शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST

बामखेडा व बिलाडी या दोन्ही गावांतील १९१ लोकांचे मंगळवारी प्रशासनाकडून स्वॅब घेण्यात आले होते. त्यात पुन्हा ...

बामखेडा व बिलाडी या दोन्ही गावांतील १९१ लोकांचे मंगळवारी प्रशासनाकडून स्वॅब घेण्यात आले होते. त्यात पुन्हा २१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या रिपोर्ट प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन व महसूल प्रशासनासह ग्रामपंचायत विविध उपाययोजना राबवत ग्रामस्थांची संसर्ग साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी जनजागृतीसह विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, गावातच मोबाईल व्हॅन पाठवून स्वप घेण्याचे काम करून तत्पर आरोग्य सेवा देत असले तरी ते बामखेडासह बिलाडी गावांना चिंतेची बाब असल्याचे चित्र दिसत आहे.

शहादा तालुक्यातील बामखेडा त.सा, येथील ४० लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यापैकी दोन महिला या अगोदरच मयत झाल्या आहेत. ग्रामीण भागात रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून, ग्रामस्थांमध्ये आरोग्य प्रशासनाकडून व महसूल विभागाकडून जनजागृतीसह विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी ग्रामस्थांनीही सहकार्य करणे गरजेचे असल्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा यांनी केले आहे. आरोग्य प्रशासनाकडून घरोघरी जाऊन सूचना देण्यात येत आहे. विनाकारण गर्दी करू नये, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच तोंडावर मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, डॉ. ज्योती सूर्यवंशी, आरोग्य सेविका डी.के. गिरासे, आशा सुपरवायझर सारिका बोरदे, आशा सेविका सुवर्णा इशी, मंडळाधिकारी जुबेर पठाण, तलाठी एम. बी. महाले, ग्रामसेवक हेमराज पाटील आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू करावी

ग्रामपंचायतीकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत असली तरी ग्रामपंचायतीने सहा दिवस स्वयंस्फूर्तीने गाव बंद केल्यास संसर्ग साखळी तोडण्यासाठी मदत होणार आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने संसर्ग साखळी तोडण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच होम क्वॉरंटाइन न राहता विलगीकरण कक्षात दाखल होण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य पथक व ग्रामपंचायत प्रशासनासह महसूल प्रशासन पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात घेऊन जात आहेत. यावेळी प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनासह महसूल प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.