शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पाच तालुक्यांची भूजल पातळी १ मीटरने खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 11:38 IST

दुष्काळझळा : नंदुरबार तालुका सर्वाधिक गंभीर स्थितीत

नंदुरबार : पाच तालुक्यांच्या भूजल पातळीत मोठी घट आली असून सप्टेंबर २०१८ मध्ये नंतर भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च २०१९ केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात तब्बल १ मीटरने भूजल खोल गेल्याचे समोर आले आहे़ यात सर्वाधिक गंभीर स्थिती ही नंदुरबार तालुक्याची असून येथे चार मीटरपर्यंत जमिनीतील पाणी खोल गेल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे़२०१८ च्या पावसाळ्यात सरासरी ६७ टक्के पावसाची नोंद झाल्याने सर्वच तालुके दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत़ या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाने या तालुक्यांच्या पाणी पातळीचा मार्च अखेरीस आढावा घेतला होता़ यात सरासरी पाच वर्षाच्या तुलनेत खोलात गेलेल्या भूजल पातळीची स्थिती सर्वेक्षणाद्वारे जाणून घेण्यात आली़ दरम्यान नंदुरबार, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात गंभीर स्थिती असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे़ विभागाने नियंत्रित केलेल्या ५० विहिरींच्या भूजलाची पडताळणी करुन अंतिम अहवाल तयार केला आहे़ यानुसार नंदुरबार तालुक्यात २४, नवापूर ७, शहादा ६३, तळोदा ५२, अक्कलकुवा ४७ आणि धडगाव तालुक्यात केवळ सात सेंटीमीटरने भूजल खोलात गेले आहे़ सरासरी १ मीटरपर्यंत हे भूजल खोल गेले असून यात दिवसागणिक वाढ होण्याची चिन्हे आहेत़पाण्याचा उपसा वाढून पुन्हा त्यात वृद्धी होण्याची कोणतीही उपाययोजना नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे़ परिणामी जिल्ह्याच्या भूगर्भातील २९ पाणलोट क्षेत्राचे प्रवाह हे दिवसेंदिवस कोरडे होत असल्याचे सांगण्यात आले आहे़ जमिनीखालील भूगर्भात कमी अधिक प्रमाणात पाणीसाठा असल्याने ही पातळी येत्या काळात आणखी कमी होणार असल्याचे सांगण्यात आले असल्याने चिंतेचा विषय ठरणार आहे़ सप्टेंबर २०१८ मध्ये भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील ५० विहिरींची पाहणी केली होती़ यात तालुक्यात तब्बल साडेतीन अर्थात ३़५२ मीटर भूजल खोल गेल्याचे स्पष्ट झाले होते़ यात आता २४ सेंटीमीटरची भर पडली असून तालुक्यातील सर्व १३ विहिरी ह्या १ मीटरपर्यंत खोल गेल्या आहेत़ नंदुरबार तालुक्यात पाच वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक ३़७८ मीटरने भूजल खोल गेले आहे़ या खालोखाल शहादा तालुक्यात गंभीर स्थिती असून येथील ९ विहिरींच्या निरीक्षणात ६३ सेंटीमीटरने पाणी खोल गेले आहे़ यामुळे तालुक्याची एकूण भूजल पातळी ही १़७३ मीटरने खोल गेली आहे़ जिल्ह्यातील सर्वाधिक सधन तळोदा तालुक्यातही स्थिती गंभीर असून येथे एकूण २़९४ मीटरने भूजल पातळी खोल गेल्याची माहिती नव्याने समोर आली आहे़ अक्कलकुवा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १़४८ मीटर पातळी खालवली होती़ यात आणखी ४७ सेंटीमीटरची भर पडली आहे़ तर दुसरीकडे धडगाव तालुक्यात मात्र केवळ ७ सेंटीमीटरने पाणी खोल गेल्याची सुखद माहिती समोर आली आहे़ यात तालुक्यात १़१४ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट आल्याचे स्पष्ट झाले आहे़