शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

ग्रामस्थांचा घामाचा थेंबाला आले मोत्याचे मोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 11:54 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गाव जेंव्हा जिद्दीला पेटून एकत्र येते आणि एखाद्या कामासाठी झोकून देते ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गाव जेंव्हा जिद्दीला पेटून एकत्र येते आणि एखाद्या कामासाठी झोकून देते तेंव्हा काय चमत्कार होतो याचा प्रत्यय कोठलीखुर्द, ता.नंदुरबार या गावाला आला आहे. जलसंधारणाच्या कामासाठी या गावातील ग्रामस्थांनी तब्बल दोन महिने आपला घाम गाळून मातीत संस्कार केल्याने त्यातून तब्बल आठ कोटी रुपये पेक्षा अधीक खर्चाची कामे झाली आहेत. या कामाने  दुष्काळाला आव्हान दिले आहे. कोठली हे नंदुरबारपासून दहा किलोमिटर अंतरावरील सुमारे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे समृद्ध असलेल्या या गावाला बकाल स्वरूप येत होते. त्याची वेळीच दखल घेवून गाव जागृत झाले. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावातील तरुण एकत्र आले. त्याला प्रशासनाने साथ दिली आणि पहाता पहाता गाव जिद्दीला पेटले. गावातील सुमारे 1200 लोकांनी तब्बल 50 दिवस रोज चार ते पाच तास श्रमदान केल्यामुळे गावात कंपार्टमेंट बडींग, मातीनाला बांध, सलग समपातळी चर, लूज बोल्डर स्ट्रर, सिमेंट नाला बांध, शेततळे, नाला खोलीकरण आदी विविध कामे झाली. ग्रामस्थांचा उत्साह पाहून जिल्हा परिषदेच्या अधिका:यांनी व इतर दात्यांनी डिङोलसाठी मदत दिली. त्यातून पोकलॅण्ड व जेसीबी द्वारेही कामे सुरू झाली. आणि दोन महिन्यात या गावाला चमत्कारीक स्वरूप आले. ग्रामस्थांनी श्रमदानातून साधारणत: 2705.868 घनमिटर कंपार्टमेंट बडींग, 75746.43 घटनमिटर नाला रुंदीकरण व खोलीकरण, सलग समपातळी चराचे 161.36 घनमिटर जलशोषक चर, 218.79 घटनमिर लूज बोल्डर स्ट्ररचे 25.9024 घनमिटर, विहिर पुनर्रभरणाचे 5600 घटनमिटर, सिमेंट नाला बांधचे 1968 घनमिटर, माती नाला बांधचे 3457.5 घनमिटर आणि शेततळ्याचे 48431.4 घनमिटर काम केले आहे. याशिवाय 746 शोषखड्डयांसह विविध कामे केली आहेत.  गावातील वॉटर बजेट पहाता काम सुरू होण्यापूर्वी या गावात जेमतेम 207.76 कोटी लिटर पाणी उपलब्ध होते. वास्तवीक या गावाला वर्षाकाठी 19,716.19 कोटी लिटर पाण्याची गरज होती. परंतु पावसाचे पाणी   वाहून जात असल्याने या गावाला     19, 508.426 कोटी लिटर पाण्याचा तुटवडा     भासत होता. हा तुटवडा भरून काढण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या कामांची उपयुक्तता वाढली आहे. या कामांमुळे 138315.986 कोटी लिटर पाणी अडणार असल्याने गावातून आता दुष्काळ हद्दपार    होईल असा आत्मविश्वास ग्रामस्थांना आला आहे. त्यामुळे आता सर्वाना यंदाचा पावसाची प्रतिक्षा लागली आहे.