शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जामली व उमटीतील ग्रामस्थ वीजसमस्येने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतील गावांमध्ये पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात साप, विंचू व जंगली श्वापदेदेखील ...

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतील गावांमध्ये पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात साप, विंचू व जंगली श्वापदेदेखील नागरी वस्तीत शिरतात. सर्पदंशाच्या घटना नियमित घडत आहेत. तालुक्याच्या दुर्गम भागातील उमटी व जामली या दोन गावांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा रहिवास आहे. ही गावे गेल्या एक महिन्यापासून अंधारात आहे. वीज कंपनीने याठिकाणी योग्य कार्यवाही करून वीजसमस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

येथील ग्रामस्थांकडून मोलगी येथील महावितरण कार्यालयात संपर्क करत समस्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून कारवाई करण्याची मागणी अभियंता कविराज तडवी, पान्या तडवी, मालजी तडवी, संपत तडवी, कालुसिंग तडवी, मुन्ना तडवी यांनी केली आहे.

विजेअभावी पिठगिरण्या बंद आहेत. त्यामुळे गावातील महिलांना ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ दळण्यासाठी अन्य गावांपर्यंत पायपीट करावी लागत आहे. मोबाइल चार्ज होत नसल्याने रात्री-बेरात्री आपत्कालीन संपर्क करणे शक्य होत नाही. शिवाय, या गावांमध्ये ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, वीजपुरवठा नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत आहेत.

या गावातील पालक व विद्यार्थ्यांनी मोलगी कार्यालयात संपर्क केल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. परंतु, अपेक्षित दाबाने पुरवठा केला नाही. शेजारील गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत असल्याने याच गावांना सापत्न वागणूक का दिली जाते, असाही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

परिसरातील नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिओचे मनोरे उभारण्यात आले आहे. परंतु, अपेक्षित वीजपुरवठाच होत नसल्याने ग्राहकांना सुविधा मिळत नाही. परिणामी, हे मनोरे कुचकामी ठरत आहे.