शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मानसाठी ग्रामस्तरीय समित्यांकडून कुटूंबांचा धांडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची दोन हेक्टर क्षेत्राची अट शिथिल झाल्यानंतर जिल्हास्तरावर नवीन शेतकरी कुटूंब ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची दोन हेक्टर क्षेत्राची अट शिथिल झाल्यानंतर जिल्हास्तरावर नवीन शेतकरी कुटूंब सव्रेक्षणाला सुरुवात झाली आह़े  जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्तरावर नियुक्त केलेली तलाठी व विस्तार अधिकारी यांची समिती गावोगावी भेट देत शेतकरी कुटूंबांचे सव्रेक्षण करुन माहिती संकलित करत आह़े    फेब्रुवारी 2019 मध्ये केंद्रशासनाने शेतक:यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची प्रधानमंत्री किसान सन्मान ही योजना आणली होती़ याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील दोन हेक्टर्पयत जमिन क्षेत्र असलेल्या 950 गावातील 72 हजार 771 शेतकरी कुटूंबांचे फेब्रुवारीअखेरीस सव्रेक्षण करुन माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती़ या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण 1 लाख 76 हजार 595 शेतकरी असल्याचे समोर आले होत़े पात्र ठरलेल्या या शेतक:यांपैकी एप्रिल महिन्यात सहा हजार शेतक:यांच्या खात्यावर रक्कम झाली होती़ त्यानंतर मात्र रडतखडत पैसे जमा होत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े दरम्यान केंद्राने राज्य शासनाला पत्र देत दोन हेक्टरची अटच काढून टाकत सर्व शेतक:यांचा योजनेत सहभाग करुन घेण्याचे आदेश दिले होत़े आदेशानंतर गेल्या आठवडय़ात नंदुरबार जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे शासनाने पत्र देऊन शेतकरी समावेशाची कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले होत़े यानुसार तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी आणि विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करुन शेतकरी कुटूंबांचे सव्रेक्षण सुरु झाले आह़े या सव्रेक्षणाचा अंतिम अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त होणार असून एकूण पात्र शेतक:यांची संख्या समोर आल्यानंतर केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर त्यांची माहिती अपलोड करण्याच्या कामाला सुरुवात होणार आह़े शेतकरी कुटूंब सव्रेक्षणासाठी एकीकडे ग्रामस्तरीय समित्या कार्यरत असताना दुसरीकडे मात्र नंदुरबार तालुक्यातील ग्रामसेवकांनी सोमवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिका:यांना पत्र देत किसान सन्मान योजनेसाठी काम करण्यास नकार दिला आह़े यामुळे योजनेच्या कामावर परिणाम होत असून नंदुरबार तालुक्यात ग्रामसेवकांविनाच सव्रेक्षण सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े  राज्य ग्रामसेवक युनियनच्या नंदुरबार तालुका शाखेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, 14 जून रोजी नंदुरबार तहसील कार्यालयात पीएम किसान योजनेची बैठक सुरु असताना  नंदुरबार तहसीलदारांनी तालुक्यातील ग्रामसेवकांबद्दल अपमानास्पद भाष्य केले होत़े यापूर्वीही त्यांनी असेच भाष्य केल्याने ग्रामसेवक संवर्ग संबधित अधिका:यासोबत काम करणार नसल्याचे म्हटले आह़े याबाबत योग्य ती कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आह़े 

जिल्हा प्रशासनाकडून आतार्पयत नंदुरबार तालुक्याच्या 155 गावांमध्ये 17 हजार 102 शेतकरी कुटूंबांचे सव्रेक्षण झाले आह़े नवापुर तालुक्यातील 165 गावांमध्ये 13 हजार 327 शेतकरी कुटूंबे, शहादा तालुक्यात180 गावांमध्ये 16 हजार 174, तळोदा94 गावात 10 हजार 150, धडगाव तालुक्यात 162 गावांमध्ये 5 हजार 89 आणि अक्कलकुवा तालुक्यातील 10 हजार 829 पैकी 10 हजार 715 कुटूंबांचे सव्रेक्षण फेब्रुवारीअखेरीस झाले होत़े एकूण 72 हजार कुटूंबांच्या या सव्रेक्षणानंतर त्यातील बहुतांश जणांना सहा हजार रुपयेही मिळाल्याची माहिती आह़े आता नव्याने होणा:या सव्रेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाकडून 1 लाख 69 हजार 638 नमुना आठ अ दाखल्यांच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत़ यातील कुटूंबप्रमुखांच्या नावाची माहिती हाती ठेवत नियुक्त समिती सव्रेक्षण करणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े  नंदुरबार तालुक्यात 38 हजार 952, नवापुर 24 हजार 658, शहादा 57 हजार 543, तळोदा 11 हजार 434, धडगाव 13 हजार 254 तर अक्कलकुवा तालुक्यातील 23 हजार 797 नमुना आठ अ दाखले अस्तित्त्वात आहेत़  यानुसार शेतक:यांची निश्चित संख्या समोर येणार असल्याचा दावा प्रशासनाचा आह़े गेल्या काळातील बोंडअळी वितरण आणि छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी अर्ज करणा:या शेतक:यांच्या याद्यांचाही धांडोळा घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आह़े