शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:51 IST

दुष्काळी स्थितीचा विद्याथ्र्याना फटका

नंदुरबार : दुष्काळी घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील विद्याथ्र्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आलेला आह़े परंतु याबाबत अद्याप ठोस कार्यवाही होत नसल्याने विद्याथ्र्याना दुस:या शिक्षण सत्राचा परीक्षा शुल्क भरावा लागत आह़े त्यामुळे येथील आदिवासी विद्याथ्र्याना आर्थिक भरुदड सोसावा लागत आह़े उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून   5 नोव्हेंबर पाठोपाठ 20 नोव्हेंबर रोजी नव्याने  शासन निर्णय काढण्यात आला होता़ त्यात, दुष्काळी ठरविण्यात आलेल्या 180 तालुक्यांमधील विद्याथ्र्याचा परीक्षा शुल्क माफ करण्यात यावा अशा स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहेत़ परंतु प्रत्यक्षात याबाबत कुठलीही कार्यवाही होत नसल्याने येथील आदिवासी विद्याथ्र्याना परीक्षा शुल्काच्या आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत़ उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून या आधीसुध्दा 5 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय काढून दुष्काळी तालुक्यातील विद्याथ्र्याना परीक्षा शुल्क माफ करण्यात यावा अशा सुचना विद्यापीठ तसेच महाविद्यालय व्यवस्थापनाला करण्यात आल्या होत्या़ परंतु अद्यापही जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमांतर्गत विद्याथ्र्याकडून परीक्षा शुल्काची रक्कम वसूल करण्यात येत आह़े याबाबत विद्यापीठ प्रशासनाला विचारले असता अद्याप सहसंचालक कार्यालयाकडून कार्यवाहीबद्दल मार्गदर्शन सूचना आल्या नसल्याचे सांगण्यात आले आह़े शासन निर्णयाबाबत तत्परता दाखविण्यात येत नसल्याने परिणामी हजारो विद्यार्थी परीक्षा शुल्क  भरत आहेत़ दरम्यान, तंत्रशिक्षण संचालनाअंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्याथ्र्याना परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे असे आदेश शासनाकडून काढण्यात आले आह़े खरिप हंगामातील 2018-2019 अंतर्गत येणा:या एकूण 180 दुष्काळी तालुक्यांमधील विद्याथ्र्याना संपूर्ण परीक्षा शुल्क माफ तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 50 टक्के प्रवेश शुल्क परत देण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाला देण्यात आलेल्या आहेत़ त्यामुळे याबाबत तत्काळ अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा  व धडगाव तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहिर करण्यात आलेली आह़े आधीच पाण्याअभावी शेतीची वाताहत झालेली असताना दुसरीकडे शैक्षणिक खर्चाचा बोजाही दुष्काळग्रस्तांना सहन करावा लागत आह़े शासनाकडून दुष्काळ सदृश्य जिल्हे जाहिर करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास अद्याप किती काळ लागेल अशी विचारणा दुष्काळग्रस्तांकडून करण्यात येत आह़े  नंदुरबार जिल्ह्यात एकूण 50 महाविद्यालये कवयित्रि बहिणाबाई  चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित आहेत़ दुष्काळी तालुक्यांमध्ये विद्याथ्र्याच्या 50 टक्यांर्पयत शैक्षणिक शुल्कात सवलत मिळाल्यास याचा फायदा जिल्ह्यातील हजारो विद्याथ्र्याना मिळणार आह़े यंदा जिल्ह्यात केवळ 67 टक्के पाऊस झाला असल्याने पिकांची स्थिती अत्यंत दैनिय झालेली आह़े अनेक ठिकाणी उभी पिक जळालेली दिसून येत आह़े त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त भागात त्वरीत मदतकार्य सुरु करुन तातडीने विद्याथ्र्याच्या शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी अशी मागणी होत आह़े अनेक ठिकाणी विद्याथ्र्याकडून शैक्षणिक वर्षाचा संपूर्ण परीक्षा शुल्क आकारण्यात येत आह़ेदिवाळीच्या सुटय़ा संपूण आता नव्याने शाळा, महाविद्यालये सुरु होणार आहेत़ मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा होणार असल्याने साधारणत: नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विद्याथ्र्याकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येत असतो़ शासनाने ठरविलेल्या धोरनांचे तत्काळ अंमलबजावणी झाली असती तर, आता विदयाथ्र्याना परीक्षा शुल्क भरण्याची गरज पडली नसती, असे दुष्काळग्रस्तांकडून सांगण्यात येत आह़े आदिवासी दुर्गम भागात शेती हाच मुख्य आर्थिक कणा मानला जात असतो़ परंतु यंदाच्या दुष्काळात हा कणाच मोडून पडल्याने यामुळे शेतक:यांचे मोठ आर्थिक नुकसान झालेले आह़े त्यातच परीक्षा शुल्काचा भरुदड सोसावा लागत असल्याने सर्वच बेजार झाले आहेत़