शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

आदिवासी पाड्यांवर गाढवांवरून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 04:42 IST

एका गाढवाला एका फेरीसाठी ७५ रुपयांची मजुरी दिली जाते तर गाढव ने-आण करणाºया पाच मजुरांना प्रत्येकी २०० रुपये मजुरी दिली जाते.

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी भागातील कुयरीडाबर (ता. तळोदा) गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तेथे गाढवांद्वारे पाणी पुरवठा करण्याचा पर्याय प्रशासनाने शोधला आहे. या पर्यायानंतरही गावाला दरडोई फक्त तीन लीटर पाणीपुरवठा होतो.

माणसांची त्यातून जेमतेम तहान भागते पण वापरासाठी आणि जनावरांसाठी पाणी आणावे कुठून? असा प्रश्न येथील ग्रामस्थांपुढे पडला आहे.कुयरीडाबर हे सातपुड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या रांगेदरम्यान वसलेले गाव. गावाची लोकसंख्या ३१० आहे. रापापूरपर्यंत डांबरी रस्ता आहे. तेथून मात्र पायीच उंच डोंगर चढून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावाला पाणी पुरवठ्यासाठी दोन विहिरी आहेत. त्यातील एक विहीर भ्रष्टाचारात बुडाली तर दुसरी विहिरही कोरडी झाली. रविवारपासून गावाला गाढवांद्वारे पाणी पुरवण्याची अंमलबजावणी सुरू झाली.१७ गाढवे घेतली भाड्यानेपाणी पुरवठ्यासाठी १७ गाढव भाड्याने घेण्यात आले आहेत. गाढवांना ने-आण करण्यासाठी पाच मजूर आहेत. गाढवाच्या पाठीवर १५ लीटर पाण्याचे दोन ड्रम ठेवली जातात. तब्बल दोन तासानंतर ते कुयरीडाबरला पोहोचतात. प्रत्येक घरासाठी एक ड्रम दिला जातो. गावात एकूण ५६ घरे असल्याने दोन फेºया माराव्या लागतात.एका गाढवाला एका फेरीसाठी ७५ रुपयांची मजुरी दिली जाते तर गाढव ने-आण करणाºया पाच मजुरांना प्रत्येकी २०० रुपये मजुरी दिली जाते. ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्तर निधीतून या योजनेसाठी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गावात ५९२ जनावरे आहेत. त्यांच्यासाठी पाणी व चारा नाही. शिवाय दैनंदिन वापरासाठी पाणी आणावे कुठून? त्याचे उत्तर कुणाकडेही नाही. 

महाराष्ट्रासाठी ही खरोखरच एक लाजिरवाणी बाब असून सरकार व प्रशासनाने कुयरीडाबरसारखे अजूनही असंख्य गावे आहेत. तेथील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याची गरज आहे.-प्रतिभा शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा.