शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

सरीवर सरींची लागली प्रतीक्षा; जिल्ह्यात केेवळ ३९ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्ह्यात दीड महिन्यापासून पाऊस हुलकावणी देत आहे. यामुळे खरीप हंगामाला ब्रेक लागला असून, आतापर्यंत केवळ ३९ टक्के ...

नंदुरबार : जिल्ह्यात दीड महिन्यापासून पाऊस हुलकावणी देत आहे. यामुळे खरीप हंगामाला ब्रेक लागला असून, आतापर्यंत केवळ ३९ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्याचे समोर आले आहे. पाऊसच नसल्याने पेरण्यांना गती मिळाली नसल्याची माहिती देण्यात येत आहे.

जिल्ह्यात यंदा तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, कापूस, तसेच नवीन ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी मेपासून सज्ज झाले होते. गेल्या दोन वर्षांत पावसाची समाधानकारक हजेरी राहिल्याने यंदाही पाऊस चांगला येणार असल्याच्या अंदाजामुळे शेतकरी क्षेत्रवाढीसाठी उत्सुक होते. परिणामी, जिल्ह्यात २ लाख ८३ हजार हेक्टरवर पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे; परंतु जून महिन्यात पाऊस न आल्याने पेरण्यांना ब्रेक लागून जिल्ह्यात केवळ १ लाख ११ हजार ५१४ हेक्टरवर पिकांची पेरणी झाल्याचे समोर आले आहे. ही पेरणी निर्धारित क्षेत्राच्या केवळ ३९ टक्के आहे. ऊस पिकासह टक्केवारी ४० टक्के आहे. पावसाअभावी कूपनलिकांना पाणी नसल्याने बागायदारांची कामेही रखडली असून, फळपिकांचे संगोपन करण्यात अडचणी येत असल्याची माहिती दिली जात आहे.

दुसरीकडे कापसाचे निर्धारित क्षेत्र यंदा कमी झाले असले तरीही एकूण ४५ टक्के कापूस लागवड पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर दुबारचे संकट आहे. यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

सर्वच तालुक्यांत पेरण्या

जिल्ह्यात यंदा २ लाख ८३ हजार ४८० हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी करणे निर्धारित आहे.

आजअखेरीस जिल्ह्यात १ लाख ११ हजार ५१४ हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.

निर्धारित क्षेत्राच्या ३९ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्व सहा तालुक्यांत खरीप पिकांचा पेरा झाला आहे.

तळोद्यात कमी

आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात १७ हजार ९८४, नवापूर ३६,७८१, शहादा १८ हजार ५०२, तळोदा ३ हजार १५५, धडगाव १६ हजार ३२५, तर अक्कलकुवा तालुक्यात १८ हजार ७६७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक ८२ टक्के पेरण्या धडगाव, तर सर्वाधिक कमी १७ टक्के पेरण्या तळोदा तालुक्यात झाल्या आहेत.

सोयाबीन खालावला : पावसाअभावी शेतकऱ्यांनी तयार करून ठेवलेले साेयाबीन बियाणे घरात पडून आहे. परिणामी, यंदा सोयाबीनचा पेरा जून महिना उजाडूनही ४१ टक्के आहे. आजअखेरीस जिल्ह्यात ११ हजार ४२६ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. यात सर्वाधिक ७ हजार ७२१ हेक्टर पेरणी ही नवापूर तालुक्यातील आहे.

जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पावसाची सरासरी चांगली असल्याने भागात पेरण्यांना अधिक गती आहे. यातून भात आणि मका पिकांना पसंती आहे. तालुक्यात ६ हजार २३८ हेक्टर भात आणि ३ हजार २४० हेक्टर मका पेरा पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीन पेरा करण्यावर भर देतात. यंदा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयार केलेले साेयाबीन बियाणे घरातच पडून आहे. असे असतानाही आजअखेरीस जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवर सोयाबीन बियाणे पेरणी झाली आहे.