शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

केलापाणी येथे डोंगर उतरून आणावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:01 IST

केलापाणीला पाण्याची आस : ग्रामस्थांनी बीडीओंना घातले साकडे

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : 600 मीटर डोंगरावरून खाली पायपीट करत नदीतील कुंडाचे अस्वच्छ पाणी नेऊन तालुक्यातील केलापाणी गावातील नागरिक आपली तहान भागवित असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. दरम्यान तेथील मंजूर विहिरींसाठीदेखील बुधवारी गावक:यांनी गटविकास अधिका:यांना साकडे घालून पाण्याची भीषण टंचाई सोडविण्याची मागणी केली आहे.सातपुडय़ातील दुर्गम भागातील केलापाणी हे छोटसं गाव आहे. गावाची लोकसंख्या साधारण 400 आहे. हे गाव खर्डी बुद्रूक या ग्रामपंचायतीत येते. सातपुडय़ाच्या डोंगरावर हे गाव वसलेले आहे. त्यामुळे तेथे धड रस्तेही नाही. त्यामुळे मुलभूत सुविधांपासून कोसोदूर आहे. एवढेच नव्हे तर साध्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधांपासूनदेखील ते वंचित आहेत. गावात पाणीपुरवठय़ाची व्यवस्था नसल्याने गावातील ग्रामस्थ 600 ते 700 मीटर डोंगराखाली वाहना:या नदीचे पाणी वर्षभर पीत असतात. आता तर नदीचा प्रवाह आटला आहे. ठिक-ठिकाणी साचलेले डबके व साधारण खोल कुंडातील पाण्याचा वापर करीत आहे. परंतु पाण्यासाठी महिलांना आपला जीवमुठीत धरून डोंगरावरून खाली व पुन्हा डोक्यावर हंडा घेवून डोंगर चढावा लागत आहे. एवढी कसरत करूनही शेवटी त्यांना अस्वच्छ पाण्याने आपली तृष्णा भागवावी लागत असल्याची व्यथाही ग्रामस्थांनी बोलून दाखविली आहे. वास्तविक पाण्याची एवढी भीषण टंचाई गावात असतांना त्यावर उपाययोजनांबाबत पंचायत समितीकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप गावक:यांनी केला आहे. कारण गेल्यावर्षी सुद्धा या प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र थातूर-मातूर चौकशी करून गावक:यांचे समाधान करण्यात आले होते. वास्तविक याठिकाणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने विंधन विहीर मंजूर केली आहे. परंतु अजूनही या विभागाला विहीर खोदण्याचा मुहूर्त सापडत नसल्याचा आरोप केलापाणीवासीयांनी केला आहे. या उलट गावक:यांनीच श्रमदानातून विहिरीचे खोदकाम केल्याचे गाकरी सांगतात. 15 ते 20 फुट खोल खोदलेल्या या विहिरीस पाणी लागले होते. तथापि ते तीव्र उन्हामुळे कमी झाले आहे. गावातील पाणञयाचा तीव्र प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी गावक:यांनी बुधवारी पंचायत समितीच्या नवनियुक्त गटविकास अधिकारी खर्डे यांची भेट घेतली होती. त्यांनी चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन गावक:यांना दिले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दिलवरसिंग वळवी, तुळशिराम पाडवी, विनोद वळवी, बाज्या वळवी, लालसिंग पाडवी, सिंगा नाईक, मगन नाईक, सिपा पाडवी, वेलजी पाडवी, कांतीलाल पाडवी, रित्या पाडवी, वालजी वसावे, जेलसिंग वळवी, रमेश पाडवी आदी उपस्थित होते.