपा होत आहे. पुढील काळात ते देखील कमी होणार असल्यामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे.वसाहतींमध्ये आधीपासूनच सुरूशहरालगत असलेल्या अनेक वसाहतींमध्ये जानेवारी महिन्यापासूनच टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यात होळ शिवार, वाघोदा शिवार, दुधाळे शिवारातील वसाहतींचा समावेश आहे. या वसाहतींमध्ये किमान ३०० ते ५०० रुपये प्रमाणे टँकर मागवावे लागत आहे. तालुक्यातील भालेर, तिशी, उमर्दे या गावांमध्ये देखील ग्रामस्थ टँकरने पाणी विकत घेत आहेत.