शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जामली व उमटीतील ग्रामस्थ वीजसमस्येने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतील गावांमध्ये पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात साप, विंचू व जंगली श्वापदेदेखील ...

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतील गावांमध्ये पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात साप, विंचू व जंगली श्वापदेदेखील नागरी वस्तीत शिरतात. सर्पदंशाच्या घटना नियमित घडत आहेत. तालुक्याच्या दुर्गम भागातील उमटी व जामली या दोन गावांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा रहिवास आहे. ही गावे गेल्या एक महिन्यापासून अंधारात आहे. वीज कंपनीने याठिकाणी योग्य कार्यवाही करून वीजसमस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

येथील ग्रामस्थांकडून मोलगी येथील महावितरण कार्यालयात संपर्क करत समस्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून कारवाई करण्याची मागणी अभियंता कविराज तडवी, पान्या तडवी, मालजी तडवी, संपत तडवी, कालुसिंग तडवी, मुन्ना तडवी यांनी केली आहे.

विजेअभावी पिठगिरण्या बंद आहेत. त्यामुळे गावातील महिलांना ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ दळण्यासाठी अन्य गावांपर्यंत पायपीट करावी लागत आहे. मोबाइल चार्ज होत नसल्याने रात्री-बेरात्री आपत्कालीन संपर्क करणे शक्य होत नाही. शिवाय, या गावांमध्ये ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, वीजपुरवठा नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत आहेत.

या गावातील पालक व विद्यार्थ्यांनी मोलगी कार्यालयात संपर्क केल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. परंतु, अपेक्षित दाबाने पुरवठा केला नाही. शेजारील गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत असल्याने याच गावांना सापत्न वागणूक का दिली जाते, असाही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

परिसरातील नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिओचे मनोरे उभारण्यात आले आहे. परंतु, अपेक्षित वीजपुरवठाच होत नसल्याने ग्राहकांना सुविधा मिळत नाही. परिणामी, हे मनोरे कुचकामी ठरत आहे.