शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

दुधखेडा धरणातील पाण्याचे नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 11:26 IST

पूर्ण क्षमतेने जलसाठा : लाभ न मिळाल्यास शेतक:यांचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : शहादा तालुक्यातील दुधखेडा धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेचा जलसाठा असून त्या पाण्याचा फायदा जास्तीत जास्त शेतक:यांच्या शेतीसाठी कसा होईल यासाठी संबंधित विभागाने नियोजन करण्याची गरज आहे. दरम्यान, यंदा रब्बी हंगामासाठी या धरणातील पाण्याचा शेतक:यांना लाभ मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.असलोद येथून तीन किलोमीटर अंतरावर दुधखेडा धरण आहे. या धरणावर 500 हेक्टरपेक्षा जास्त जमीन बागायत केली जाते. या धरणाच्या पाण्याचा उपयोग असलोद, दुधखेडा, मंदाणे, न्यू असलोद येथील शेतक:यांना रब्बी हंगामात होतो. परंतु गेल्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या कारणांमुळे कोरडवाहू शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षी धरणाच्या दुरुस्तीअभावी पाण्याची नासाडी होऊन पाणी वाया जात असे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून, शेतक:यांच्या शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पाणी शेतार्पयत पोहोचण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. धरणाच्या पाटचा:या पूर्णत: दुरूस्ती करण्याची गरज आहे. शेतीला बागायत करून उत्पन्न वाढविण्यासाठी धरणातील पाण्याचे योग्य गरजेनुसार नियोजन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे जबाबदारी स्वीकारून संबंधित पाटबंधारे विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी या धरणाच्या पाण्यावर दामळदा रस्त्यालगतच्या शेतार्पयत पाणी मिळून शेती बागायत होत होती. परंतु गेल्या पाच ते सहा वर्षापासून धरणावर आधारीत बागायत सिंचन क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. पाणी ठराविक अंतरार्पयत पोहोचत असल्याने प्रशासनाने वेगवेगळ्या समस्यांची दखल घेत जास्त शेतक:यांर्पयत पाणी पोहोचविण्याची गरज आहे. धरणाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. पाटचा:या दुरूस्ती व साफसफाई करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणीचे निवेदन संबंधित विभागाला शेतक:यांनी दिले आहे. यावर्षी याबाबत नियोजन न झाल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असून पाटबंधारे विभागाने धरणात असलेल्या पाण्याचा उपयोग शेतक:यांना करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.