शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा घामाचा थेंबाला आले मोत्याचे मोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 11:54 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गाव जेंव्हा जिद्दीला पेटून एकत्र येते आणि एखाद्या कामासाठी झोकून देते ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गाव जेंव्हा जिद्दीला पेटून एकत्र येते आणि एखाद्या कामासाठी झोकून देते तेंव्हा काय चमत्कार होतो याचा प्रत्यय कोठलीखुर्द, ता.नंदुरबार या गावाला आला आहे. जलसंधारणाच्या कामासाठी या गावातील ग्रामस्थांनी तब्बल दोन महिने आपला घाम गाळून मातीत संस्कार केल्याने त्यातून तब्बल आठ कोटी रुपये पेक्षा अधीक खर्चाची कामे झाली आहेत. या कामाने  दुष्काळाला आव्हान दिले आहे. कोठली हे नंदुरबारपासून दहा किलोमिटर अंतरावरील सुमारे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे समृद्ध असलेल्या या गावाला बकाल स्वरूप येत होते. त्याची वेळीच दखल घेवून गाव जागृत झाले. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावातील तरुण एकत्र आले. त्याला प्रशासनाने साथ दिली आणि पहाता पहाता गाव जिद्दीला पेटले. गावातील सुमारे 1200 लोकांनी तब्बल 50 दिवस रोज चार ते पाच तास श्रमदान केल्यामुळे गावात कंपार्टमेंट बडींग, मातीनाला बांध, सलग समपातळी चर, लूज बोल्डर स्ट्रर, सिमेंट नाला बांध, शेततळे, नाला खोलीकरण आदी विविध कामे झाली. ग्रामस्थांचा उत्साह पाहून जिल्हा परिषदेच्या अधिका:यांनी व इतर दात्यांनी डिङोलसाठी मदत दिली. त्यातून पोकलॅण्ड व जेसीबी द्वारेही कामे सुरू झाली. आणि दोन महिन्यात या गावाला चमत्कारीक स्वरूप आले. ग्रामस्थांनी श्रमदानातून साधारणत: 2705.868 घनमिटर कंपार्टमेंट बडींग, 75746.43 घटनमिटर नाला रुंदीकरण व खोलीकरण, सलग समपातळी चराचे 161.36 घनमिटर जलशोषक चर, 218.79 घटनमिर लूज बोल्डर स्ट्ररचे 25.9024 घनमिटर, विहिर पुनर्रभरणाचे 5600 घटनमिटर, सिमेंट नाला बांधचे 1968 घनमिटर, माती नाला बांधचे 3457.5 घनमिटर आणि शेततळ्याचे 48431.4 घनमिटर काम केले आहे. याशिवाय 746 शोषखड्डयांसह विविध कामे केली आहेत.  गावातील वॉटर बजेट पहाता काम सुरू होण्यापूर्वी या गावात जेमतेम 207.76 कोटी लिटर पाणी उपलब्ध होते. वास्तवीक या गावाला वर्षाकाठी 19,716.19 कोटी लिटर पाण्याची गरज होती. परंतु पावसाचे पाणी   वाहून जात असल्याने या गावाला     19, 508.426 कोटी लिटर पाण्याचा तुटवडा     भासत होता. हा तुटवडा भरून काढण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या कामांची उपयुक्तता वाढली आहे. या कामांमुळे 138315.986 कोटी लिटर पाणी अडणार असल्याने गावातून आता दुष्काळ हद्दपार    होईल असा आत्मविश्वास ग्रामस्थांना आला आहे. त्यामुळे आता सर्वाना यंदाचा पावसाची प्रतिक्षा लागली आहे.