शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जून अखेरपर्यंत पाण्याचे नियोजन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:55 IST

पाणी टंचाई आढावा : सामाजिक संघटना व आदिवासी ग्रामस्थांसोबत आढावा बैठक

नंदुरबार : ५२ गावांमध्ये विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ३४ ठिकाणी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. सातपुड्यातील दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कामे सुरू आहेत. तरीही प्रश्न कायम राहत असतील तर तातडीने नवीन प्रस्ताव तयार करावे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गाव, पाड्यांपर्यंत जावे अशा सुचना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सामाजिक संघटना व आदिवासी ग्रामस्थांसोबत झालेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी. , उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर आदी उपस्थित होते. मंजुळे म्हणाले, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधावा. गावातील पाण्याची गरज आणि उपलब्ध स्त्रोतांची माहिती घ्यावी. ३० जूनपर्यंत पाणी उपलब्ध होईल असे स्त्रोत शोधून ठेवावेत. पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोतातील पाणी कमी होत असल्यास पर्यायी स्त्रोताचा शोध घ्यावा. नळपाणी पुरवठा योजनेची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी. आवश्यकतेनुसार विंधनविहीरींची कामे घेण्यात यावी. गावातील नागरिकांचे स्थलांतर होऊ नये म्हणून रोजगार हमी योजनेअंतर्गत मागणीनुसार तात्काळ काम उपलब्ध करून द्यावे.जिल्हाधिकाºयांनी प्रत्येक तालुक्यातील टंचाई परिस्थिती आणि प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा गावनिहाय आढावा घेतला. अधिकाºयांनी ग्रामीण भागातील पाण्याच्या उपलब्धतेविषयी नियमित आढावा घेऊन नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. गावांना भेट देऊन तेथील संभाव्य उपाययोजनेविषयी तात्काळ अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले.या तालुक्यातील आदिवासी बांधवांशी संवाद साधताना जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रोजगार हमी योजने अंतर्गत कामांची उपलब्धता, पिण्याचे पाणी, चारा छावणी, वृक्ष लागवड कार्यक्रम, आदिवासी उपयोजनेअंतर्गत विहिरींची कामे, विंधन विहीरींची कामे आदी विविध विषयांसंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दुर्गम भागातील गावांसाठी चारा छावणी सुरू करण्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करावी व त्यांचे प्रस्ताव घेऊन त्वरीत कार्यवाही करावी अशा सुचनाही त्यांनी दिली.लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, विजय ब्राम्हणे, मुकेश वळवी, गणेश पराडके, संजय महाजन, दिलवर पाडवी, अशोक पाडवी, यशवंत ठाकरे, बोखा पाडवी, जगन पाडवी, प्रभाकर वसावे, झिलाबाई वसावे उपस्थित होते.