शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पाणी व्यवस्थापन प्रत्येकाने शिकले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:49 IST

जलसाक्षरता परिषद : जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांचे आवाहन, अधिकारी, कर्मचा:यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा उपयोग इंच ना इंच जमिनीसाठी करून घेणे आवश्यक आहे. शेतीसाठी पाऊस हे समिकरण मान्य केले तर नैसर्गिक प्रवाहातून येणारे पाणी त्या त्या ठिकाणी बांध घालून जमिनीत जिरवले पाहिजे असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांनी येथे आयोजित जलसाक्षरता सभेत बोलतांना केले.जिल्हा साक्षरता समिती, यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलसाक्षरता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.राजेंद्रसिंह बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, यशदाचे डॉ.सुमंत पांडे आदी उपस्थित होते.डॉ.राजेंद्रसिंह म्हणाले, प्रत्येकाने शाश्वत पाणीसाठे निर्माण करणारी परिवर्तनवादी लोकचळवळ निर्माण करून पावसाचा पडणारा थेंब न थेंब जमिनीत जिरवला पाहिजे या दृष्टीने प्रत्येकाने प्रय} करण्याची गरज आहे.  पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे हे पाणी जमिनीवर पडून वाहून जाते, ते अडविले जात नसल्यामुळे ते थेट नदी, नाले, ओढे या माध्यमातून समुद्राला जावून मिळते. त्याचा काहीच उपयोग होत नाही.  पूर्वीच्या काळी नद्या, नाले बारमाही वाहत होते. त्यामुळे पाणी अडविण्याची गरज राहत नव्हती. आता मात्र बारा महिन्यांपैकी अवघे दोन ते तीन महिनेच नद्या वाहतात. त्यामुळे मोठमोठे धरण, बंधारे बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु एवढी मोठी धरणे आणि बंधारे बांधण्यापेक्षा छोटी छोटी धरणे बांधून त्यातून सिंचन वळविल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. शिवाय असे पाणी जमिनीत मुरण्यास देखील मदत होते. परिणामी जमिनीतील पाणी पातळी वाढते. राज्यासह जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर काही भाग चांगल्या पावसाचा तर काही भाग कमी पावसाचा आहे. त्याला कारण मानवनिर्मित संकटेच आहेत. पाण्याचा अधीक उपसा, कमी झालेली वनराई, लहान, लहान बांधांची कमी झालेली संख्या आणि पावसाचा पाण्याचा उपयोग न करण्याचे धोरण ही कारणे प्रामुख्याने नमुद करता येतील असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले, जलसाक्षरता योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलदूत, जलनायक, जलप्रेमी व जलकर्मी तयार करावयाचे असून यासाठी शालेय विद्याथ्र्याचा सहभाग आवश्यक राहणार आहे. लहान वयातच    मुलांवर चांगले संस्कार होतील हा उद्देश त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.जलसाक्षरता केंद्र यशदाचे डॉ.सुमंत पांडे यांनी जलसाक्षरता कृती आराखडा, प्रशिक्षण व संनियंत्रण याबाबत पॉवर पॉईंटद्वारे माहिती दिली. कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी यांनी यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली.