शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

विहिरींनी तळ गाठल्याने ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:51 IST

कोळदे शिवार : विहिरीतून पाणी काढण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील कोळदे परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला होता़ आता एप्रिलमध्ये विहिरींमध्ये नावालासुध्दा पाणी नसल्याची भिषण स्थिती निर्माण झालेली आहे़ गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे़या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींमधील पाणीपातळी कमालीची घटली आहे़ या भागात बहुसंख्य ट्युबवेल ५०० ते ७०० फुटापर्यंत आहेत़ परंतु दोन महिन्यांपसाून त्याही आटल्या असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले़ अद्याप मे महिना काढायचा असताना आतापासूनच पाण्याची वानवा निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे़पिकांना पाणी देण्याची चिंतापाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने येथील शेतकºयांनी जे काही खरिपाची थोडीफार पिक घेतली आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे़ या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने पाण्याअभावी पिक करपू लागली असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ सधन शेतकºयांकडून ठिबकच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्यात येत आहे़ परंतु इतर शेतकºयांसमोर मात्र समस्या निर्माण झालेली आहे़ मागील वर्षी ऐन पावसाळ्यातदेखील येथील पाण्याची पातळी खालावली होती़ त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते़ परंतु दिवसेंदिवस या समस्येत अधिक वाढ होत आहे़ त्यामुळे पिक जगवावी कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे़पिण्याच्या पाण्याचेही वांधेग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येसही तोंड द्यावे लागत आहे़ या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़ पाण्याच्या शोधात मजुरांना रोजंदारीदेखील बुडवावी लागत आहे़ अशी वस्तूस्थिती असताना निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणी टंचाईचा उदभवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आहे़ परिसरात सिंचन योजना कार्यान्वित करुन येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात येत आहे़चाºयासाठीही होताय हाल..पाणी व चाराटंचाईचा सामना येथील पशुपालकांनादेखील सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे़ येथील पशुपालकांना चाºयासाठी इतरत्र वणवण करावी लागत आहे़ पशुपालकांसमोर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चाºयाचा प्रश्न निर्माण होत असतो़ त्यामुळे बहुतेक ठिकाणी शेतमजुर पाणी व चाºयाच्या विवंचनेत फिरत असतात़ उन्हाळ्याचा अद्याप मे महिला बाकी आहे़ त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे़ सध्या तापमानातही वाढ होत आहे़ त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये पिकांचे मात्र नुकसान होत आहे़