शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

मतदानातील चढ-उतार कुणाच्या पथ्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:45 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात नंदुरबार वगळता इतर तिन्ही विधानसभा मतदार संघात मतदारांनी ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात नंदुरबार वगळता इतर तिन्ही विधानसभा मतदार संघात मतदारांनी मतदानाचा उत्साह दाखविला आहे. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा झालेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडेल याबाबत आता लोकांमध्ये उत्सुकता लागली असून, जो तो आपले नवी समीकरणे मांडत जय-पराजयाची बेरीज-वजाबाकी करीत आहेत. त्यामुळे सध्या चौका-चौकात याच गप्पांना ऊत आला असून, सर्वाचेच लक्ष निकालाकडे लागले आहे. जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर, शहादा व अक्कलकुवा या चारही विधानसभा मतदार संघामध्ये सोमवारी मतदान झाले. ही निवडणूक राजकारणाच्या दृष्टीने नवे समिकरण मांडणारी निवडणूक ठरली. कारण निवडणुकीच्या टप्प्यावरच जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्ष बदल केल्यामुळे काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये आले तर भाजपचे नेते काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे राजकारणातील ही उलथापालथ मतदारांनाही शेवटच्या क्षणार्पयत संभ्रमीत करीत राहिली. याच संभ्रमीत अवस्थेत या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यामुळे जय-पराजयाचा अंदाज बांधणेही सर्वासाठी काहीसा तसाच अवघड ठरत आहे. विशेषत: या निवडणुकीत सर्वच ठिकाणी कुठेही स्थानिक प्रश्नांवर चर्चा होताना दिसून आली नाही. विकासाचा प्रभावी अजेंडा कुणीही मांडला नाही. केवळ औपचारिक घोषणा, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप यातच निवडणूक रंगली. त्यामुळे मतदारांमध्येही काही ठिकाणी उत्साह तर काही ठिकाणी निरुत्साह दिसून आला. शहरी भागात फारसा उत्साह नव्हता. नंदुरबार, शहादा येथे खूपच कमी मतदान झाले.चार विधानसभा क्षेत्रापैकी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नंदुरबार विधानसभा मतदार संघात सर्वात कमी म्हणजे 55.28 टक्के मतदान झाले आहे. जे 1985 नंतर सर्वात कमी आहे. 1985 ला निवडणुकीत फारशी चुरस नव्हती. त्यावेळचे विजयी उमेदवार इंद्रसिंग वसावे हे 49.28 टक्के अधिक मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर प्रथमच या वेळीदेखील सर्वात कमी म्हणजे 55.28 टक्के मतदान झाले आहे. याबाबत राजकीय गोटात वेगवेगळ्या चर्चा चर्चील्या जात आहेत. 1985 प्रमाणेच निवडणुकीत चुरस नसल्याने मतदान कमी झाल्याचे बोलले जात आहे. तर काही ठिकाणी चंद्रकांत रघुवंशी व डॉ.विजयकुमार गावीत गट एकत्र आल्याने मतदारांमध्ये उत्साह नसल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघात भाजपाचे डॉ.गावीत विरूद्ध काँग्रेसचे उदेसिंग पाडवी अशी लढत झाली.जिल्ह्यात सर्वाधिक मतदान नवापूर विधानसभा मतदारसंघात झाले. या ठिकाणी गेल्या चार दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात एकत्र काम करणारे नेते माणिकराव गावीत व सुरूपसिंग नाईक या दोन्ही नेत्यांचे वारसदार भरत गावीत व शिरीष नाईक हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात माजी आमदार शरद गावीत यांनीही निवडणुकीत चुरस निर्माण केली. त्यामुळे मतदानाची टक्केवारी येथे वाढल्याचे सांगितले जाते. गेल्या 2014 मध्ये देखील याठिकाणी 74.18 टक्के मतदान झाले   होते. आता मात्र त्यापेक्षा अधिक म्हणजे 75.37 टक्के मतदान झाले आहे. त्यापेक्षा अधिक 2009 मध्ये या ठिकाणी मतदान झाले होते. त्या वेळी 76.06 टक्के मतदान झाले होते.    तेव्हा मात्र या मतदार संघात सुरूपसिंग नाईक यांचा प्रथमच पराभव झाला होता. आतादेखील मताधिक्य गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का अधिक झाले असल्याने हे वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.शहादा मतदार संघातदेखील या वेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत किंचीत 0.16 टक्के मतदान वाढले आहे. येथे 2014 मध्ये 65.16 टक्के मतदान झाले होते. त्या वेळी येथे तिरंगी लढत होती. या वेळी मात्र येथे 65.31 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार पद्माकर वळवी या वेळीदेखील काँग्रेसतर्फे उमेदवारी करीत होते. तर भाजपतर्फे राजेश पाडवी यांच्या रुपाने नवीन उमेदवार देण्यात आला. गेल्या वेळी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविणारे राजेंद्र गावीत यांनी भाजपात प्रवेश केल्याने ते भाजप सोबत होते. याच ठिकाणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  अक्कलकुवा मतदार संघातही तिरंगी लढतीमुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी काँग्रेसचे के.सी. पाडवी व शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि भाजपचे बंडखोर नागेश पाडवी यांच्यात चुरशीची लढत झाली. चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यांनतर त्यांनी आपल्या कार्यकत्र्यासह अक्कलकुव्यात डेरा दाखल केला होता. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली. त्याचाच परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला आहे.