शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

बोरद परिसरात पाणी पातळीने गाठला तळ, अनेक गावांमध्ये टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींमधील पाणीपातळी कमालीची घटली आह़े या भागात बहुसंख्य टय़ुबवेल 200 फुटार्पयत आहेत़  परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींमधील पाणीपातळी कमालीची घटली आह़े या भागात बहुसंख्य टय़ुबवेल 200 फुटार्पयत आहेत़  परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याही पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े  अद्याप एप्रिल - मे महिना काढायचा असताना मार्चच्या सुरुवातीलाच पाण्याची वानवा निर्माण झाली असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े पिकांना पाणी देण्याची चिंता पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आह़े या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने पाण्याअभावी पिक करपू लागली असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े या परिसरात ऊस, केळी, पपई, कापूस, हरभरा,गहू अशी बागायती पिक घेण्यात आलेली आहेत़ सधन शेतक:यांकडून ठिबकच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्यात येत आह़े परंतु इतर शेतक:यांसमोर मात्र समस्या निर्माण झालेली आह़े पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावली होती़ त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार हे स्पष्ट झाले होत़े परंतु दिवसेंदिवस या समस्येत अधिक वाढ होत आह़े त्यामुळे पिक जगवावी कशी असा प्रश्न उपस्थित होत आह़े टरबूज पिकावर दुष्परिणामदरम्यान, तळोदा परिसरात मोठय़ा प्रमाणात टरबूज व डांगर पिकाची  लागवड करण्यात आली आह़े परंतु सातत्याने या ठिकाणी ढगाळ हवामानाचा परिणाम पिकावर जाणवत आह़े त्यामुळे यावर कृषी विभागातील अधिका:यांनी शेतक:यांना मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े पिण्याच्या पाण्याचेही वांधेग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येसही तोंड द्यावे लागत आह़े या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़ इकडे पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आह़े यासाठी मजुरांना पाण्याच्या शोधात रोजंदारीदेखील बुडवावी लागत आह़े अशी वस्तूस्थिती असताना निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणी टंचाईचा उदभवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आह़े चा:यासाठीही होताय हाल.दरम्यान, पाणीटंचाईचा सामना येथील पशुपालकांनादेखील सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े येथील पशुपालकांना चा:यासाठी इतरत्र वणवण करावी लागत आह़े पशुपालकांसमोर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चा:याचा प्रश्न निर्माण होत असतो़ त्यामुळे बहुतेक ठिकाणी शेतमजुर पाणी व चा:याच्या विवंचनेत फिरत असतात़ उन्हाळ्याचे अद्याप बरेच दिवस घ्यायचे आह़े त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर उपाययोजना करणे गरजेचे आह़े सध्या तापमानातही वाढ होत आह़े त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये पिकांचे मात्र नुकसान होत आह़े