शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा बॅरेजमधील पाणी सोडू नये, शेतकऱ्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बॅरेजमधून गेल्या १५ दिवसांपासून अधूनमधून गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तापी ...

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बॅरेजमधून गेल्या १५ दिवसांपासून अधूनमधून गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तापी व गोमाई नदीतील पाणी कमी होत आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी नदीकाठावर पाईप लाईनद्वारे शेतीसाठी पाणी घेतले आहे त्यांना पाणी सोडल्याने अडचण येत आहे. अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली आहे. अशा परिस्थितीत शेतपिकांना वेळोवेळी पाणी द्यावे लागते म्हणून बॅरेजमध्ये पाण्याची आवश्यकता आहे. पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रकाशा येथील शेकडो शेतकऱ्यांनी पाटबंधारे उपविभाग प्रकाशा यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, चालू हंगामात आजपर्यंत पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. पावसाळा लांबत आहे. अशा परिस्थितीत प्रकाशा बॅरेज प्रशासनाने पूर्ण क्षमतेने पाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. गेल्या १५ दिवसांपासून अधूनमधून बॅरेजचे गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. चालू हंगामात पर्जन्यमान नसल्याने सध्यातरी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात प्रकाशा बॅरेजमधील पाणीसाठा कमी झाला तर मोठ्या समस्येला समोर जावे लागेल. आजच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रकाशा बॅरेजमधून पाणी सोडण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन प्रकाशा येथील शेतकरी प्रकाश पाटील, अंबालाल चौधरी, शरद चौधरी, हरी पाटील, आनंद चौधरी, गिरीश पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील, संजय चौधरी, मोहन चौधरी, अनिल पाटील, प्रशांत पाटील, मनोज चौधरी, अशोक पाटील, प्रकाश ढोले, जगदीश पाटील, भटू पाटील, झेंडू बोरदे, छाया पाटील, सुहास पाटील, जितेंद्र चौधरी, सविता चौधरी, शोभा पाटील, भीम चौधरी, भरत चौधरी आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी दिले.