शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बोरद परिसरात पाणी पातळीने गाठला तळ, अनेक गावांमध्ये टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींमधील पाणीपातळी कमालीची घटली आह़े या भागात बहुसंख्य टय़ुबवेल 200 फुटार्पयत आहेत़  परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींमधील पाणीपातळी कमालीची घटली आह़े या भागात बहुसंख्य टय़ुबवेल 200 फुटार्पयत आहेत़  परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याही पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े  अद्याप एप्रिल - मे महिना काढायचा असताना मार्चच्या सुरुवातीलाच पाण्याची वानवा निर्माण झाली असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े पिकांना पाणी देण्याची चिंता पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आह़े या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने पाण्याअभावी पिक करपू लागली असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े या परिसरात ऊस, केळी, पपई, कापूस, हरभरा,गहू अशी बागायती पिक घेण्यात आलेली आहेत़ सधन शेतक:यांकडून ठिबकच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्यात येत आह़े परंतु इतर शेतक:यांसमोर मात्र समस्या निर्माण झालेली आह़े पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावली होती़ त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार हे स्पष्ट झाले होत़े परंतु दिवसेंदिवस या समस्येत अधिक वाढ होत आह़े त्यामुळे पिक जगवावी कशी असा प्रश्न उपस्थित होत आह़े टरबूज पिकावर दुष्परिणामदरम्यान, तळोदा परिसरात मोठय़ा प्रमाणात टरबूज व डांगर पिकाची  लागवड करण्यात आली आह़े परंतु सातत्याने या ठिकाणी ढगाळ हवामानाचा परिणाम पिकावर जाणवत आह़े त्यामुळे यावर कृषी विभागातील अधिका:यांनी शेतक:यांना मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े पिण्याच्या पाण्याचेही वांधेग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येसही तोंड द्यावे लागत आह़े या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़ इकडे पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आह़े यासाठी मजुरांना पाण्याच्या शोधात रोजंदारीदेखील बुडवावी लागत आह़े अशी वस्तूस्थिती असताना निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणी टंचाईचा उदभवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आह़े चा:यासाठीही होताय हाल.दरम्यान, पाणीटंचाईचा सामना येथील पशुपालकांनादेखील सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े येथील पशुपालकांना चा:यासाठी इतरत्र वणवण करावी लागत आह़े पशुपालकांसमोर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चा:याचा प्रश्न निर्माण होत असतो़ त्यामुळे बहुतेक ठिकाणी शेतमजुर पाणी व चा:याच्या विवंचनेत फिरत असतात़ उन्हाळ्याचे अद्याप बरेच दिवस घ्यायचे आह़े त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर उपाययोजना करणे गरजेचे आह़े सध्या तापमानातही वाढ होत आह़े त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये पिकांचे मात्र नुकसान होत आह़े