शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

पाणी व्यवस्थापन प्रत्येकाने शिकले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:49 IST

जलसाक्षरता परिषद : जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांचे आवाहन, अधिकारी, कर्मचा:यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा उपयोग इंच ना इंच जमिनीसाठी करून घेणे आवश्यक आहे. शेतीसाठी पाऊस हे समिकरण मान्य केले तर नैसर्गिक प्रवाहातून येणारे पाणी त्या त्या ठिकाणी बांध घालून जमिनीत जिरवले पाहिजे असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांनी येथे आयोजित जलसाक्षरता सभेत बोलतांना केले.जिल्हा साक्षरता समिती, यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलसाक्षरता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.राजेंद्रसिंह बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, यशदाचे डॉ.सुमंत पांडे आदी उपस्थित होते.डॉ.राजेंद्रसिंह म्हणाले, प्रत्येकाने शाश्वत पाणीसाठे निर्माण करणारी परिवर्तनवादी लोकचळवळ निर्माण करून पावसाचा पडणारा थेंब न थेंब जमिनीत जिरवला पाहिजे या दृष्टीने प्रत्येकाने प्रय} करण्याची गरज आहे.  पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे हे पाणी जमिनीवर पडून वाहून जाते, ते अडविले जात नसल्यामुळे ते थेट नदी, नाले, ओढे या माध्यमातून समुद्राला जावून मिळते. त्याचा काहीच उपयोग होत नाही.  पूर्वीच्या काळी नद्या, नाले बारमाही वाहत होते. त्यामुळे पाणी अडविण्याची गरज राहत नव्हती. आता मात्र बारा महिन्यांपैकी अवघे दोन ते तीन महिनेच नद्या वाहतात. त्यामुळे मोठमोठे धरण, बंधारे बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु एवढी मोठी धरणे आणि बंधारे बांधण्यापेक्षा छोटी छोटी धरणे बांधून त्यातून सिंचन वळविल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. शिवाय असे पाणी जमिनीत मुरण्यास देखील मदत होते. परिणामी जमिनीतील पाणी पातळी वाढते. राज्यासह जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर काही भाग चांगल्या पावसाचा तर काही भाग कमी पावसाचा आहे. त्याला कारण मानवनिर्मित संकटेच आहेत. पाण्याचा अधीक उपसा, कमी झालेली वनराई, लहान, लहान बांधांची कमी झालेली संख्या आणि पावसाचा पाण्याचा उपयोग न करण्याचे धोरण ही कारणे प्रामुख्याने नमुद करता येतील असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले, जलसाक्षरता योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलदूत, जलनायक, जलप्रेमी व जलकर्मी तयार करावयाचे असून यासाठी शालेय विद्याथ्र्याचा सहभाग आवश्यक राहणार आहे. लहान वयातच    मुलांवर चांगले संस्कार होतील हा उद्देश त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.जलसाक्षरता केंद्र यशदाचे डॉ.सुमंत पांडे यांनी जलसाक्षरता कृती आराखडा, प्रशिक्षण व संनियंत्रण याबाबत पॉवर पॉईंटद्वारे माहिती दिली. कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी यांनी यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली.