शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केलापाणी येथे डोंगर उतरून आणावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:01 IST

केलापाणीला पाण्याची आस : ग्रामस्थांनी बीडीओंना घातले साकडे

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : 600 मीटर डोंगरावरून खाली पायपीट करत नदीतील कुंडाचे अस्वच्छ पाणी नेऊन तालुक्यातील केलापाणी गावातील नागरिक आपली तहान भागवित असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. दरम्यान तेथील मंजूर विहिरींसाठीदेखील बुधवारी गावक:यांनी गटविकास अधिका:यांना साकडे घालून पाण्याची भीषण टंचाई सोडविण्याची मागणी केली आहे.सातपुडय़ातील दुर्गम भागातील केलापाणी हे छोटसं गाव आहे. गावाची लोकसंख्या साधारण 400 आहे. हे गाव खर्डी बुद्रूक या ग्रामपंचायतीत येते. सातपुडय़ाच्या डोंगरावर हे गाव वसलेले आहे. त्यामुळे तेथे धड रस्तेही नाही. त्यामुळे मुलभूत सुविधांपासून कोसोदूर आहे. एवढेच नव्हे तर साध्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधांपासूनदेखील ते वंचित आहेत. गावात पाणीपुरवठय़ाची व्यवस्था नसल्याने गावातील ग्रामस्थ 600 ते 700 मीटर डोंगराखाली वाहना:या नदीचे पाणी वर्षभर पीत असतात. आता तर नदीचा प्रवाह आटला आहे. ठिक-ठिकाणी साचलेले डबके व साधारण खोल कुंडातील पाण्याचा वापर करीत आहे. परंतु पाण्यासाठी महिलांना आपला जीवमुठीत धरून डोंगरावरून खाली व पुन्हा डोक्यावर हंडा घेवून डोंगर चढावा लागत आहे. एवढी कसरत करूनही शेवटी त्यांना अस्वच्छ पाण्याने आपली तृष्णा भागवावी लागत असल्याची व्यथाही ग्रामस्थांनी बोलून दाखविली आहे. वास्तविक पाण्याची एवढी भीषण टंचाई गावात असतांना त्यावर उपाययोजनांबाबत पंचायत समितीकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप गावक:यांनी केला आहे. कारण गेल्यावर्षी सुद्धा या प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र थातूर-मातूर चौकशी करून गावक:यांचे समाधान करण्यात आले होते. वास्तविक याठिकाणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने विंधन विहीर मंजूर केली आहे. परंतु अजूनही या विभागाला विहीर खोदण्याचा मुहूर्त सापडत नसल्याचा आरोप केलापाणीवासीयांनी केला आहे. या उलट गावक:यांनीच श्रमदानातून विहिरीचे खोदकाम केल्याचे गाकरी सांगतात. 15 ते 20 फुट खोल खोदलेल्या या विहिरीस पाणी लागले होते. तथापि ते तीव्र उन्हामुळे कमी झाले आहे. गावातील पाणञयाचा तीव्र प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी गावक:यांनी बुधवारी पंचायत समितीच्या नवनियुक्त गटविकास अधिकारी खर्डे यांची भेट घेतली होती. त्यांनी चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन गावक:यांना दिले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दिलवरसिंग वळवी, तुळशिराम पाडवी, विनोद वळवी, बाज्या वळवी, लालसिंग पाडवी, सिंगा नाईक, मगन नाईक, सिपा पाडवी, वेलजी पाडवी, कांतीलाल पाडवी, रित्या पाडवी, वालजी वसावे, जेलसिंग वळवी, रमेश पाडवी आदी उपस्थित होते.