शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
5
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
6
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
7
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
8
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
9
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
10
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
11
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
12
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
13
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
14
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
15
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
16
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
17
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
18
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
19
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
20
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक

भूगर्भात केवळ २० फुटांवर मिळते पाणी; जलपुनर्भरणाकडे मात्र नागरिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

नंदुरबार : शहर आणि परिसरात यंदा पावसाने हजेरी दिली नसल्याने चिंता वाढल्या आहेत. परंतु गेल्या तीन वर्षात सरासरीपेक्षा अधिक ...

नंदुरबार : शहर आणि परिसरात यंदा पावसाने हजेरी दिली नसल्याने चिंता वाढल्या आहेत. परंतु गेल्या तीन वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शहर आणि परिसरातील भूजल पातळी ही ६ मीटरने वर आली असून शहरात कोणत्याही भागात बोअर केल्यास अवघ्या २० ते २२ फुटांवर पाणी लागत आहे. असे असले तरी पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी होणारे रूफटाॅप हार्वेस्टिंग अर्थात जलपुनर्भरण मात्र टाळले जात आहे.

नंदुरबार शहराचा विस्तार हा चहूबाजूने वाढला आहे. धुळे रोड, तळोदा रोड, कोरीट रोड, साक्री नाका, बायपास रोड, होळ तसेच पातोंडा हद्दीलगत वसाहती विस्तारल्या आहेत. शहरातील धुळे राेड परिसरात उंच सखल भाग असल्याने या भागात बोअरिंग केल्यास पाणी ५० किंवा ७० फुटांपर्यंत लागत असल्याचे दिसून आले आहे. तर बायपास रोडलगत वसाहतींमध्येही उंचवटा असल्याने पाणी मिळवण्यास अडचणी येत आहेत. दुसरीकडे इतर भागात मात्र उतार असल्याने त्या ठिकाणी बारमाही पाणीसाठा आहे. नगरपालिकेकडून एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विरचक धरणातही सध्या मुबलक साठा आहे.

धुळे रोडला सर्वाधिक बोअरवेल आहेत. या भागात ५० फुटांपेक्षा अधिक खोली केल्यानंतर पाणी लागत आहे.

उंच टेकड्या आणि खडकाळ जमीन असल्याने या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. पाणी सखल भागात वाहून जाते.

ही परिस्थिती बदलण्यासाठी नागरिकांनी जलपुनर्भणाचे महत्त्व जाणून घेणे अपेक्षित असतानाही कारवाई होत नाही.

शहरातील उड्डाणपुलाच्या पलीकडे मुबलक पाणी

शहराच्या उत्तर-पूर्व भागातील तळाेदा रोड, नळावा रोड, कोरीट रोड या भागात मुबलक पाणीसाठा असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी २० ते २२ फुटांपेक्षा अधिक खोदकाम न करताही पाणी लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून बोअरवेल करताना पाइपांचा वाढीव खर्च करावा लागत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या भागालगत ग्रामीण हद्दीतील वसाहतीतही मुबलक पाणी आहे.

कोणीही यावे बोअरवेल खोदावे

घराच्या बांधकामाला परवानगी लागते. परंतु बोअरवेल खोदण्यास परवानगी लागत नाही.

यासाठीची परवानगी भूजल सर्वेक्षण विभागाकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु संबंधित विभागाने मात्र त्यास नकार दिला.

त्यामुळे कोणत्या भागात किती बोअरवेल आहेत याची अद्ययावत आकडेवारी मिळू शकली नाही.

जलपुनर्भरणाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता नाही. मातीचा भाग कमी होऊन काँक्रिटीकरण झाले असल्याने रुफ वाॅटर हार्वेस्टिंग वाढले पाहिजे. बांधकाम करतानाच तशी सोय केली पाहिजे. जमिनीत जाणारे हे पाणी त्यांनाच परत मिळेल.

- आर.ओ.भगमार, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग, नंदुरबार

जमिनीत पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी जलपुनर्भरण होणे गरजेचे आहे. केवळ शहरच नव्हे तर शहराला लागून ग्रामीण हद्दीतील वसाहतींमध्येदेखील जलपुनर्भरण वाढले पाहिजे. यातून नागरिकांना पावसाचे जमिनीत गेलेले पाणी परत मिळून टंचाई दूर होईल. -

दिग्विजय राजपूत, नंदुरबार