शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाणीटंचाईने ग्रामस्थ बेहाल : अक्कलकुवा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 13:01 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : अक्कलकुवा शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये  वीजपुरवठा करणा:या तीन विद्युत रोहित्रांपैकी दोन विद्युत रोहित्रात बिघाड झाला आह़े त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या प्रभागातील गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आह़े ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात येत आह़े परिसरातील इंदिरानगर, बच्चूभाईनगर, ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : अक्कलकुवा शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये  वीजपुरवठा करणा:या तीन विद्युत रोहित्रांपैकी दोन विद्युत रोहित्रात बिघाड झाला आह़े त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या प्रभागातील गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आह़े ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात येत आह़े परिसरातील इंदिरानगर, बच्चूभाईनगर, सीतानगर, शिक्षक कॉलनी परिसर आदी गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र भावना उमटताना दिसून येत आहेत़ संबंधित परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत         आहेत़ उन्हाची तीव्रता वाढत असून उकाडय़ानेही ग्रामस्थ हैराण झाले आहेत़ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा होत नसल्याने विजेवर चालणारे यंत्र बंद असल्याने ग्रामस्थांचे कुलर, पंखे बंद आहेत़ त्यामुळे त्यांना नाइलाजास्तव   इतरत्र गारव्याचे ठिकाण शोधावे लागत आहे व तेथेच दुपारची वेळ घालवावी लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़ेदरम्यान, अक्कलकुवा ग्रामपंचायतीकडून काही दिवसांपूर्वीच या भागातील ग्रामस्थांना पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केली होती़ मात्र तीन दिवसांपासून विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने संबंधित परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आह़े यामुळे येथील रहिवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होऊन पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आह़े दिवसागणिक तापमानात वाढ होत आह़े त्यामुळे सर्वसामान्य चांगलेच होरपळून निघत आहेत़ त्यातच महावितरणच्या अशा भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ जेरीस आले आहेत़ दुपारच्या वेळी पंखे तसेच कुलरशिवाय घरात राहणे कठीण होऊन बसले आह़े त्यामुळे आबालवृद्धांना या त्रासाचा सामना करावा लागत आह़े परिसरात दुपारच्या वेळी झाडांखाली येथील रहिवासी बसलेले दिसून येत असतात़ काहींकडून खाट टाकून येथेच झोपण्याचीही व्यवस्था करण्यात आली आह़े दुपारच्या वेळी हवादेखील नसल्याने ग्रामस्थ होरपळून निघत आहेत़ याशिवाय दैनंदिन गरजेपुरते लागणारे पाणीही मिळत नसल्याने अखेर सरपंच उषाबाई बोहरा तसेच उपसरपंच मक्राणी व विश्वास मराठे यांच्याकडून जनरेटरच्या साहाय्याने परिसरातील ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आह़े