शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वाहनावरून जाहीर प्रचार न करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : वाहनावरून जाहीर प्रचार न करण्याचा व गावकऱ्यांची एकाचवेळी उमेदवाराने भेटी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : वाहनावरून जाहीर प्रचार न करण्याचा व गावकऱ्यांची एकाचवेळी उमेदवाराने भेटी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या भरडू गटातील पाच गावांनी घेतला आहे. निवडणुकीतील खर्चास या निर्णयामुळे लगाम बसणार आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १० व पंचायत समितीच्या २० गणांसाठी निवडणुकीची धामधुम सुरू आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी उमेदवारांकडून आवश्यक कागदपत्रे व शपथपत्रे आदीं बाबत तयारी सुरू असल्याने व त्यातच पहिल्यांदा आॅनलाईन नामांकन दाखल करावे लागणार असल्याने त्यातील बारकावे पाहता नामांकन दाखल होऊ शकलेले नाही. सोमवारी ही प्रक्रिया जोर धरेल अशी शक्यता आहे.निवडणुक म्हटली की, प्रचार यंत्रणा, वाहने, प्रचार पत्रक, जाहीरनामा व त्या अनुषंगाने उमेदवारावर खर्चाची जबाबदारी येते. प्रचारासाठी राबणाºया हातांची काळजी घेणेही उमेदवारास क्रमप्राप्त ठरते. तालुक्यातील सर्वच्या सर्व १० गट व २० गण अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. भरडू गट अनुसूचित जमाती सर्वसाधारण असून, त्यातील भरडू व वडफळी हे दोन्ही गण अनुसूचित जमाती महिला राखीव आहेत. गटात भरडू, महालकडू, केलपाडा, सोनारेदिगर, शेतगाव, भांगरपाडा, खर्जे, तारपाडा, मोठे कडवान, लहान कडवान, वडफळी, तारापूर, डोगेगाव, वहांदे, जामदा, अंजने व बिलदा या गावांचा समावेश आहे. यातील तारपाडा, बिलदा, जामदा, डोगेगाव व अंजने या पाच गावातील बहुसंख्यक ग्रामस्थांनी निवडणूक खर्चास फाटा देण्याबाबत सहमती दर्शविली आहे. वाहनांमधून होणारा प्रचार पाहता गटातील प्रत्येक गावी फिरण्यासाठी वाहने व कार्यकर्ते यांच्यावर उमेदवारास खर्च करावे लागते. ग्रामीण भागात शेतकामांना सकाळी लवकर सुरूवात होते व दुपार पावेतो ही कामे चालतात. गावात सहसा या कालावधीत शुकशुकाटच असतो. अश्या काळात वाहनांमधून होणारा प्रचार फारसा परिणामकारक ठरत नाही. त्याऐवजी ग्रामस्थांची हाऊस टु हाऊस प्रत्यक्ष भेट व्हावी किंवा एकत्रितपणे कॉर्नर सभेच्या माध्यमातून लोकांना उमेदवारास भेटता यावे असे शक्य असल्याने या पाच गावांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. गटातील इतर गावे व तालुक्यातील इतर गटांनीही असा आदर्श घेतल्यास ग्रामीण भागातील प्रचाराचे स्वरुपच बदलतील अशी शक्यता आहे.