शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

कन्साई ग्रा.पं.च्या सात पाडय़ांवर पाणीटंचाई

By admin | Updated: February 5, 2017 00:34 IST

पाण्यासाठी भटकंती : अशुद्ध पाण्याचा वापर, उन्हाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची गरज

शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतीच्या सात पाडय़ांवर कायमस्वरूपी पाण्याचे नियोजन नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ज्या बंधा:यावर गुरे  पाणी पितात त्या पाण्याचा वापर ग्रामस्थ करीत आहेत. आहे. संबंधित विभागाच्या अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उन्हाळा सुरू होण्याअगोदरच उपाययोजना करण्याची मागणी होत असून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.शहादा तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतीतील डेमच्यापाडा, भेंढय़ावड, केवडीपाणी, धजापाणी, अंबापाणी, सातपिंप्री, मिठापूर आदी पाडय़ांवर 300 ते 450 आदिवासी कुटुंवांचे वास्तव आहे. हातमजुरी करून हे कुटुंब उदरनिर्वाह करतात. कन्साई गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर ही पाडे असल्याने येथील ग्रामस्थांना स्वातंत्र्योत्तर काळापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.या पाडय़ांच्या परिसरात नदी-नाले, तलावाचे अस्तित्व नसल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही भक्कम सुविधा उपलब्ध नाही. या पाडय़ांवरील प्रत्येक कुटुंबास शेतातून अथवा खोदलेल्या खड्डय़ांमधून पाणी उपसावे लागते. ढेमच्यापाडा येथे 75 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी एकच हातपंप आहे. या हातपंपावरही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. तसेच भेंडय़ावड येथे 25 कुटुंब आहेत याठिकाणीही एक हातपंप आहे. मात्र येथील हातपंप वनविभागाकडून बंद करण्यात आल्याने या कुटुंबांना जवळील रतनपूर येथून पाणी आणावे लागते.धजापाणी येथेही 40 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी पाण्यासाठी विंधन विहीर आहे. मात्र पुरेशा प्रमाणात पाणी नाही. तसेच अंबापाणी येथे 80 कुटुंब राहात असून खाजगी विहीर आहे. याठिकाणी आरोग्याचाही प्रश्न गंभीर असल्याचे बोलले जाते. सातपिंप्री येथे 30 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी पाणी असून नसल्यासारखे असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येतो. मिठापूर येथेही हातपंप आहे मात्र तो नादुरुस्त असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एकंदरीत, आदिवासी पाडय़ातील कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करण्याकरिता जलयुक्त शिवार योजनेतून सिमेंट नाला बांधकाम करून पाण्याचा साठा होणार आहे. तसेच काही ठिकाणी मोठमोठय़ा खड्डय़ांमध्ये पाणीपुरवठा जेमतेम असून हे पाणी गुरेढोरे पितात. त्याच पाण्याचा वापर ग्रामस्थांना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने हिवाळा संपण्यापूर्वी या पाडय़ांवरील नागरिकांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा मनलेश जयस्वाल, मदन पावरा, जयराम पटले, लिंबा पाडवी, रमेश वळवी, कांतीलाल पावरा, भूषण पाटील यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्वरित उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.     (वार्ताहर)कन्साई ग्रामपंचायतअंतर्गत येणा:या सात पाडय़ांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या प्रशासनाने येत्या काही दिवसात सोडविली नाही तर या पाडय़ांमधील मतदार येणा:या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकतील.-लिंबा रामा पाडवी, ग्रामस्थ, डेमच्यापाडागुरेढोरे ज्या ठिकाणी पाणी पितात तेथील पाण्याचा वापर या पाडय़ांमधील ग्रामस्थांना करावा लागतो. पाणी समस्या न सुटल्यास आंदोलन करण्यात येईल.    -मनलेश जयस्वाल