शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
2
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
3
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
4
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
5
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
6
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
7
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
8
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
9
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
10
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
11
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
12
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
13
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
14
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
15
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
16
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
17
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
18
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
19
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
20
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

ग्रामस्थांचा घामाचा थेंबाला आले मोत्याचे मोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 11:54 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गाव जेंव्हा जिद्दीला पेटून एकत्र येते आणि एखाद्या कामासाठी झोकून देते ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गाव जेंव्हा जिद्दीला पेटून एकत्र येते आणि एखाद्या कामासाठी झोकून देते तेंव्हा काय चमत्कार होतो याचा प्रत्यय कोठलीखुर्द, ता.नंदुरबार या गावाला आला आहे. जलसंधारणाच्या कामासाठी या गावातील ग्रामस्थांनी तब्बल दोन महिने आपला घाम गाळून मातीत संस्कार केल्याने त्यातून तब्बल आठ कोटी रुपये पेक्षा अधीक खर्चाची कामे झाली आहेत. या कामाने  दुष्काळाला आव्हान दिले आहे. कोठली हे नंदुरबारपासून दहा किलोमिटर अंतरावरील सुमारे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे समृद्ध असलेल्या या गावाला बकाल स्वरूप येत होते. त्याची वेळीच दखल घेवून गाव जागृत झाले. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावातील तरुण एकत्र आले. त्याला प्रशासनाने साथ दिली आणि पहाता पहाता गाव जिद्दीला पेटले. गावातील सुमारे 1200 लोकांनी तब्बल 50 दिवस रोज चार ते पाच तास श्रमदान केल्यामुळे गावात कंपार्टमेंट बडींग, मातीनाला बांध, सलग समपातळी चर, लूज बोल्डर स्ट्रर, सिमेंट नाला बांध, शेततळे, नाला खोलीकरण आदी विविध कामे झाली. ग्रामस्थांचा उत्साह पाहून जिल्हा परिषदेच्या अधिका:यांनी व इतर दात्यांनी डिङोलसाठी मदत दिली. त्यातून पोकलॅण्ड व जेसीबी द्वारेही कामे सुरू झाली. आणि दोन महिन्यात या गावाला चमत्कारीक स्वरूप आले. ग्रामस्थांनी श्रमदानातून साधारणत: 2705.868 घनमिटर कंपार्टमेंट बडींग, 75746.43 घटनमिटर नाला रुंदीकरण व खोलीकरण, सलग समपातळी चराचे 161.36 घनमिटर जलशोषक चर, 218.79 घटनमिर लूज बोल्डर स्ट्ररचे 25.9024 घनमिटर, विहिर पुनर्रभरणाचे 5600 घटनमिटर, सिमेंट नाला बांधचे 1968 घनमिटर, माती नाला बांधचे 3457.5 घनमिटर आणि शेततळ्याचे 48431.4 घनमिटर काम केले आहे. याशिवाय 746 शोषखड्डयांसह विविध कामे केली आहेत.  गावातील वॉटर बजेट पहाता काम सुरू होण्यापूर्वी या गावात जेमतेम 207.76 कोटी लिटर पाणी उपलब्ध होते. वास्तवीक या गावाला वर्षाकाठी 19,716.19 कोटी लिटर पाण्याची गरज होती. परंतु पावसाचे पाणी   वाहून जात असल्याने या गावाला     19, 508.426 कोटी लिटर पाण्याचा तुटवडा     भासत होता. हा तुटवडा भरून काढण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या कामांची उपयुक्तता वाढली आहे. या कामांमुळे 138315.986 कोटी लिटर पाणी अडणार असल्याने गावातून आता दुष्काळ हद्दपार    होईल असा आत्मविश्वास ग्रामस्थांना आला आहे. त्यामुळे आता सर्वाना यंदाचा पावसाची प्रतिक्षा लागली आहे.