शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

112 गावे आणि 169 पाडय़ांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:02 IST

नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडय़ाच्या दुस:या टप्प्याला सुरुवात झाली आह़े यांतर्गत जिल्ह्यातील 112 गावे आणि 169 पाडय़ांमध्ये ...

नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडय़ाच्या दुस:या टप्प्याला सुरुवात झाली आह़े यांतर्गत जिल्ह्यातील 112 गावे आणि 169 पाडय़ांमध्ये टंचाई निवारणाच्या कामांना सुरुवात होणार असून जानेवारी ते मार्च दरम्यान हा आरखडा राबवला जाणार आह़े   जिल्ह्यात यंदा केवळ 67 टक्के पाऊस झाल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून पहिल्या टप्प्यात 109 गावे असताना दुस:या टप्प्यात तब्बल 112 गावांचा समावेश झाल्याने दुष्काळीस्थितीची भिषणता समोर येत आह़े कृती आराखडय़ात विहिरीचे खोलीकरण, तलावातून गाळ काढणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, टँकर सुरु करणे, विंधनविहिरी आणि तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजूरी देण्यात आली आह़े टंचाईग्रस्त गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी शासनाने निधीची तरतूद केली असून ग्रामपंचायतींनी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव दिल्यानंतर या कामांना वेग येणार आह़े तूर्तास सर्वाधिक पाणीटंचाई ही नंदुरबार तालुक्यात असून 45 नवीन टंचाईग्रस्त गावे समोर आली आहेत़ या 45 पैकी किमान 39 गावांनी विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव दिले असून या प्रस्तावानुसार तहसील कार्यालयांकडून कारवाई करण्यात येत आह़ेया गावांमध्ये येत्या मार्च महिन्यार्पयत पुरेल एवढा पाणीसाठा नसल्याने त्यापूर्वीच उपाययोजना केल्यास पुढील काळातील भीषण टंचाईपासून गावे मुक्त होणार आहेत़ कृती आराखडय़ात नवापूर तालुक्यातील 16 गावे आणि 2 पाडे, शहादा 41 गावे आणि 15 पाडे, तळोदा 7 गावे आणि 5 पाडे, अक्कलकुवा केवळ 1 गाव, धडगाव 2 गावे आणि 137 पाडे टंचाईग्रस्त म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत़ या गावांमध्ये 13 ठिकाणी खोलीकरण, 39 विहिर अधिग्रहण केले जाणार आह़े आराखडय़ानुसार तात्काळ पाणी पुरवठा योजनांचे 13 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत़ या प्रस्तावांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती असून विभागाने 112 गावे आणि 169 पाडय़ांसाठी 194 विंधनविहिरी मंजूर केल्या आहेत़ यापैकी तूर्तास 22 विंधनविहिरींची खोदाई पूर्ण झाल्याची माहिती आह़े सपाटीच्या गावांमध्ये यंदाही टँकरची गरज नसल्याचे आराखडय़ात म्हटले आह़े नंदुरबार तालुक्यातील भागसरी, धामडोद, कलमाडी, नगाव, आराळे, बह्याणे, अक्राळे, वटबारे, दुधाळे, भोणे, वावद, वनकुटे, आखतवाडे, रजाळे, धमडाई, आडची, होळ तर्फे हवेली, पातोंडा, फुलसरे, बद्रङिारा (सुंदरदे), पिंपळोद, ईसाईनगर, तलाईचापाडा, गुजरजांबोली, बद्रङिारा (गु़जा), राजापूर, केसरपाडा, वेळावद, धुळवदपाडा, व्याहूर, गुजरभवाली, भांगडा, वाघशेपा, मालपूर, वाघोदा, ढंढाणे, खैराळे, राकसवाडे, घुली, जुने सोनगीर, खोंडामळी, खोक्राळे, कोठली खुर्द, पथराई, वडझाकण़ शहादा तालुक्यातील ओझर्टा, उजळोद, कवठळ त़श, कुकावल, कोठली त़सा, कुरंगी, गोगापूर, चिरखान, चांदसैली, चांदसैलीचा घोडलेपाडा, जावदे त़ह, टेंभे त़श, टेंभली, होळ गुजरी, आसुस, दामळदा, धांद्रे बुद्रुक, नागङिारी, नंबरपाडा, अंधारपाडा, आदल्यापाडा, भुरीनमळपाडा, कुंडय़ापाणी, शंकरपाडा, आमलीपाणी, कहाटूळ, निंभोरा, जयनगर, उभादगड, न्यू असलोद, पिंपर्डे, भोंगरा, मंदाणा, बामखेडा त़त़, बोराळे, भातकुट, जाम, भोरटेक, चिखली खुर्द, भुलाणे, सटीपाणी, मलगाव, राणीपूर, केलापाणी, लोंढरे, लक्कडकोट, लोहारे, तिधारे, कलमाड त़ह़, वरुळ त़श, सोनवद त़श, सावळदा, लोणखेडा, नांदर्डे, अभणपूर, वाघोदा़ तळोदा तालुक्यात खर्डी बुद्रुक, कालीबेल, पाडळपूर, खर्डी खुर्द चिलीपाणी, गढावली, भवर, अमोणी, केलापाणी, अलवाण, अक्राणी, दलेलपूर, पांढूर्केपाडा, त:हावद आणि गंगानगर तर अक्कलकुवा तालुक्यात लालपूर या एकमेव गावाचा आराखडय़ात समावेश आह़े