शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाघेश्वरी चौफुली रस्ता काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन रस्ता तयार करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु या रस्त्याच्या सुरुवातीला व रस्ता संपल्यावर दोन्ही बाजूला काम अपूर्ण असून तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत. या खड्डयांमध्ये रोज अपघात होत आहेत. वाहन चालकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, गांधीगिरी करीत या ठिकाणी जयहिंद फाऊंडेशनने खड्डयात फुले वाहून लक्ष वेधले. याबाबत जयहिंद फाऊंडेशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा रस्ता एकुण ३८० मीटर आहे. त्यापैकी २० ते ३० मीटरचे बांधकाम अपूर्ण आहे. दरवर्षी रस्त्याची होणारी दुरवस्था लक्षात घेऊन ३८० मीटर लांबी व १२ मीटर रुंदी असा रस्ता मंजूर करण्यात आला. यासाठी दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक देखील मंजूर करण्यात आले. त्यापैकी रस्ते कामावर एक कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीदेखील जर अपघात घडत असतील आणि सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येणार असेल तर एवढा मोठा निधी खर्च झाल्याचा उपयोग काय? हा भाग नेहमी रहदारीचा असतो या रस्त्यावरून हजारो वाहने ये-जा करीत असतात. परंतु या प्रवाशांना रस्ता बांधकाम झाल्यानंतर देखील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाघेश्वरी चौफुली कडील भाग खड्ड्यांनी व्यापलेला असून त्यानंतरचा रस्त्याच्या शेवटचा भाग मुख्य रस्त्यापासून एक फूट उंचीवर आहे. हा अत्यंत धोकादायक आहे. एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी बांधकाम करताना कोणता पर्याय वापरण्यात आला आहे हा देखील संशोधनाचा भाग असून यावर देखील योग्य उपाय शोधणे आवश्यक आहे.तातडीने कामास सुरुवात करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा जयहिंद फाउंडेशन तर्फे दिग्विजय राजपूत, भूषण राजपूत, अक्षय कोकणी, फारुख, मोईन शेख व कार्यकर्त्यांनी दिला आहे.या ठिकाणी खड्डयांचे प्रमाण वाढल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमट्टी करून डांबर व खडी टाकली. यामुळे सोय होण्याऐवजी गैरसोय झाली. खडींमुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय दुचाकी वाहनांचा तोल जावून पडण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. ही बाब लक्षात घेता या रस्त्याची कायमस्वरूपी दुरूस्ती करून अपुर्ण राहिलेले काम पुर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचसाठी हे आंदोलन करण्यात आले.