शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात नंदुरबारवर पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात 30 ऑगस्टर्पयत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात 30 ऑगस्टर्पयत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. जर पावसाची स्थिती अशीच कायम राहिली तर मोठे संकट निर्माण होणार आहे. ही बाब लक्षात घेता 1 ऑगस्टपासून शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.आमदार रघुवंशी यांनी सांगितले, गेल्यावर्षी पजर्न्यमान कमी झाल्याने शिवण नदीवरील विरचक प्रकल्पात अपेक्षीत पाणीसाठा झाला नव्हता. अवघ्या 35 टक्के पाणीसाठा झाला होता. आज अखेर केवळ डेड स्टॉक शिल्लक आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरी प्रकल्पात पाणीसाठा होऊ शकलेला नाही. यापुढेही परिस्थिती कशी राहील याची शाश्वती नाही. सद्य स्थितीत केवळ 30 ऑगस्टर्पयत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पालिकेला नाईलाजाने आता दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे किमान पाणी साठा सप्टेंबर महिन्याच्या मध्यर्पयत तरी पुरेल. त्या काळात पाऊस चांगला आला आणि पाणीसाठा वाढला तर शहरवासीयांच्या सुदैवाने ती चांगली बाब ठरणार आहे. एकदिवसाआड पाणी पुरवठा करतांना नागरिकांनी पाण्याची नासाडी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील आमदार रघुवंशी यांनी केले आहे.सौर उर्जा प्रकल्पास मान्यतानंदुरबार शहरासाठी सौर उर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव डीपीडीसीकडे सादर करण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली आहे. यामुळे पालिकेचे जवळपास 18 लाख रुपये वीज बिल वाचणार आहे. लवकरच या प्रकल्पाला चालना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.घरकुल नियमानुसारचपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेत लाभार्थ्ीवर अन्याय  झाल्याची बाब संसदेत खासदार डॉ.हिना गावीत यांनी मांडली. त्यावर बोलतांना आमदार रघुवंशी म्हणाले, 876 घरकुले असतांना 650 अर्ज आले. अर्ज केलेल्या सर्वाना घरकुले लॉटरी पद्धतीने देण्यात आली. त्यासाठी शासनाने प्रांताधिकारी यांना   प्राधिकृत  अधिकारी नेमले होते. असे सर्व असतांना अन्याय कसा झाला     हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय जी दीडशे घरे शिल्लक आहेत ती देखील वाटप करण्यासाठी लवकरच जाहीर सुचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दादागिरी सहन करणार नाहीपालिकेत येवून तोडफोड करून कुणी कामे मंजुर करून घेण्याच्या भ्रमात असतील तर तो सहन केला जाणार नाही. पालिकेने गेल्या दीड वर्षात सर्वाधिक कामे ही विरोधकांच्या वॉर्डातच केली आहेत. हे आपण कागदपत्रानिशी सिद्ध करून दाखविण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोफत रोगनिदान शिबिरस्व.बटेसिंह भैय्या रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त 13 ऑगस्ट रोजी मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंत विद्यालयाच्या मैदानावर हे शिबिर होणार आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र परिवार आणि एसएमबीटी हॉस्पीटल, घोटी यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे.