शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

कन्साई ग्रा.पं.च्या सात पाडय़ांवर पाणीटंचाई

By admin | Updated: February 5, 2017 00:34 IST

पाण्यासाठी भटकंती : अशुद्ध पाण्याचा वापर, उन्हाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची गरज

शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतीच्या सात पाडय़ांवर कायमस्वरूपी पाण्याचे नियोजन नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ज्या बंधा:यावर गुरे  पाणी पितात त्या पाण्याचा वापर ग्रामस्थ करीत आहेत. आहे. संबंधित विभागाच्या अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उन्हाळा सुरू होण्याअगोदरच उपाययोजना करण्याची मागणी होत असून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.शहादा तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतीतील डेमच्यापाडा, भेंढय़ावड, केवडीपाणी, धजापाणी, अंबापाणी, सातपिंप्री, मिठापूर आदी पाडय़ांवर 300 ते 450 आदिवासी कुटुंवांचे वास्तव आहे. हातमजुरी करून हे कुटुंब उदरनिर्वाह करतात. कन्साई गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर ही पाडे असल्याने येथील ग्रामस्थांना स्वातंत्र्योत्तर काळापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.या पाडय़ांच्या परिसरात नदी-नाले, तलावाचे अस्तित्व नसल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही भक्कम सुविधा उपलब्ध नाही. या पाडय़ांवरील प्रत्येक कुटुंबास शेतातून अथवा खोदलेल्या खड्डय़ांमधून पाणी उपसावे लागते. ढेमच्यापाडा येथे 75 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी एकच हातपंप आहे. या हातपंपावरही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. तसेच भेंडय़ावड येथे 25 कुटुंब आहेत याठिकाणीही एक हातपंप आहे. मात्र येथील हातपंप वनविभागाकडून बंद करण्यात आल्याने या कुटुंबांना जवळील रतनपूर येथून पाणी आणावे लागते.धजापाणी येथेही 40 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी पाण्यासाठी विंधन विहीर आहे. मात्र पुरेशा प्रमाणात पाणी नाही. तसेच अंबापाणी येथे 80 कुटुंब राहात असून खाजगी विहीर आहे. याठिकाणी आरोग्याचाही प्रश्न गंभीर असल्याचे बोलले जाते. सातपिंप्री येथे 30 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी पाणी असून नसल्यासारखे असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येतो. मिठापूर येथेही हातपंप आहे मात्र तो नादुरुस्त असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एकंदरीत, आदिवासी पाडय़ातील कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करण्याकरिता जलयुक्त शिवार योजनेतून सिमेंट नाला बांधकाम करून पाण्याचा साठा होणार आहे. तसेच काही ठिकाणी मोठमोठय़ा खड्डय़ांमध्ये पाणीपुरवठा जेमतेम असून हे पाणी गुरेढोरे पितात. त्याच पाण्याचा वापर ग्रामस्थांना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने हिवाळा संपण्यापूर्वी या पाडय़ांवरील नागरिकांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा मनलेश जयस्वाल, मदन पावरा, जयराम पटले, लिंबा पाडवी, रमेश वळवी, कांतीलाल पावरा, भूषण पाटील यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्वरित उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.     (वार्ताहर)कन्साई ग्रामपंचायतअंतर्गत येणा:या सात पाडय़ांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या प्रशासनाने येत्या काही दिवसात सोडविली नाही तर या पाडय़ांमधील मतदार येणा:या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकतील.-लिंबा रामा पाडवी, ग्रामस्थ, डेमच्यापाडागुरेढोरे ज्या ठिकाणी पाणी पितात तेथील पाण्याचा वापर या पाडय़ांमधील ग्रामस्थांना करावा लागतो. पाणी समस्या न सुटल्यास आंदोलन करण्यात येईल.    -मनलेश जयस्वाल