शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

दुधखेडा धरणातील पाण्याचे नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 11:26 IST

पूर्ण क्षमतेने जलसाठा : लाभ न मिळाल्यास शेतक:यांचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : शहादा तालुक्यातील दुधखेडा धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेचा जलसाठा असून त्या पाण्याचा फायदा जास्तीत जास्त शेतक:यांच्या शेतीसाठी कसा होईल यासाठी संबंधित विभागाने नियोजन करण्याची गरज आहे. दरम्यान, यंदा रब्बी हंगामासाठी या धरणातील पाण्याचा शेतक:यांना लाभ मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.असलोद येथून तीन किलोमीटर अंतरावर दुधखेडा धरण आहे. या धरणावर 500 हेक्टरपेक्षा जास्त जमीन बागायत केली जाते. या धरणाच्या पाण्याचा उपयोग असलोद, दुधखेडा, मंदाणे, न्यू असलोद येथील शेतक:यांना रब्बी हंगामात होतो. परंतु गेल्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या कारणांमुळे कोरडवाहू शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षी धरणाच्या दुरुस्तीअभावी पाण्याची नासाडी होऊन पाणी वाया जात असे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून, शेतक:यांच्या शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पाणी शेतार्पयत पोहोचण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. धरणाच्या पाटचा:या पूर्णत: दुरूस्ती करण्याची गरज आहे. शेतीला बागायत करून उत्पन्न वाढविण्यासाठी धरणातील पाण्याचे योग्य गरजेनुसार नियोजन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे जबाबदारी स्वीकारून संबंधित पाटबंधारे विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी या धरणाच्या पाण्यावर दामळदा रस्त्यालगतच्या शेतार्पयत पाणी मिळून शेती बागायत होत होती. परंतु गेल्या पाच ते सहा वर्षापासून धरणावर आधारीत बागायत सिंचन क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. पाणी ठराविक अंतरार्पयत पोहोचत असल्याने प्रशासनाने वेगवेगळ्या समस्यांची दखल घेत जास्त शेतक:यांर्पयत पाणी पोहोचविण्याची गरज आहे. धरणाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. पाटचा:या दुरूस्ती व साफसफाई करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणीचे निवेदन संबंधित विभागाला शेतक:यांनी दिले आहे. यावर्षी याबाबत नियोजन न झाल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असून पाटबंधारे विभागाने धरणात असलेल्या पाण्याचा उपयोग शेतक:यांना करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.