शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

मुख्यमंत्री दत्तक गावअंतर्गत नंदुरबारात विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 13:13 IST

13 गावांचा समावेश : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

नंदुरबार : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील 13 दत्तक गावांमध्ये लोकसहभाग आणि शासन समन्वयातून गावाचे पर्वितन होत आहे. जल, जंगल, जमीन संवर्धनासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे पर्यावरणाचा :हास होत असून, भविष्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. कु:हाड बंदीचा निर्णय घेवून ग्रामस्थांनी आदर्श निर्माण करावा या बरोबर जिल्ह्यात परिवर्तनाची नांदी ठरणारे भादवड गाव विकासाचे             मॉडेल ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 13 दत्तक गावांचे सरपंच आणि ग्राम परिवर्तक यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भादवड गावात वृक्षारोपणासह निसर्ग संवर्धन संकल्प उपक्रमाचे आयोजन करण्यात         आले. या वेळी भादवड ग्रामस्थांतर्फे सर्व प्रथम मुख्यमंत्री ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान स्वागत फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या बरोबरच निसर्गाचे सहकार्य म्हणून असलेले गाय, बैल, शेळी, कोंबडी या पशु प्राण्यांचेदेखील पर्यावरण दिनानिमित्त पूजन करण्यात आले. त्यानंतर गावाच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण अधिकारी जे.एस. जेजुरकर, आर.बी. पवार, जे.डी. शेख, परिवर्तन अभियानाच्या जिल्हा समन्वयक योगिनी खानोलकर, भादवड सरपंच संजय वळवी, ग्रामसेवक अशोक सूर्यवंशी उपस्थित होते.या वेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले की, शासनाच्या शेकडो योजना आहे. प्रशासन यासाठी प्रय} करीत आहे. परंतु ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी पुढे येणे गरजेचे आहे. भादवड गावात जलयुक्त शिवार प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. याचबरोबर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लवकरच नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्तीतून व्यसनमुक्त जिल्हा करण्याचा प्रय}ी यशस्वी झाला असून, यात गावक:यांनीही सहभाग घ्यावा.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने लावलेल्या रोपांचे वृक्षात रूपांतर होईर्पयत कुटुंबातील मुला-बाळांप्रमाणे त्यांचे संगोपन केल्यास फळा-फुलांसह शीतल छाया मिळेल, असे डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले.याप्रसंगी राडीकलमचे सरपंच शंकर पावरा यांनी सांगितले की, आम्ही गावात बैठक घेवून कु:हाड बंदीचा निर्णय घेतला. राळेगणसिद्धी गावाला भेट दिल्यानंतर आपलेही गाव आदर्श गांव म्हणून निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय जिल्ह्यात वृक्षतोड करणा:यास प्रशासनातर्फे शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी पावरा यांनी केली. याच कार्यक्रात जिल्हाधिका:यांनी ग्रामस्थांना निसर्ग संवर्धन करण्याबाबत शपथ दिली.कार्यक्रमास खांडबारा, ता.धडगाव येथील सरपंच कुवलीबाई पाडवी, बोरवणच्या हिना पावरा, निंबोणीचे रतन वळवी, डेब्रामाळचे वनकर वळवी तर ग्रामप्रवर्तक राडीकलामचे दीपक पवार, बोरणचे गिरधन पावरा, बिजगावच्या जयश्री सपकाळे, चिखलीचे पंकज ठाकरे, बोरचकचे संदीप जावरे, निंबोणीचे नीतेश वसावे, डेब्रामाळचे अंकीत पाडवी, कल्पेश पाडवी, खरवडचे कृष्णा सताळे, चोंदवळेचे प्रितेश पाटील, वाटवीचे नीतेश पाटील, भादवडचे अविनाश पाटील आदी उपस्थित होते.प्रास्ताविक ग्रामसेवक अशोक सूर्यवंशी यांनी केले. भादवड गावात विविध प्रजातीची सुमारे एक हजार वृक्ष लावण्याचा मानस आहे. गावातील वृक्ष लागवड, जतन करण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र दौड यांनी केले.