शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 11:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस व भाजपने शिवसेनेशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस व भाजपने शिवसेनेशी संपर्क साधला असून मुंबईतही काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री के.सी.पाडवी व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची महाविकास आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या शिवसेनेने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्याकडे अधिकृतपणे गटाची स्थापना केली.जिल्हा परिषद निवडणुकीचा निकालानंतर त्रिशंकु अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस व शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. गुरुवारी कुठलाही निर्णय होऊ शकला नाही, परंतु संपर्क साधण्यात आले.सत्तेचे समिकरण बसविण्यासाठी शिवसेनेची मदत घेण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.भाजप नेते आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी भाजप सत्ता स्थापनेसाठी भाजपचा प्रबळ दावा आहे. सेनेची साथ घेण्यास भाजप तयार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप पक्ष पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबई येथे काँग्रेसचे नेते मंत्री अशोक चव्हाण व शिवसेना नेते संजय राऊत यांची बैठक झाल्याचे वृत्त असून पालकमंत्री के.सी.पाडवी हे देखील सक्रीय झाले आहेत. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी देखील शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. अद्याप शिवसेनेशी संपर्क साधला गेला नसल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे नवनिर्वाचीत सदस्य तथा माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र अजीत व मधूकर नाईक यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली. ही पारिवारीक भेट असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेतर्फे रघुवंशी यांनी त्यांची भगवी शाल देत स्वागत केल्याने राजकीय चर्चेला अधीकच ऊत आला आहे. दरम्यान, नवनिर्वाचीत सदस्य तथा स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेबाबत वेगवेगळे समिकरण मांडले जात असल्याने हुडहूडी भरणाºया थंडीत राजकीय वातावरण तापले आहे.शिवसेनतर्फे जिल्हाधिकाºयांकडे गटस्थापन करण्यात आला. भाजप व काँग्रेसतर्फे शुक्रवारी गट स्थापन केला जाणार असल्याचे समजते.