ग्रामपंचायतीचा ठराव नाही
सदर अतिक्रमणधारकांचा तेथील पुनर्वसनासाठी महसूल विभागाचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी तुळजा ग्रामपंचायतीकडून ठराव मागितला होता. परंतु ग्रामपंचायतीने तत्सम ठराव दिलेला नाही. तरीही हे अतिक्रमणधारक तुळाजा गावात येतात. त्यामुळे वनविभाग व महसूल प्रशासनाने संयुक्तिक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वनविभागाने टाकली नांगी
या अतिक्रमणधारकांनी ज्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. ती जमीन वनविभागाच्या मालकीची आहे. तरीही वनविभाग त्यांना तेथून उठवण्याबाबत उदासीन भूमिका घेत आहे. एकप्रकारे त्यांचा पुढे वनविभागाने अक्षरशः नांगीच टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. साहजिकच अतिक्रमणधारकांचे फावले आहे. त्यामुळेच त्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही. याबाबत गावकऱ्यांनी सातत्याने प्रत्यक्ष अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र अधिकारी तेवढ्या पुरता आम्हास खोटे आश्वासन देतात. एवढेच नव्हे जिल्हा प्रशासनास सुध्दा काही महिन्यांपूर्वी निवेदन दिले आहे. त्याचीही दखल आजपावेतो दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वनविभागाच्या ज्या कूप नंबरमध्ये राहणाऱ्या त्या नागरिकांनी वन अतिक्रमण दावे दाखल केले असून ते प्रलंबित आहेत. त्याबाबत चौकशी करीत आहोत. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल. - नीलेश रोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन कार्यालय तळोदा.
गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर संबंधितांच्या वन हद्दीतील अतिक्रमणबाबत चौकशी करण्याचे आदेश तळोदा वन परिक्षेत्र अधिकारी यांना दिले आहे. अहवाल प्राप्त झाल्याबरोबर पुढील कार्यवाही केली जाईल. - पी.के. बागूल, उपवन संरक्षक, मवासी वनविभाग तळोदा