शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

जामली व उमटीतील ग्रामस्थ वीजसमस्येने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतील गावांमध्ये पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात साप, विंचू व जंगली श्वापदेदेखील ...

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतील गावांमध्ये पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात साप, विंचू व जंगली श्वापदेदेखील नागरी वस्तीत शिरतात. सर्पदंशाच्या घटना नियमित घडत आहेत. तालुक्याच्या दुर्गम भागातील उमटी व जामली या दोन गावांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा रहिवास आहे. ही गावे गेल्या एक महिन्यापासून अंधारात आहे. वीज कंपनीने याठिकाणी योग्य कार्यवाही करून वीजसमस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

येथील ग्रामस्थांकडून मोलगी येथील महावितरण कार्यालयात संपर्क करत समस्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून कारवाई करण्याची मागणी अभियंता कविराज तडवी, पान्या तडवी, मालजी तडवी, संपत तडवी, कालुसिंग तडवी, मुन्ना तडवी यांनी केली आहे.

विजेअभावी पिठगिरण्या बंद आहेत. त्यामुळे गावातील महिलांना ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ दळण्यासाठी अन्य गावांपर्यंत पायपीट करावी लागत आहे. मोबाइल चार्ज होत नसल्याने रात्री-बेरात्री आपत्कालीन संपर्क करणे शक्य होत नाही. शिवाय, या गावांमध्ये ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, वीजपुरवठा नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत आहेत.

या गावातील पालक व विद्यार्थ्यांनी मोलगी कार्यालयात संपर्क केल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. परंतु, अपेक्षित दाबाने पुरवठा केला नाही. शेजारील गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत असल्याने याच गावांना सापत्न वागणूक का दिली जाते, असाही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

परिसरातील नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिओचे मनोरे उभारण्यात आले आहे. परंतु, अपेक्षित वीजपुरवठाच होत नसल्याने ग्राहकांना सुविधा मिळत नाही. परिणामी, हे मनोरे कुचकामी ठरत आहे.