शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

सरीवर सरींची लागली प्रतीक्षा; जिल्ह्यात केेवळ ३९ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्ह्यात दीड महिन्यापासून पाऊस हुलकावणी देत आहे. यामुळे खरीप हंगामाला ब्रेक लागला असून, आतापर्यंत केवळ ३९ टक्के ...

नंदुरबार : जिल्ह्यात दीड महिन्यापासून पाऊस हुलकावणी देत आहे. यामुळे खरीप हंगामाला ब्रेक लागला असून, आतापर्यंत केवळ ३९ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्याचे समोर आले आहे. पाऊसच नसल्याने पेरण्यांना गती मिळाली नसल्याची माहिती देण्यात येत आहे.

जिल्ह्यात यंदा तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, कापूस, तसेच नवीन ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी मेपासून सज्ज झाले होते. गेल्या दोन वर्षांत पावसाची समाधानकारक हजेरी राहिल्याने यंदाही पाऊस चांगला येणार असल्याच्या अंदाजामुळे शेतकरी क्षेत्रवाढीसाठी उत्सुक होते. परिणामी, जिल्ह्यात २ लाख ८३ हजार हेक्टरवर पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे; परंतु जून महिन्यात पाऊस न आल्याने पेरण्यांना ब्रेक लागून जिल्ह्यात केवळ १ लाख ११ हजार ५१४ हेक्टरवर पिकांची पेरणी झाल्याचे समोर आले आहे. ही पेरणी निर्धारित क्षेत्राच्या केवळ ३९ टक्के आहे. ऊस पिकासह टक्केवारी ४० टक्के आहे. पावसाअभावी कूपनलिकांना पाणी नसल्याने बागायदारांची कामेही रखडली असून, फळपिकांचे संगोपन करण्यात अडचणी येत असल्याची माहिती दिली जात आहे.

दुसरीकडे कापसाचे निर्धारित क्षेत्र यंदा कमी झाले असले तरीही एकूण ४५ टक्के कापूस लागवड पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर दुबारचे संकट आहे. यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

सर्वच तालुक्यांत पेरण्या

जिल्ह्यात यंदा २ लाख ८३ हजार ४८० हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी करणे निर्धारित आहे.

आजअखेरीस जिल्ह्यात १ लाख ११ हजार ५१४ हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.

निर्धारित क्षेत्राच्या ३९ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्व सहा तालुक्यांत खरीप पिकांचा पेरा झाला आहे.

तळोद्यात कमी

आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात १७ हजार ९८४, नवापूर ३६,७८१, शहादा १८ हजार ५०२, तळोदा ३ हजार १५५, धडगाव १६ हजार ३२५, तर अक्कलकुवा तालुक्यात १८ हजार ७६७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक ८२ टक्के पेरण्या धडगाव, तर सर्वाधिक कमी १७ टक्के पेरण्या तळोदा तालुक्यात झाल्या आहेत.

सोयाबीन खालावला : पावसाअभावी शेतकऱ्यांनी तयार करून ठेवलेले साेयाबीन बियाणे घरात पडून आहे. परिणामी, यंदा सोयाबीनचा पेरा जून महिना उजाडूनही ४१ टक्के आहे. आजअखेरीस जिल्ह्यात ११ हजार ४२६ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. यात सर्वाधिक ७ हजार ७२१ हेक्टर पेरणी ही नवापूर तालुक्यातील आहे.

जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पावसाची सरासरी चांगली असल्याने भागात पेरण्यांना अधिक गती आहे. यातून भात आणि मका पिकांना पसंती आहे. तालुक्यात ६ हजार २३८ हेक्टर भात आणि ३ हजार २४० हेक्टर मका पेरा पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीन पेरा करण्यावर भर देतात. यंदा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयार केलेले साेयाबीन बियाणे घरातच पडून आहे. असे असतानाही आजअखेरीस जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवर सोयाबीन बियाणे पेरणी झाली आहे.