शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कृत्रिम पाणीटंचाईने ग्रामस्थ बेहाल : अक्कलकुवा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 13:01 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : अक्कलकुवा शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये  वीजपुरवठा करणा:या तीन विद्युत रोहित्रांपैकी दोन विद्युत रोहित्रात बिघाड झाला आह़े त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या प्रभागातील गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आह़े ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात येत आह़े परिसरातील इंदिरानगर, बच्चूभाईनगर, ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : अक्कलकुवा शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये  वीजपुरवठा करणा:या तीन विद्युत रोहित्रांपैकी दोन विद्युत रोहित्रात बिघाड झाला आह़े त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या प्रभागातील गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आह़े ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात येत आह़े परिसरातील इंदिरानगर, बच्चूभाईनगर, सीतानगर, शिक्षक कॉलनी परिसर आदी गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र भावना उमटताना दिसून येत आहेत़ संबंधित परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत         आहेत़ उन्हाची तीव्रता वाढत असून उकाडय़ानेही ग्रामस्थ हैराण झाले आहेत़ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा होत नसल्याने विजेवर चालणारे यंत्र बंद असल्याने ग्रामस्थांचे कुलर, पंखे बंद आहेत़ त्यामुळे त्यांना नाइलाजास्तव   इतरत्र गारव्याचे ठिकाण शोधावे लागत आहे व तेथेच दुपारची वेळ घालवावी लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़ेदरम्यान, अक्कलकुवा ग्रामपंचायतीकडून काही दिवसांपूर्वीच या भागातील ग्रामस्थांना पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केली होती़ मात्र तीन दिवसांपासून विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने संबंधित परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आह़े यामुळे येथील रहिवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होऊन पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आह़े दिवसागणिक तापमानात वाढ होत आह़े त्यामुळे सर्वसामान्य चांगलेच होरपळून निघत आहेत़ त्यातच महावितरणच्या अशा भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ जेरीस आले आहेत़ दुपारच्या वेळी पंखे तसेच कुलरशिवाय घरात राहणे कठीण होऊन बसले आह़े त्यामुळे आबालवृद्धांना या त्रासाचा सामना करावा लागत आह़े परिसरात दुपारच्या वेळी झाडांखाली येथील रहिवासी बसलेले दिसून येत असतात़ काहींकडून खाट टाकून येथेच झोपण्याचीही व्यवस्था करण्यात आली आह़े दुपारच्या वेळी हवादेखील नसल्याने ग्रामस्थ होरपळून निघत आहेत़ याशिवाय दैनंदिन गरजेपुरते लागणारे पाणीही मिळत नसल्याने अखेर सरपंच उषाबाई बोहरा तसेच उपसरपंच मक्राणी व विश्वास मराठे यांच्याकडून जनरेटरच्या साहाय्याने परिसरातील ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आह़े