शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST

बामखेडा व बिलाडी या दोन्ही गावांतील १९१ लोकांचे मंगळवारी प्रशासनाकडून स्वॅब घेण्यात आले होते. त्यात पुन्हा ...

बामखेडा व बिलाडी या दोन्ही गावांतील १९१ लोकांचे मंगळवारी प्रशासनाकडून स्वॅब घेण्यात आले होते. त्यात पुन्हा २१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या रिपोर्ट प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन व महसूल प्रशासनासह ग्रामपंचायत विविध उपाययोजना राबवत ग्रामस्थांची संसर्ग साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी जनजागृतीसह विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, गावातच मोबाईल व्हॅन पाठवून स्वप घेण्याचे काम करून तत्पर आरोग्य सेवा देत असले तरी ते बामखेडासह बिलाडी गावांना चिंतेची बाब असल्याचे चित्र दिसत आहे.

शहादा तालुक्यातील बामखेडा त.सा, येथील ४० लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यापैकी दोन महिला या अगोदरच मयत झाल्या आहेत. ग्रामीण भागात रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून, ग्रामस्थांमध्ये आरोग्य प्रशासनाकडून व महसूल विभागाकडून जनजागृतीसह विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी ग्रामस्थांनीही सहकार्य करणे गरजेचे असल्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा यांनी केले आहे. आरोग्य प्रशासनाकडून घरोघरी जाऊन सूचना देण्यात येत आहे. विनाकारण गर्दी करू नये, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच तोंडावर मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, डॉ. ज्योती सूर्यवंशी, आरोग्य सेविका डी.के. गिरासे, आशा सुपरवायझर सारिका बोरदे, आशा सेविका सुवर्णा इशी, मंडळाधिकारी जुबेर पठाण, तलाठी एम. बी. महाले, ग्रामसेवक हेमराज पाटील आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू करावी

ग्रामपंचायतीकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत असली तरी ग्रामपंचायतीने सहा दिवस स्वयंस्फूर्तीने गाव बंद केल्यास संसर्ग साखळी तोडण्यासाठी मदत होणार आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने संसर्ग साखळी तोडण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच होम क्वॉरंटाइन न राहता विलगीकरण कक्षात दाखल होण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य पथक व ग्रामपंचायत प्रशासनासह महसूल प्रशासन पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात घेऊन जात आहेत. यावेळी प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनासह महसूल प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.