शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

केलापाणी येथे डोंगर उतरून आणावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:01 IST

केलापाणीला पाण्याची आस : ग्रामस्थांनी बीडीओंना घातले साकडे

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : 600 मीटर डोंगरावरून खाली पायपीट करत नदीतील कुंडाचे अस्वच्छ पाणी नेऊन तालुक्यातील केलापाणी गावातील नागरिक आपली तहान भागवित असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. दरम्यान तेथील मंजूर विहिरींसाठीदेखील बुधवारी गावक:यांनी गटविकास अधिका:यांना साकडे घालून पाण्याची भीषण टंचाई सोडविण्याची मागणी केली आहे.सातपुडय़ातील दुर्गम भागातील केलापाणी हे छोटसं गाव आहे. गावाची लोकसंख्या साधारण 400 आहे. हे गाव खर्डी बुद्रूक या ग्रामपंचायतीत येते. सातपुडय़ाच्या डोंगरावर हे गाव वसलेले आहे. त्यामुळे तेथे धड रस्तेही नाही. त्यामुळे मुलभूत सुविधांपासून कोसोदूर आहे. एवढेच नव्हे तर साध्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधांपासूनदेखील ते वंचित आहेत. गावात पाणीपुरवठय़ाची व्यवस्था नसल्याने गावातील ग्रामस्थ 600 ते 700 मीटर डोंगराखाली वाहना:या नदीचे पाणी वर्षभर पीत असतात. आता तर नदीचा प्रवाह आटला आहे. ठिक-ठिकाणी साचलेले डबके व साधारण खोल कुंडातील पाण्याचा वापर करीत आहे. परंतु पाण्यासाठी महिलांना आपला जीवमुठीत धरून डोंगरावरून खाली व पुन्हा डोक्यावर हंडा घेवून डोंगर चढावा लागत आहे. एवढी कसरत करूनही शेवटी त्यांना अस्वच्छ पाण्याने आपली तृष्णा भागवावी लागत असल्याची व्यथाही ग्रामस्थांनी बोलून दाखविली आहे. वास्तविक पाण्याची एवढी भीषण टंचाई गावात असतांना त्यावर उपाययोजनांबाबत पंचायत समितीकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप गावक:यांनी केला आहे. कारण गेल्यावर्षी सुद्धा या प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र थातूर-मातूर चौकशी करून गावक:यांचे समाधान करण्यात आले होते. वास्तविक याठिकाणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने विंधन विहीर मंजूर केली आहे. परंतु अजूनही या विभागाला विहीर खोदण्याचा मुहूर्त सापडत नसल्याचा आरोप केलापाणीवासीयांनी केला आहे. या उलट गावक:यांनीच श्रमदानातून विहिरीचे खोदकाम केल्याचे गाकरी सांगतात. 15 ते 20 फुट खोल खोदलेल्या या विहिरीस पाणी लागले होते. तथापि ते तीव्र उन्हामुळे कमी झाले आहे. गावातील पाणञयाचा तीव्र प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी गावक:यांनी बुधवारी पंचायत समितीच्या नवनियुक्त गटविकास अधिकारी खर्डे यांची भेट घेतली होती. त्यांनी चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन गावक:यांना दिले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दिलवरसिंग वळवी, तुळशिराम पाडवी, विनोद वळवी, बाज्या वळवी, लालसिंग पाडवी, सिंगा नाईक, मगन नाईक, सिपा पाडवी, वेलजी पाडवी, कांतीलाल पाडवी, रित्या पाडवी, वालजी वसावे, जेलसिंग वळवी, रमेश पाडवी आदी उपस्थित होते.