शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

काँग्रेस, भाजपातील नाराजांच्या आशेवर ‘पाणी’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:18 IST

भरत अस्त्र थंडावले : दोन्ही पक्षातील नेत्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

रमाकांत पाटील ।नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत व त्यांचे पुत्र भरत गावीत यांच्या पक्षावरील नाराजीचा वृत्तानंतर गेल्या २४ तासात जिल्हा आणि राज्यातील राजकारणातही सुरू झालेले घडामोडी शनिवारी अखेर थंडावल्या. गावीतांची पक्षश्रेष्ठींनी नाराजी दूर केल्याचे वृत्त कळताच भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील सोयीचे राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आशेवरही पाणी फिरले आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे या वेळी कुणाला उमेदवारी मिळेल हा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय होता. निवडणुकीच्या चार महिन्यापूर्वी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक नवापुरात झाली होती. त्यावेळी सर्व नेत्यांनी माणिकराव गावीत यांनीच पुन्हा उमेदवारी करावी, अशी गळ घातली होती. तथापि, वयोमानानुसार त्यावेळी गावीतांनी नकार देऊन पुत्र भरत गावीत यांच्याकडे इशारा केला होता. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीसमोर भूमिका मांडून त्यावेळी आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी व भरत गावीत या दोघांच्या नावाची शिफारस केली होती. मध्यंतरीच्या काळात अ‍ॅड.पाडवी यांचेच नाव आघाडीवर राहिले. तथापि, शेवटच्या टप्प्यात भरत गावीत यांच्या हालचाली वाढल्याने ते स्पर्धेत आले. तथापि, पक्षाने अधिकृतपणे अ‍ॅड.के.सी. पाडवी यांना उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यानंतर भरत गावीत व माणिकराव गावीत यांची नाराजी मात्र वाढली. उमेदवार जाहीर करताना आपण मतदारसंघातील ज्येष्ठ व अनुभवी लोकप्रतिनिधी असताना पक्षाने आपल्याला विश्वासात न घेतल्याची भूमिका माणिकराव गावीत यांनी व्यक्त केली. दुसरीकडे भरत गावीत यांनीही आपल्या समर्थकांचा स्वतंत्र मेळावा घेऊन भूमिका जाहीर करण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील राजकारण अधिकच ढवळून निघाले.या ढवळून निघालेल्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपातील सोयीचे राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना चांगलेच फावले. त्यामुळे गेल्या २४ तासात जिल्ह्यापासून तर राज्याच्या राजकारणात हालचाल सुरू झाली होती. भरत गावीतांना थेट भाजपामध्ये प्रवेश देण्यासाठीही हालचाली सुरू झाल्या होत्या. या चर्चांमुळे भाजपामधील अंतर्गत नाराज गटही सक्रीय झाला होता. तर काँग्रेस पक्षातदेखील अंतर्गत घडामोडींना वेग आला होता. मध्यरात्रीपासून तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक चर्चांना ऊत आला.या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी मुंबई येथे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात माणिकराव गावीत व भरत गावीत यांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र तेथे नेते न भेटल्याने गावीत अधिकच नाराज झाल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकले. त्यामुळे पुन्हा अंतर्गत राजकीय घडामोडींनी वेग घेतला. तथापि, काही वेळातच माणिकराव गावीत व भरत गावीत यांना पक्षश्रेष्ठींनी मुंबई येथील निवासस्थानी बोलवून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांची नाराजी दूर केली. स्वत: भरत गावीत यांनी आपली नाराजी दूर झाल्याचे कळविले असून पक्षाचेच काम करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता सोयीच्या राजकारणाची स्वप्न रंगविणाऱ्यांचे स्वप्न भंगल्याचे चित्र असून २४ तासात जिल्ह्यातील राजकारण पूर्वीच्या ‘मोड’वर आले आहे.

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबार