शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

प्रकाशा बॅरेजमधील पाणी सोडू नये, शेतकऱ्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बॅरेजमधून गेल्या १५ दिवसांपासून अधूनमधून गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तापी ...

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बॅरेजमधून गेल्या १५ दिवसांपासून अधूनमधून गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तापी व गोमाई नदीतील पाणी कमी होत आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी नदीकाठावर पाईप लाईनद्वारे शेतीसाठी पाणी घेतले आहे त्यांना पाणी सोडल्याने अडचण येत आहे. अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली आहे. अशा परिस्थितीत शेतपिकांना वेळोवेळी पाणी द्यावे लागते म्हणून बॅरेजमध्ये पाण्याची आवश्यकता आहे. पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रकाशा येथील शेकडो शेतकऱ्यांनी पाटबंधारे उपविभाग प्रकाशा यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, चालू हंगामात आजपर्यंत पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. पावसाळा लांबत आहे. अशा परिस्थितीत प्रकाशा बॅरेज प्रशासनाने पूर्ण क्षमतेने पाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. गेल्या १५ दिवसांपासून अधूनमधून बॅरेजचे गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. चालू हंगामात पर्जन्यमान नसल्याने सध्यातरी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात प्रकाशा बॅरेजमधील पाणीसाठा कमी झाला तर मोठ्या समस्येला समोर जावे लागेल. आजच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रकाशा बॅरेजमधून पाणी सोडण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन प्रकाशा येथील शेतकरी प्रकाश पाटील, अंबालाल चौधरी, शरद चौधरी, हरी पाटील, आनंद चौधरी, गिरीश पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील, संजय चौधरी, मोहन चौधरी, अनिल पाटील, प्रशांत पाटील, मनोज चौधरी, अशोक पाटील, प्रकाश ढोले, जगदीश पाटील, भटू पाटील, झेंडू बोरदे, छाया पाटील, सुहास पाटील, जितेंद्र चौधरी, सविता चौधरी, शोभा पाटील, भीम चौधरी, भरत चौधरी आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी दिले.