शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

पिकांसह पाणीपुरवठय़ालाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 11:03 IST

सारंगखेडा बॅरेज : दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याची गरज

ठळक मुद्देबॅरेजचे दरवाजे बंद करण्यासंदर्भात मुख्य कार्यालयाच्या वरिष्ठ अधिका:यांमार्फत सूचना आलेल्या नाहीत व नियमाप्रमाणे 15 सप्टेंबरशिवाय दरवाजे बंद करता येत नाहीत. तसेच दरवाजे दुरुस्ती व ऑईल ग्रिसींगचेही काम सुरू आहे. परंतु आम्हाला शेतकरी, ग्रामस्थ किंवा ग्रामपंच

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडल्याने बॅरेज व नदीपात्रात अल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. तापी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणा:या ज्ॉकवेल व इलेक्ट्रीक मोटारींना पाणी उपलब्ध होत नसल्याने या गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेती सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने पिके वाचविण्यासाठी शेतक:यांची कसरत सुरू आहे.सारंगखेडा व परिसरात जून महिन्यात 7 व 8 तारखेला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र श्रावण सरीच बरसल्या. अद्यापही या भागातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा आतार्पयतच्या पावसाळ्यात कोणतेही नदी-नाले वाहून निघाले नाहीत. त्यातच 15 दिवसांपासून सारंगखेडा बॅरेजचे सर्व 26 दरवाजे उघडण्यात आल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी           स्थिती निर्माण झाली आहे. परिसरात जोरदार पाऊस नसल्याने बागायती व कोरडवाहू क्षेत्रातील पिके               धोक्यात आली आहेत. अनेक शेतक:यांनी तापी नदीवर इलेक्ट्रीक मोटारी ठेवून पाईपलाईनद्वारे शेतार्पयत पाणी नेले आहे. मात्र तापी नदीचे पात्र कोरडे झाल्याने पाणी उपलब्ध होत नाही. बागायती  पिकांना पाणी देणे आवश्यक असताना पाणी मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. बॅरेजचे दरवाजे उघडण्याच्या शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतक:यांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीतापी काठावरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सारंगखेडा बॅरेजच्या साठवून ठेवलेल्या पाण्यातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र बॅरेजमध्ये व नदीपात्रात दरवाजे उघडल्यामुळे पाणीसाठा नसल्याने या गावांना होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तर शेतक:यांना पिके वाचविण्यासाठी कसरत करावी लागत असून तापी नदीचे पात्र कोरडे पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे

जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अध्र्या नंदुरबार जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. त्यामुळे प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजसमध्ये तरी थोडाफार पाणीसाठा व्हावा म्हणून पालकमंत्री रावल          यांनी संबंधित विभागांना तातडीने बॅरेजेसचे दरवाजे बंद करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.