शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

दोन महिन्यापासून मजुरांची मजुरी थकल्याने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST

तळोदा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती, कृषी, वन विभाग या यंत्रणेत काम केलेल्या साधारण एक ...

तळोदा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती, कृषी, वन विभाग या यंत्रणेत काम केलेल्या साधारण एक हजार मजुरांची गेल्या दोन महिन्यांपासून मजुरी थकली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे मजूर सतत आपल्या थकीत मजुरीसाठी सातत्याने हेलपाटे मारत आहेत. दरम्यान याबाबत सबंधित प्रशासनास विचारले असता वरूनच रक्कम प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.

शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तळोदा तालुक्यात पंचायत समिती, कृषी कार्यालय, सामाजिक वनीकरण व मेवासी वन कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या वनक्षेत्रपाल, वनक्षेत्रपाल रोहयो यांच्या कार्यक्षेत्रात विविध कामे सुरू आहेत. पंचायत समितीमार्फत घरकुले तर कृषी व वनविभाग यांच्या मार्फत नाला बिल्डिंग, वनराई बंधारे, कंपार्टमेंट अशी कामे सुरू आहेत.

या यंत्रणांकडून साधारण लहान, मोठी तीन ते साडे तीन हजार पेक्षा अधिक कामे सुरू आहेत. सुत्रांनुसार एक हजार मजुरांचे मस्टर भरले जात असल्याचे सांगण्यात येते. या मजुरांना एका दिवसाची मजुरी २१६ रूपये दिली जात असते. तथापि गेल्या दोन महिन्यापासून या मजूरांना त्यांची मजुरी मिळालेली नसल्याच्या तक्रारी आहेत. एक, दोन आठवडा नव्हे तर तब्बल दोन महिन्यांपासून मजुरी थकली आहे. त्यामुळे त्यांचावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी व्यथा काही मजुरांनी बोलून दाखवली आहे.

वास्तविक या मजुरांचे हातावरच पोट आहे. जेवढे काम करतील तेव्हाच त्यांची पोटाची खळगी भरू शकतात, असे असताना शासनाच्या दिरंगाईच्या धोरणाच्या नाहक फटका त्यांना सोसावा लागत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना मजुरांच्या रोषदेखील पत्करावा लागत आहे. वास्तविक महसूल प्रशासनाने सबंधित यंत्रणेने कामाचे मजुरीचे मस्टर दाखल केले आहे. शिवाय महसूल प्रशासनानेदेखील हे मस्टर अद्यावत करून वरिष्ठ यंत्रणांकडे दाखल केले आहे. तेही दर आठवड्याला केले आहे, असे असताना मजूरी बाबत अजून कार्यवाही होत नसल्याने मजुरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकीकडे मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामे घेण्याचे शासन आदेश देते तर दुसरीकडे मजुरांची थकलेली मजूरी देण्यासाठी दिरंगाईच धोरण घ्यायचे. प्रशासनाच्या अशा दुटप्पी धोरणामुळे मजुरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १५ दिवसाच्या आत त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन मजूरी जमा केली जाते. मात्र दोन महिने होवूनही त्यांचा खात्यावर रक्कम पडलेली नाही. साधारण प्रशासनाने २३ लाखांची मागणी केली आहे. रोजगार हमी योजनेच्या नागपूर उपयुक्त कार्यालयाकडूनच थकीत मजुरीची रक्कम प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या पाच ते सहा दिवसात थकीत मजुरीचा प्रश्न प्रशासनाने निकाली काढावा, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा मजुरांनी दिला आहे.

घरकुळांची मजूरी देखील रखडली

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेत एक लाख ४१ हजाराचे घरकुल लाभार्थ्यांना दिले जात असते. त्यात २१ हजार रूपयांचे अनुदान रोजगार हमी योजनेतून दिले जाते. म्हणजे लाभार्थ्यांनी घरकुलावर केलेल्या कामाची मजुरी यातून दिली जात असते. साहजिकच त्याच्या मेहनतीचा हातभार घरकुलास मिळत असतो. तथापि त्यांची मजूरीदेखील रोहयोने थकविले आहे. साधारण ३०० घरकुल लाभार्थींची मजुरी थकली आहे. हे लाभार्थी सुध्दा पंचायत समितीत हेलपाटे मारत आहेत. त्यांनाही वरूनच रक्कम थकल्याचे उत्तर मिळत आहे. त्यामुळे त्यांना हताश होवून परत जावे लागत असते. लोकप्रतिनिधींनी तरी रखडलेल्या मजुरीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

दरम्यान सोमवारी पंचायत समितीच्या रखडलेल्या व अपूर्ण असलेल्या घरकुलाचे आढावा बैठकीत मजुरीचा प्रश्ना उपस्थित करण्यात आला होता. त्याच बरोबर फॉरेस्ट विभागात काम करणाऱ्या मजुरांचीदेखील मजुरी देण्यात आले असल्याचे त्या विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शासनाच्या रोजगार हमी योजनेत मजुरीतून घरकुलाचे काम केले आहे. तसे मस्टरदेखील भरले आहे. परंतु अजूनही थकीत मजुरी मिळालेली नाही. त्यासाठी संबंधितांकडे सातत्याने चकरा मारत आहे. वरूनच रक्कम प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात येते.

- दत्तू सूकलाल ठाकरे, लाभार्थी, तळवे, ता.तळोदा.