शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदान अधिकारी,कर्मचा:यांचे दोन दिवस जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासन काही दिवसांपासून दिवसरात्र राबत आहेत. दोन दिवसांपासून तर जिल्हाधिका:यांपासून तर कर्मचा:यांर्पयत सर्वच 24 तास काम करीत आहे. मतदानाच्या दिवशी तर निवडणूक विभागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच जागे होते, हे विशेष. आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक विभागाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु शनिवारपासून धावपळ वाढली. साहित्य वाटपाच्या दिवसापासून जागरण सुरु झाले. मतदानाचा दिवस सर्वात महत्त्वाचा ठरला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सर्व ईव्हीएम मशीन सील करून ते आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. येथे ईव्हीएमची मोजणी झाली. किती खराब झाले. ते परत आलेत का? या सगळ्यांची बूथनिहाय मोजणी केली. नंतर प्रत्येक मशीन विधानसभानिहाय कंटेनरमध्ये सीआयपीएफच्या सुरक्षेत नंदुरबार येथील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित पोहोचवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिका:यांपासून तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व कक्ष अधिकारी कर्मचा:यांचे जागरण झाले होते. परंतु निवडणूक विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारीही रात्रभर जागले. सोमवारी कामावर आलेले अनेक अधिकारी तर मंगळवारी दुपार्पयत कार्यालयातच होते, हे विशेष. या कर्मचा:यांसोबतच मतदान केंद्रांवर डय़ुटी असलेले कर्मचारी देखील दोन दिवस जागले. आदल्या दिवशी मतदान साहित्य घेवून आपापल्या गावाच्या केंद्रावर  पोहचले. काही केंद्रावर पंखे नाही, डास व मच्छरांचा प्रादुर्भाव, मोकळ्या हवेची कमतरता यामुळे अशा केंद्रांवरील कर्मचा:यांचे जागरणच झालेच. शिवाय मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र संबधीत विधानसभा मतदार संघ मुख्यालयात पोहचविणे आणि तेथून मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी व घरी जाणे या  सर्व प्रवासाला रात्री 1 ते तीन वाजले होते. त्यामुळे या कर्मचा:यांचे देखील दोन दिवस जागरण झाले.  परंतु राष्ट्रीय कर्तव्याचा अभिमान बाळगत अशा कर्मचा:यांनी   कुठलीही तक्रार किंवा चिडचिडपणा  न करता आपले कर्तव्य  निभावले.दरम्यान, मंगळवारी दुपारनंतर काही कर्मचा:यांना सूट देण्यात आली तर बुधवारी महाराष्ट्र दिनाची सुटी असल्यामुळे कर्मचा:यांना विश्रांतीसाठी वेळ मिळणार आहे.