शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

वाल्हेरी धबधबा पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : पर्यटकांचे खास आकर्षण असणारा तळोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधबा वाहायला सुरू झाली आहे. मात्र वर्षानुवर्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : पर्यटकांचे खास आकर्षण असणारा तळोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधबा वाहायला सुरू झाली आहे. मात्र वर्षानुवर्ष या पर्यटन स्थळांच्या विकासाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.सातपुड्याच्या पर्वत रांगेतून उगम पावणारा व जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला वाल्हेरी येथील धबधबा हा जिल्ह्यासह शेजारील गुजरात राज्यातील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, युवकांची पाऊले या पर्यटन स्थळांकडे वळू लागतात. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी धबधबा वाहण्यास सुरूवात झाली आहे.यावर्षी कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे असणारे लॉकडाऊन व सुरक्षितता म्हणून घराबाहेर न पडणे, यामुळे सर्व नागरिक गेल्या चार महिन्यांपासून घरातच बंद आहेत. दरवर्षी मे महिन्यात सुट्यांमध्ये परिवारासह फिरायला जाणाऱ्यांनादेखील यावर्षी कुठेही पर्यटनासाठी बाहेर जाता आलेले नाही. अश्या परिस्थितीत स्थानिक पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. अनेक जण आपल्या परिवारासह सातपुड्यात भ्रमंती करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा सातपुड्याच्या पायथ्याशी तळोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधबा हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण असताना या पर्यटन स्थळाचा विकास अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे.तळोदा शहरापासून सुमारे २० किमी अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी वाल्हेरी हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून कोणताही विकास झाला नसल्याने येणाºया पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. धबधब्यापर्यंत पर्यटकांना सहज पोहचायला मदत व्हावी यासाठी साधे दिशादर्शक फलकदेखील नसल्याची स्थिती आहे. धबधब्यापर्यंत पोहचायला चांगल्या स्थितीतील रस्तादेखील आहे. सोयीसुविधासह या धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधात्मक व संरक्षणात्मक उपाययोजनादेखील नाही. या धबधब्यात अनेक तरूणांचे बळीदेखील गेले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसुविधासह सुरक्षिततेच्या दृष्टीने यापर्यटन स्थळाचा विकास करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, हे पर्यटनस्थळ वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने २०१५-२०१६ मध्ये तळोद्याचे तत्कालीन वनसंरक्षक अशोक पाटील यांनी वन विभागाच्या वतीने या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी वाल्हेरी पर्यटनस्थळ विकासाचा प्रस्ताव तयार करून राज्याचे प्रधान वनसंरक्षक यांच्याकडे पाठपुरावा करून या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ४० लाखांच्या निधी प्रस्तावाला वनविभागाकडून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली होती. मात्र यासाठी प्रत्यक्ष पैसाच मिळाला नसल्याने कोणत्याही प्रकारच्या विकासाचे काम या पर्यटन स्थळाचे हाऊ शकले नसल्याचे सांगितले जाते. यानंतर एप्रिल २०१७ मध्ये पुन्हा आमदार उदेसिंग पाडवी यांच्या पाठपुराव्यानुसार येथील वनविभागाने ५६ लाख ४७ हजारांचा प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे पाठविला होता. यानंतरदेखील हे पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होऊ शकली नाही. पाच ते सहा वर्षांपूर्वी असुविधेच्या बाबतीत जी स्थिती होती, तीच आजही आहे. या पर्यटन स्थळाच्या विकास झाल्यास स्थानिकांनादेखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पर्यटन विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.